शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

जे काँग्रेसला ५० वर्षांत जमले नाही, ते भाजपने १० वर्षांत केले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:31 IST

नावेली येथे दक्षिण गोवा भाजप कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : भाजप सरकारने दहा वर्षात देशासह गोव्यातही अमुलाग्र बदल केले आहेत. ही कामे लोकापर्यंत पोहोचवणे भाजप कार्यकर्त्यांचे ध्येय असले पाहिजे. काँग्रेसला जे ५० वर्षात जमले नाही, ते भाजपने दहा वर्षांत करून दाखवले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मंगळवारी आयोजित दक्षिण गोवा भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. नावेलीतील दैवज्ञ ब्राह्मण सभागृहात हा मेळावा झाला. व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, आमदार दिगंबर कामत, कृष्णा साळकर, संकल्प आमोणकर, गणेश गावकर, उल्हास तुयेकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, पदाधिकारी शर्मद रायतुरकर, अनिता थोरात, सुवर्णा तेंडुलकर, प्रभाकर गावकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, कार्यकर्त्यांनी मेळाव्यात दिली जाणारी पुस्तके आणि पत्रिका वाचली पाहिजे. त्याचे कारण म्हणजे, पक्षाची आणि त्याच्या कार्याची जेवढी माहिती कार्यकर्त्यांना असेल, तेवढ्याच आत्मविश्वासाने ती माहिती ते जनतेपर्यंत पोहोचवू शकतील.

विकासाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन

मुख्यमंत्र्यांनी डिजिटल इंडिया, महिला सशक्तीकरण, महामार्ग जोडणी, रेल्वेमार्ग, जलमार्ग जोडणी, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील बदल याविषयी माहिती दिली. यावेळी, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि इतर भाजप नेत्यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शर्मद रायतुरकर आणि केले. आभार अनिता थोरात यांनी मानले.

प्रगती पाहता, २७ आमदार आलेच पाहिजे

प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी सांगितले की, दहा वर्षांत देशात तसेच राज्यात मोठी प्रगती झाली. भाजप पक्षाची सदस्य संख्या वाढली आणि आणखीन लोक पक्षाशी जोडले गेले. देशाची प्रगती आणि राज्यात होणारा बदल पाहता येणाऱ्या २०२७ च्या निवडणुकीत भाजपचे २७ पेक्षा जास्त उमेदवार निवडून आले पाहिजे. याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि पक्षासाठी काम केले पाहिजे.

भाजपमुळे आमूलाग्र बदल

काँग्रेस पक्षाने देशावर ५० वर्षे राज्य केले आणि फक्त आपली मनमानी करून स्वहित पाहिले. पण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ साली निवडून आले, त्यापासून ते आजपर्यंतच्या कालखंडात विविध क्षेत्रात भाजप सरकारने देशात तसेच राज्यात आमूलाग्र बदल घडवून आणले. काँग्रेस पक्ष फक्त चुकीची माहिती लोकांमध्ये देत आहे. भाजप संविधानात बदल घडवून आणेल आणि त्याचा लोकांना त्रास होईल, असा अपप्रचार त्यांनी केला. पण वस्तुस्थिती पाहता, देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस पक्षाने ६० वेळा संविधानात बदल आणले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली आणि अनेकांना तुरुंगात डांबले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत