शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

म्हापशातील बाजारपेठेतील पारंपारिकता नष्ट होण्याच्या मार्गावर : व्यापारी संघटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 4:35 PM

ऑनलाइन पद्धतीच्या व्यवसायात वाढ झाली असल्याने म्हापशातील बाजारपेठेतल्या व्यापा-यांच्या व्यवसायावर सुमारे ३५ टक्के परिणाम झाले आहेत. पूर्ण गोव्यातील व्यापा-यांना ही समस्या सतावत आहे.

म्हापसा : जगप्रसिद्ध अशा म्हापसा शहरातील पारंपारिक बाजारातील पारंपारिकता बाजाराची ओळख नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शुक्रवारच्या बाजारावरील पालिकेने आपले नियंत्रण गमावले असून त्यात भर म्हणून बनावटगिरी, फसवेगिरी, गैरप्रकार, वेश्या व्यवसाय यांना ऊत आलेला असल्याचा आरोप म्हापसा व्यापारी संघटनेच्या बिनविरोध निवड झालेल्या नुतन समितीने केला आहे. 

ऑनलाइन पद्धतीच्या व्यवसायात वाढ झाली असल्याने म्हापशातील बाजारपेठेतल्या व्यापा-यांच्या व्यवसायावर सुमारे ३५ टक्के परिणाम झाले आहेत. पूर्ण गोव्यातील व्यापा-यांना ही समस्या सतावत आहे. त्यात भर म्हणून सरकारकडून खासगी सरकारी सहकार्याने नवीन बसस्थानक उभारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यात शॉपिंग मॉल उभारण्याचा प्रयत्न सुरु झाला असून हे मॉल सुरु झाल्यास व्यापा-यांवर होत असलेल्या परिणामात भर पडणार असल्याचे समितीचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी पत्रकारांना सांगितले. 

बाजारपेठेतील विक्रेत्यांना देण्यात येत असलेल्या परवान्यांवर पालिकेने नियंत्रण गमावले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पारंपारिकते बरोबर मसाल्यांच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारात रस्त्यावर बसणा-या विक्रेत्यांना व्यापारी परवाने पालिकेकडून देण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून बनावटगिरी केली जात असून दुकानात मिळणारी वस्तू रस्त्यावर उपलब्ध होवू लागल्याने ग्राहकांनी दुकानदारांकडे दुर्लक्ष केले आहे. शुक्रवारी बाजाराच्या दिवशी बाजारातून फिरणे कठीण झाले आहे. गुरांसोबत बाजारातून जाणारी वाहने व जागा मिळेल तिथे बसणा-या विक्रेत्यांमुळे परिणाम झाले आहेत. दुकानातील वस्तू रस्त्यावर मिळू लागल्याने तसेच त्यांच्यामुळे दुकाने ग्राहकांच्या नजरेला पडत नसल्याने परिणामात भर झाल्याची माहिती उपाध्यक्ष नरेश तिवरेकर यांनी दिली. 

बाजारातील परिस्थितीला पालिका जबाबदार असल्याचे आरोप समितीचे उपाध्यक्ष नरेश तिवरेकर यांनी केले. निरीक्षकांनी बाजारावरचे नियंत्रण गमावले आहे. त्यातून सुविधांचा अभाव झाला पालिकेचे मुख्याधिकारी बाजारात कधीच येत नसल्याची किंवा पाहणी सुद्धा करीत नसल्याची माहिती यावेळी दिली. व्यापा-यांकडून पालिकेला फक्त कराच्या रुपात महसूल प्राप्त होतो; पण रस्त्यावरील विक्रेत्यांकडून गैरमार्गाने प्राप्ती होत असल्याचे आरोपही तिवरेकर यांनी केले. 

काही विक्रेत्यांना बाजारातून हटवण्यात आले होते. हटवण्यात आलेल्यांचे पुर्नवसन करण्यात आले असले तरी त्यांच्या जागी नव्या विक्रेत्यांना बसवण्यात आले. भाजी तसेच मासळी मार्केटावरही दुर्लक्ष झाले असल्याने त्याचे परिणाम बाजारावर होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.  

गैरप्रकार नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेच्या मुख्याधिका-याचे बाजारावर नियंत्रण हवे असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. तसेच पोलिसांकडून सुद्धा त्यात लक्ष घालून गैरप्रकार थांबवणे गरजेचे असल्याची माहिती दिली. बाजारातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी व्यापारी संघटनेकडून सहकार्य करण्याची तयारी सुद्धा दर्शवण्यात आली. 

टॅग्स :goaगोवा