शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यमंत्री जेव्हा अवयव दानाची घोषणा करतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 20:28 IST

काहीवेळा मृत्यूशी झुंजणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याच्या अवयवाची गरज असते. मृत्यूनंतर एखाद्याचा लगेच अवयव त्या गरजवंत व्यक्तीला मिळाला तर त्याचे जीवन वाचू शकते

पणजी - आपल्या मृत्यूनंतर आपले सगळे अवयव दान करावेत अशी भूमिका आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी स्वीकारली आहे. राणे यांनी अवयव दानाविषयीचा नोटो हा अर्ज भरला व अधिकृतरीत्या आपला इरादा स्पष्ट केला.मृत्यूनंतर अवयव दान केले जावे, ज्यामुळे अन्य गरजवंत व्यक्तींना त्या अवयवांचा लाभ होतो. दुसऱ्या  कुणाचे तरी प्राण त्यामुळे वाचते. गोमंतकीय समाजात याबाबत जागृती होण्याची गरज आहे व ती जागृती आम्ही करू, असे मंत्री राणे यांनी सांगितले. मृत्यूनंतर अवयव दान करण्यात येईल, असे जाहीर करण्यासाठी अगोदर अर्ज भरावा लागतो. मंत्री राणे यांनी तसा अर्ज भरला.स्टेट ऑगर्न अॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनची गोवा सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेचे मंत्री राणे यांनी उद्घाटन केले. आरोग्य सचिव श्रीमती नीला मोहनन तसेच बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर आदी यावेळी उपस्थित होते. गोव्यात जीवनशैलीविषयक आजार वाढत आहेत. काहीवेळा मृत्यूशी झुंजणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याच्या अवयवाची गरज असते. मृत्यूनंतर एखाद्याचा लगेच अवयव त्या गरजवंत व्यक्तीला मिळाला तर त्याचे जीवन वाचू शकते.लोकांमध्ये त्याविषयी अजून जागृती झालेली नाही. त्यामुळे लोक अवयव दानासाठी पुढे येत नाहीत. मृत्यूनंतर माणसांचे अवयव जाळणे किंवा पुरणे यास अर्थ नाही. अवयव दान हा योग्य मार्ग आहे, असे मंत्री राणे म्हणाले. आपण त्याच हेतूने अवयव दानाचा अर्ज भरला आहे. प्रत्येकाने त्याविषयी विचार करून अवयव दानासाठी पुढे यावे, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाOrgan donationअवयव दानHealthआरोग्य