शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी मस्ती का करतात? शिक्षकांचा कनेक्टच तुटलेला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 12:04 IST

चक्क शांतादुर्गा हायर सेकंडरीत प्रकरण झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

राज्यातील अनेक विद्यालयांमध्ये समुपदेशक आहेत. मात्र विद्यार्थ्यांशी संवाद साधून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात काहीजण कमी पडतात. किशोरवयीन विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर आणण्याच्या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र गोव्यात अनेक हायरसेकंडरी व महाविद्यालयांमध्ये शिक्षकांचा विद्यार्थ्याशी कनेक्टच तुटलेला आहे. काही विद्यार्थी दहावी-बारावीत पोहोचले की जास्त मस्ती करू लागतात. ते वयच तसे असते. अशावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य वळण लावण्यासाठी जास्त कष्ट घेण्याची गरज असते. डिचोली येथील शांतादुर्गा हायरसेकंडरीत जी घटना घडली, त्यापासून सर्वच विद्यालयांनी बोध घ्यायला हवा. सहा विद्यार्थ्यांच्या गटाने वर्गात स्प्रेचा वापर केला. त्यामुळे बारा विद्यार्थिनी अत्यवस्थ झाल्या. त्यांना इस्पितळात न्यावे लागले. हा धक्कादायक प्रकार आहे. वरिष्ठ शिक्षण अधिकारी किंवा तालुका भागशिक्षणाधिकारी हायस्कूल, हायरसेकंडरींना फारसे भेटच देत नाहीत. डिचोलीसारख्या छोट्या सुसंस्कृत शहरातील हायरसेकंडरीत विद्यार्थी स्प्रेचा मुद्दाम वापर करतात, हे चिंताजनक आहे. विद्यार्थिनींना धडा शिकविण्याचा त्यांचा हेतू होता, अशी चर्चा आहे.

शिक्षक व समुपदेशक या दोन्ही घटकांची जबाबदारी आता वाढली आहे. शिवाय पालकांनीही बोध घेतला पाहिजे. 'आपला तो बाब्या व दुसऱ्याचे ते कार्ट' असा विचार अनेक पालक करतात. कॉलेजमध्ये जाणारा आपला मुलगा अजून लहानच आहे, असे वडिलांना वाटते. मुलगा विद्यालयाबाहेर कोणत्या उनाड मुलांच्या संगतीत असतो, याची पालकांना कल्पना नसते. आपल्याच दैनंदिन कामात, नोकरी-धंद्यात पालक एवढे व्यस्त असतात की, मुलगा सिगरेट ओढायला वा बियर प्यायला शिकला तरी त्यांना ठाऊक नसते. यातून मग काही विद्यार्थी गुन्हेगारीच्या मार्गाकडेही वळू लागतात. 

पालक व शिक्षकांनी पूर्ण दुर्लक्ष केले तर एक टप्पा असा येतो की मुलगा आई-वडिलांना जुमानत नाही. शिव्याही देऊ लागतो. मग पश्चात्ताप करण्याची वेळ पालकांवर येते. किशोरवयीन मुले जर वाया गेली, शिक्षणाला अर्थ तो काय राहिला? सिनेमात तीन तासांसाठी जे जग दिसते, तेच खरे असे वाटण्याचे एक वय असते. मायावी व मोहमयी दुनिया म्हणजे वस्तुस्थिती नाही, याचे भान किशोरवयीन विद्यार्थ्यांना नसते. ते भान करून देणे व जीवन म्हणजे खडतर प्रवास आहे, ही जाणीव मुलांच्या मनावर बिंबवणे ही शिक्षक व पालकांची जबाबदारी आहे. 

अनेक शिक्षक अकरावी-बारावीच्या मुलांकडे दुर्लक्ष करतात. वर्गात पुस्तकी शिक्षण दिले की, आपली जबाबदारी संपली असे त्यांना वाटते. अनेकदा काही कुटुंबांमध्ये वाद असतात. वडील व्यसनी असतात किंवा आई-बाबांचे पटत नसते. मुलांच्या मनावर त्याचा परिणाम होतो. असे विद्यार्थी वर्गात आले तरी त्यांचे शिक्षणाकडे लक्ष नसते. ते वाममार्गाला लागतात. अशावेळी समुपदेशकांनी अधिक योगदान दिले तर त्या मुलांचे व समाजाचेही कल्याण होईल.

काही विद्यार्थी चक्क शिक्षकांनादेखील धमक्या देतात. अधुनमधून पालक-शिक्षक संघ, विद्यार्थी, शिक्षण अधिकारी व पोलिस यांच्या संयुक्त बैठका व्हायला हव्यात. बाहेरचे कुणी तरुण आपल्या हायर सेकंडरीत येत नाहीत ना, विद्यार्थी बाहेरील मुलांच्या नादी लागून मस्ती करत नाहीत ना याची माहिती सातत्याने प्रिन्सीपल वगैरेंनी काढायला हवी. आवश्यक तिथे पोलिसांचीही मदत घ्यायला हवी. आपल्याकडे विद्यालयांमध्ये प्रिन्सीपल व विद्यार्थी यांच्यात जास्त संवाद नसतो. पूर्वी एखादा विद्यार्थी आजारी पडला, विद्यालयात आला नाही तर शिक्षक त्याच्या घरी जायचे. काय समस्या आहे हे जाणून घ्यायचे. शिक्षक सातत्याने पालकांच्याही संपर्कात असायचे. हे सगळे बहुतांश विद्यालयांबाबत बंद झाले आहे. फक्त प्राथमिक शाळेत मुलांची संख्या वाढायला हवी म्हणून काही शिक्षक पालकांच्या घरी जातात. वर्ग बंद पडण्याची किंवा आपली नोकरी जाण्याची भीती प्राथमिक शिक्षकांना असते.

डिचोलीतील शांतादुर्गा विद्यालयाला चांगले नाव व प्रतिष्ठा आहे. पणजी, मडगाव किंवा वास्कोतील एखाद्या विद्यालयात जर स्प्रे प्रकरण घडले असते तर एकवेळ समजून घेता आले असते. मात्र चक्क शांतादुर्गा हायर सेकंडरीत प्रकरण झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उपाययोजना करावीच लागेल.

 

टॅग्स :goaगोवाSchoolशाळा