शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

गोमंतकीय युवकांना वाऱ्यावर सोडून दिले: विजय सरदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2024 10:39 IST

बेरोजगारी रोखण्यात अपयश

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील बेरोजगारीची टक्केवारी राष्ट्रीय टक्केवारीपेक्षा दुप्पट असल्याची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली आहे. यावरुन बेरोजगारी कमी करण्यास सरकारला पूर्णतः अपयश आले आहे, हे स्पष्ट होते असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला. सरकारने गोमंतकीय युवकांना अक्षरशः वाऱ्यांवर सोडून दिले आहे. भविष्यात हा एक मोठा समस्येचा विषय बनू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

सरदेसाई म्हणाले की, राज्यातील सरकारकडे बेरोजगारी कमी करण्याची मानसिकताच उपलब्ध नसून त्यांच्याकडे त्यासाठी कार्यपध्दतीही नाही. एकाबाजूने फार्मा उद्योग आपली नोकरभरती बाहेरच्या राज्यातून करत आहेत. सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे बेरोजगारी कमी करण्यासाठी कुठला दृष्टिकोन उपलब्ध नाही असा आरोप करताना सरदेसाई म्हणाले की, 'पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी गोमंतकीय युवकांना रोजगार मिळावा यासाठी झुआरी अॅग्रो कंपनीला ५० लाख चौ.मी. जागा प्रती चौ.मी. २५ पैसे या दराने दिली. 

मात्र सध्याच्या सरकारने हीच जमीन त्या कंपनीला औद्योगिक विभागातून वगळून सेटलमेंट विभागात बदलून दिली आहे. जेणेकरुन ही कंपनी राज्याबाहेरील धनाढ्यांसाठी घरे देऊ शकेल. त्याचा युवकांना रोजगारासाठी काडीचाही फायदा नाही. सरकारने अनास्था दाखविल्यास असंतोष निर्माण होईल.

रोजगारासाठी भटकंती

सरकारने गोमंतकीय युवकांना रोजगार देण्याची सक्ती करण्याचा कायदा आणला जाईल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगूनही त्यादृष्टीने काहीच झालेले नाही. दुसऱ्या बाजूने कामगार मंत्र्यांच्या कार्यालयातून युवकांना नोकऱ्या देण्यासाठी पैसे मागितले जातात. यामुळे युवक निराश झाले आहेत. ते रोजगाराच्या शोधासाठी राज्य सोडून दुसरीकडे जात आहेत, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.

 

टॅग्स :goaगोवाUnemploymentबेरोजगारी