शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

आरोग्यमंत्री जेव्हा अवयव दानाची घोषणा करतात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 8:03 PM

काहीवेळा मृत्यूशी झुंजणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याच्या अवयवाची गरज असते. मृत्यूनंतर एखाद्याचा लगेच अवयव त्या गरजवंत व्यक्तीला मिळाला तर त्याचे जीवन वाचू शकते

पणजी - आपल्या मृत्यूनंतर आपले सगळे अवयव दान करावेत अशी भूमिका आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी स्वीकारली आहे. राणे यांनी अवयव दानाविषयीचा नोटो हा अर्ज भरला व अधिकृतरीत्या आपला इरादा स्पष्ट केला.मृत्यूनंतर अवयव दान केले जावे, ज्यामुळे अन्य गरजवंत व्यक्तींना त्या अवयवांचा लाभ होतो. दुसऱ्या  कुणाचे तरी प्राण त्यामुळे वाचते. गोमंतकीय समाजात याबाबत जागृती होण्याची गरज आहे व ती जागृती आम्ही करू, असे मंत्री राणे यांनी सांगितले. मृत्यूनंतर अवयव दान करण्यात येईल, असे जाहीर करण्यासाठी अगोदर अर्ज भरावा लागतो. मंत्री राणे यांनी तसा अर्ज भरला.स्टेट ऑगर्न अॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनची गोवा सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेचे मंत्री राणे यांनी उद्घाटन केले. आरोग्य सचिव श्रीमती नीला मोहनन तसेच बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर आदी यावेळी उपस्थित होते. गोव्यात जीवनशैलीविषयक आजार वाढत आहेत. काहीवेळा मृत्यूशी झुंजणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याच्या अवयवाची गरज असते. मृत्यूनंतर एखाद्याचा लगेच अवयव त्या गरजवंत व्यक्तीला मिळाला तर त्याचे जीवन वाचू शकते.लोकांमध्ये त्याविषयी अजून जागृती झालेली नाही. त्यामुळे लोक अवयव दानासाठी पुढे येत नाहीत. मृत्यूनंतर माणसांचे अवयव जाळणे किंवा पुरणे यास अर्थ नाही. अवयव दान हा योग्य मार्ग आहे, असे मंत्री राणे म्हणाले. आपण त्याच हेतूने अवयव दानाचा अर्ज भरला आहे. प्रत्येकाने त्याविषयी विचार करून अवयव दानासाठी पुढे यावे, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाOrgan donationअवयव दानHealthआरोग्य