शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

वेलिंगकरांच्या आव्हानात दम आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 21:46 IST

‘मित्र असावा तर असा, व शत्रू असू नये असा’ असा अनुभव मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर रा. स्वं. संघाचे गोव्याचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्याबाबत सध्या घेत आहेत.

- राजू नायक

‘मित्र असावा तर असा, व शत्रू असू नये असा’ असा अनुभव मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर रा. स्वं. संघाचे गोव्याचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्याबाबत सध्या घेत आहेत. पर्रीकर गेले सात महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी आहेत. त्यांचा आजार बळावत चालला आहे. गेले काही दिवस तर केमोथेरपी घेत असल्याने त्यांचे अस्तित्वही जाणवलेले नाही.

या काळात त्यांनी मुख्यमंत्रिपदावर राहावे की नाही याबाबत मतभिन्नता आहे. त्यांचे राजकीय विरोधक व राजकीय विश्लेषकही पर्रीकरांनी सत्ता सोडावी व आराम करावा या मताचे आहेत. काँग्रेस पक्ष तर पर्रीकरांनी या परिस्थितीत राज्यशकट हाकणे अत्यंत चूक असल्याचे सांगून ‘जनआक्रोश’ आंदोलन चालवत आहे. भाजपा आणि सरकारातले घटक पक्ष पर्रीकरांच्या बाजूने उभे आहेत. प्रशासन योग्य पद्धतीने चालू असल्याचा त्यांचा दावा असतो. 

परंतु, पर्रीकरांच्या निकटच्या वर्तुळातून दूर झालेले सुभाष वेलिंगकर मात्र त्यांच्यावर टीकेचे आसूड ओढताना थकत नाहीत. त्यांनी शिक्षण माध्यम प्रश्नावर सरकारशी काडीमोड घेतला व संघाचा त्याग केला. संघाचा मोठा पाठीराखा वर्ग घेऊन त्यांनी आता गोवा सुरक्षा मंच स्थापन केला आहे. पंरतु ते भाजपापेक्षा पर्रीकरांचे प्रमुख टीकाकार बनले आहेत. इतके की त्यांच्याएवढी जहाल भाषा प्रमुख विरोधी पक्षाचे नेतेही वापरत नाहीत. 

गुरुवारी वेलिंगकरांनी पर्रीकरांवर टीका करताना ते अत्यंत निर्लज्जपणे सत्तेला चिकटून बसल्याचा आरोप केला. सध्या वेलिंगकर खाण अवलंबितांच्या आंदोलनाबरोबर सतत दिसतात. त्यांच्या प्रत्येक सभेत ते अत्यंत तिखट बोलतात व त्यांचे लक्ष्य पर्रीकर असतात. पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या गोव्यातील विधानसभा पोटनिवडणुकांत ‘गोवा सुरक्षा मंच’चे उमेदवार असतील असेही त्यांनी जाहीर केले आहे. भाजपाला धडा शिकवायला हवा; कारण त्यांनी प्रत्येक वचनाचा भंग केला, असे ते म्हणाले. 

ज्या कोणाला पर्रीकर-वेलिंगकर यांची मैत्री माहीत आहे, त्यांना या वैराच्या आजच्या स्वरूपाबद्दल आश्चर्य वाटते. दोघेही समवयस्क आहेत व दोघांनी भाजपाची राज्यात बांधणी केली. परंतु वेलिंगकर यांना इच्छा असूनही त्यांना भाजपात अधिकृतरीत्या पाठविले गेले नाही. दुस-या बाजूला पर्रीकर अत्यंत झपाटय़ाने भाजपात वाढत गेले. त्यांनी एकहाती राजकीय नेतृत्व केले व या पक्षाला- ज्याचे अस्तित्व नगण्य होते- सत्तास्थानी आणले. त्यामुळे पर्रीकरांचे नाव सर्वतोमुखी झाले व केंद्रातही दबदबा निर्माण होऊन त्यांना संरक्षणमंत्रिपदही प्राप्त झाले. वेलिंगकर याची महत्त्वाकांक्षा अपूर्ण राहिली व त्याचे पर्यवसान कटुतेत झाले व दोघेही एकमेकांचा तिरस्कार करू लागले असे जाणकार मानतात. 

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत गोवा सुरक्षा मंचने मगोप व शिवसेनेशी युती करून रिंगणात उडी घेतली होती. परंतु त्यांची अनामतही जप्त झाली असली तरी वेलिंगकरांनी ज्या पद्धतीने राजकीय पोटतिडकीने किल्ला लढणे चालविले आहे, त्याचे निरीक्षकांना आश्चर्य वाटते. त्यामागे पर्रीकरांच्या विरोधातील सुडाची भावना आहे की सूत्रबद्ध राजकीय विचार आहे, त्याचा मात्र अजून उलगडा झालेला नाही. लोकसभा निवडणूक व निकट आलेल्या पोटनिवडणुकांत गोवा सुरक्षा मंचपेक्षा वेलिंगकरांचीच खरी कसोटी लागणार आहे. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर