शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
9
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
10
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
11
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
12
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
13
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
14
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
15
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
16
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
17
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
18
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
19
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
20
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु

जे काँग्रेसला ५० वर्षांत जमले नाही, ते भाजपने १० वर्षांत केले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:31 IST

नावेली येथे दक्षिण गोवा भाजप कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : भाजप सरकारने दहा वर्षात देशासह गोव्यातही अमुलाग्र बदल केले आहेत. ही कामे लोकापर्यंत पोहोचवणे भाजप कार्यकर्त्यांचे ध्येय असले पाहिजे. काँग्रेसला जे ५० वर्षात जमले नाही, ते भाजपने दहा वर्षांत करून दाखवले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मंगळवारी आयोजित दक्षिण गोवा भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. नावेलीतील दैवज्ञ ब्राह्मण सभागृहात हा मेळावा झाला. व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, आमदार दिगंबर कामत, कृष्णा साळकर, संकल्प आमोणकर, गणेश गावकर, उल्हास तुयेकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, पदाधिकारी शर्मद रायतुरकर, अनिता थोरात, सुवर्णा तेंडुलकर, प्रभाकर गावकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, कार्यकर्त्यांनी मेळाव्यात दिली जाणारी पुस्तके आणि पत्रिका वाचली पाहिजे. त्याचे कारण म्हणजे, पक्षाची आणि त्याच्या कार्याची जेवढी माहिती कार्यकर्त्यांना असेल, तेवढ्याच आत्मविश्वासाने ती माहिती ते जनतेपर्यंत पोहोचवू शकतील.

विकासाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन

मुख्यमंत्र्यांनी डिजिटल इंडिया, महिला सशक्तीकरण, महामार्ग जोडणी, रेल्वेमार्ग, जलमार्ग जोडणी, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील बदल याविषयी माहिती दिली. यावेळी, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि इतर भाजप नेत्यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शर्मद रायतुरकर आणि केले. आभार अनिता थोरात यांनी मानले.

प्रगती पाहता, २७ आमदार आलेच पाहिजे

प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी सांगितले की, दहा वर्षांत देशात तसेच राज्यात मोठी प्रगती झाली. भाजप पक्षाची सदस्य संख्या वाढली आणि आणखीन लोक पक्षाशी जोडले गेले. देशाची प्रगती आणि राज्यात होणारा बदल पाहता येणाऱ्या २०२७ च्या निवडणुकीत भाजपचे २७ पेक्षा जास्त उमेदवार निवडून आले पाहिजे. याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि पक्षासाठी काम केले पाहिजे.

भाजपमुळे आमूलाग्र बदल

काँग्रेस पक्षाने देशावर ५० वर्षे राज्य केले आणि फक्त आपली मनमानी करून स्वहित पाहिले. पण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ साली निवडून आले, त्यापासून ते आजपर्यंतच्या कालखंडात विविध क्षेत्रात भाजप सरकारने देशात तसेच राज्यात आमूलाग्र बदल घडवून आणले. काँग्रेस पक्ष फक्त चुकीची माहिती लोकांमध्ये देत आहे. भाजप संविधानात बदल घडवून आणेल आणि त्याचा लोकांना त्रास होईल, असा अपप्रचार त्यांनी केला. पण वस्तुस्थिती पाहता, देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस पक्षाने ६० वेळा संविधानात बदल आणले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली आणि अनेकांना तुरुंगात डांबले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत