शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

कर्नाटक कालवा खणत होते तेव्हा भजी भाजत होते ?, कॉंग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 22:27 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बी. एस. येडिययुरप्पा यांना लिहिलेल्या पत्रामुळे म्हादई प्रकरणात गोमंतकीय गंभीर नसल्याचा चुकीचा संदेश गेला आणि त्याचा फायदा कर्नाटकने घेतल्याचे सांगून माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

पणजी: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बी. एस. येडिययुरप्पा यांना लिहिलेल्या पत्रामुळे म्हादई प्रकरणात गोमंतकीय गंभीर नसल्याचा चुकीचा संदेश गेला आणि त्याचा फायदा कर्नाटकने घेतल्याचे सांगून माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.म्हादईचे पाणी कणकुंबी येथे कर्नाटक अडवित असताना गोवा सरकार आणि प्रशासकीय अधिकारी भजी भाजण्यात व्यस्त होती का, असा सवाल खलप यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की म्हादई प्रकरणात गोवा सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे वागले आहे. गोव्यातील जरस्रोतांची अजिबात परवा सरकारला नाही, याची प्रचिती त्यामुळे आली. कणकुंबी येथील १० मीटर खोल कालवा खणला जात असतानाही सरकारकडून दखल घेतली नाही. हा मुद्दा लवादापुढे मांडायला हवा होता.न्यायालयाची स्थगिती असतानाही ही कामे चालविल्यामुळे अवमान याचिका दाखल करायला हवी होती. परंतु तसे काहीही न करता सरकार व प्रशासन स्वस्त राहिले. उलट भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांना वादग्रस्त पत्र लिहून गोव्याची बाजू आणखी कमकुवत केली, असा आरोप त्यांनी केला. या बेजबाबदारपणामुळे मुख्यमंत्र्यांनी खरे म्हणजे आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. कॉंग्रेस पक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असल्याचे ते म्हणाले.म्हादई प्रकरणात राजेंद्र केरकर यांच्यासारके म्हादई बचाव समितीचे तज्ज्ञ झटत असताना त्यांच्या प्रयत्नांनाही सरकारने खो घातल्याचे खलप यांनी सांगितले. कॉंग्रेस सरकारची म्हादई मुद्यावरील भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. कॉंग्रेसने यू-टर्न घेतलेले नाही. या प्रकरणात बचाव समितीच्या धोरणाला कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. या मुद्यावर कॉंग्रेसच्या झेंड्याखाली लोकांना एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. अमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनीही या प्रकरणात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी टीका केली. सरकारचेच आमदार मायकल लोबो आणि प्रमोद सावंत या प्रकरणात वक्तव्ये करून सरकारचेच अपयश समोर आणत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस