शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जे काँग्रेसला ५० वर्षांत जमले नाही, ते भाजपने १० वर्षांत केले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:31 IST

नावेली येथे दक्षिण गोवा भाजप कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : भाजप सरकारने दहा वर्षात देशासह गोव्यातही अमुलाग्र बदल केले आहेत. ही कामे लोकापर्यंत पोहोचवणे भाजप कार्यकर्त्यांचे ध्येय असले पाहिजे. काँग्रेसला जे ५० वर्षात जमले नाही, ते भाजपने दहा वर्षांत करून दाखवले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मंगळवारी आयोजित दक्षिण गोवा भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. नावेलीतील दैवज्ञ ब्राह्मण सभागृहात हा मेळावा झाला. व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, आमदार दिगंबर कामत, कृष्णा साळकर, संकल्प आमोणकर, गणेश गावकर, उल्हास तुयेकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, पदाधिकारी शर्मद रायतुरकर, अनिता थोरात, सुवर्णा तेंडुलकर, प्रभाकर गावकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, कार्यकर्त्यांनी मेळाव्यात दिली जाणारी पुस्तके आणि पत्रिका वाचली पाहिजे. त्याचे कारण म्हणजे, पक्षाची आणि त्याच्या कार्याची जेवढी माहिती कार्यकर्त्यांना असेल, तेवढ्याच आत्मविश्वासाने ती माहिती ते जनतेपर्यंत पोहोचवू शकतील.

विकासाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन

मुख्यमंत्र्यांनी डिजिटल इंडिया, महिला सशक्तीकरण, महामार्ग जोडणी, रेल्वेमार्ग, जलमार्ग जोडणी, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील बदल याविषयी माहिती दिली. यावेळी, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि इतर भाजप नेत्यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शर्मद रायतुरकर आणि केले. आभार अनिता थोरात यांनी मानले.

प्रगती पाहता, २७ आमदार आलेच पाहिजे

प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी सांगितले की, दहा वर्षांत देशात तसेच राज्यात मोठी प्रगती झाली. भाजप पक्षाची सदस्य संख्या वाढली आणि आणखीन लोक पक्षाशी जोडले गेले. देशाची प्रगती आणि राज्यात होणारा बदल पाहता येणाऱ्या २०२७ च्या निवडणुकीत भाजपचे २७ पेक्षा जास्त उमेदवार निवडून आले पाहिजे. याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि पक्षासाठी काम केले पाहिजे.

भाजपमुळे आमूलाग्र बदल

काँग्रेस पक्षाने देशावर ५० वर्षे राज्य केले आणि फक्त आपली मनमानी करून स्वहित पाहिले. पण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ साली निवडून आले, त्यापासून ते आजपर्यंतच्या कालखंडात विविध क्षेत्रात भाजप सरकारने देशात तसेच राज्यात आमूलाग्र बदल घडवून आणले. काँग्रेस पक्ष फक्त चुकीची माहिती लोकांमध्ये देत आहे. भाजप संविधानात बदल घडवून आणेल आणि त्याचा लोकांना त्रास होईल, असा अपप्रचार त्यांनी केला. पण वस्तुस्थिती पाहता, देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस पक्षाने ६० वेळा संविधानात बदल आणले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली आणि अनेकांना तुरुंगात डांबले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत