शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

कर्नाटक कालवा खणत होते तेव्हा भजी भाजत होते ?, कॉंग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 22:27 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बी. एस. येडिययुरप्पा यांना लिहिलेल्या पत्रामुळे म्हादई प्रकरणात गोमंतकीय गंभीर नसल्याचा चुकीचा संदेश गेला आणि त्याचा फायदा कर्नाटकने घेतल्याचे सांगून माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

पणजी: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बी. एस. येडिययुरप्पा यांना लिहिलेल्या पत्रामुळे म्हादई प्रकरणात गोमंतकीय गंभीर नसल्याचा चुकीचा संदेश गेला आणि त्याचा फायदा कर्नाटकने घेतल्याचे सांगून माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.म्हादईचे पाणी कणकुंबी येथे कर्नाटक अडवित असताना गोवा सरकार आणि प्रशासकीय अधिकारी भजी भाजण्यात व्यस्त होती का, असा सवाल खलप यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की म्हादई प्रकरणात गोवा सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे वागले आहे. गोव्यातील जरस्रोतांची अजिबात परवा सरकारला नाही, याची प्रचिती त्यामुळे आली. कणकुंबी येथील १० मीटर खोल कालवा खणला जात असतानाही सरकारकडून दखल घेतली नाही. हा मुद्दा लवादापुढे मांडायला हवा होता.न्यायालयाची स्थगिती असतानाही ही कामे चालविल्यामुळे अवमान याचिका दाखल करायला हवी होती. परंतु तसे काहीही न करता सरकार व प्रशासन स्वस्त राहिले. उलट भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांना वादग्रस्त पत्र लिहून गोव्याची बाजू आणखी कमकुवत केली, असा आरोप त्यांनी केला. या बेजबाबदारपणामुळे मुख्यमंत्र्यांनी खरे म्हणजे आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. कॉंग्रेस पक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असल्याचे ते म्हणाले.म्हादई प्रकरणात राजेंद्र केरकर यांच्यासारके म्हादई बचाव समितीचे तज्ज्ञ झटत असताना त्यांच्या प्रयत्नांनाही सरकारने खो घातल्याचे खलप यांनी सांगितले. कॉंग्रेस सरकारची म्हादई मुद्यावरील भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. कॉंग्रेसने यू-टर्न घेतलेले नाही. या प्रकरणात बचाव समितीच्या धोरणाला कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. या मुद्यावर कॉंग्रेसच्या झेंड्याखाली लोकांना एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. अमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनीही या प्रकरणात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी टीका केली. सरकारचेच आमदार मायकल लोबो आणि प्रमोद सावंत या प्रकरणात वक्तव्ये करून सरकारचेच अपयश समोर आणत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस