शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
4
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
5
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
7
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
8
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
9
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
10
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
11
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
12
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
13
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
14
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
15
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
16
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
17
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
18
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
19
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
20
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध

लोबोंच्या कामाची योग्यवेळी दखल घेऊ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 08:46 IST

कळंगुटमध्ये भाजपतर्फे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : कळंगुट मतदारसंघात आमदार मायकल लोबो यांचे कार्य अत्यंत चांगले आहे. त्यांच्या कार्याची दखल पक्षश्रेष्ठींनीही घेतली आहे. त्यांच्या कार्याची पोचपावती त्यांना योग्य वेळी देण्यात येईल' अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कळंगुट येथे भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार मायकल लोबो, भाजप मंडळ अध्यक्ष समीर चोडणकर, रूपेश कामत उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'आमचे सरकार जाती, धर्माचा विचार न करता लोकांचे हित पाहून विकासकामे करीत आहे. त्या कामाच्या आधारावर मतदारांनी २०१२ पासून सतत भाजपचे सरकार निवडून दिले आहे.

म्हणून काँग्रेसचा पराभव

मुख्यमंत्री म्हणाले की, 'मागील १० वर्षात राज्याचा जो विकास झाला आहे, तो पूर्वी झाला नव्हता. राज्याचा देशाचा विकास भाजपच सरकार करू शकते, हे लोकांना कळून चुकल्याने लोकांना काँग्रेस पक्षाचा विसर पडू लागला आहे. याच कारणास्तव देशातील अनेक राज्यांत काँग्रेसचा पराभव होत आहे.

यावेळी कळंगुट येथील मंडल तसेच बूथ समितीचे त्यांनी अभिनंदन केले. त्यांनी काम सुरूच ठेवण्याची विनंती त्यांनी केली. याच कार्यकर्त्यांच्या जोरावर २०२७ साली पुन्हा एकदा भाजपा सरकार सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी दामू नाईक, आमदार मायकल लोबो यांनीही आपले विचार मांडले.

लोबोंना राज्याची चिंता

मुख्यमंत्री म्हणाले की, 'लोबो यांनी राज्याची अधिक चिंता आहे. त्यामुळे ते राज्याच्या हिताचा अनेक वेळा विचार करतात. त्यांचा विचार योग्य असतो. विकासकामे करण्यासाठी मायकल लोबोंचा हात कोणीच धरु शकत नाही. त्यांचे मतदारसंघातील नियोजन अत्यंत चांगले आहे, असे ते म्हणाले.

मतदारसंघाचा विकास

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, आमदार मायकल लोबो यांनी मतदारसंघाचा सतत विकास साधला आहे. इतर मतदारसंघांच्या तुलनेत कळंगुटाचा विकास अत्यंत जलद गतीने होत आहे. मानवविकासाच्या क्षेत्रात लोबो आपल्या मतदारांची चांगली काळजी घेत आहे. सामान्य लोकांचे हित जपण्याचे कार्य करीत असतो.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपा