शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोमंतकीय युवकांना वाऱ्यावर सोडून दिले: विजय सरदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2024 10:39 IST

बेरोजगारी रोखण्यात अपयश

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील बेरोजगारीची टक्केवारी राष्ट्रीय टक्केवारीपेक्षा दुप्पट असल्याची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली आहे. यावरुन बेरोजगारी कमी करण्यास सरकारला पूर्णतः अपयश आले आहे, हे स्पष्ट होते असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला. सरकारने गोमंतकीय युवकांना अक्षरशः वाऱ्यांवर सोडून दिले आहे. भविष्यात हा एक मोठा समस्येचा विषय बनू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

सरदेसाई म्हणाले की, राज्यातील सरकारकडे बेरोजगारी कमी करण्याची मानसिकताच उपलब्ध नसून त्यांच्याकडे त्यासाठी कार्यपध्दतीही नाही. एकाबाजूने फार्मा उद्योग आपली नोकरभरती बाहेरच्या राज्यातून करत आहेत. सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे बेरोजगारी कमी करण्यासाठी कुठला दृष्टिकोन उपलब्ध नाही असा आरोप करताना सरदेसाई म्हणाले की, 'पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी गोमंतकीय युवकांना रोजगार मिळावा यासाठी झुआरी अॅग्रो कंपनीला ५० लाख चौ.मी. जागा प्रती चौ.मी. २५ पैसे या दराने दिली. 

मात्र सध्याच्या सरकारने हीच जमीन त्या कंपनीला औद्योगिक विभागातून वगळून सेटलमेंट विभागात बदलून दिली आहे. जेणेकरुन ही कंपनी राज्याबाहेरील धनाढ्यांसाठी घरे देऊ शकेल. त्याचा युवकांना रोजगारासाठी काडीचाही फायदा नाही. सरकारने अनास्था दाखविल्यास असंतोष निर्माण होईल.

रोजगारासाठी भटकंती

सरकारने गोमंतकीय युवकांना रोजगार देण्याची सक्ती करण्याचा कायदा आणला जाईल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगूनही त्यादृष्टीने काहीच झालेले नाही. दुसऱ्या बाजूने कामगार मंत्र्यांच्या कार्यालयातून युवकांना नोकऱ्या देण्यासाठी पैसे मागितले जातात. यामुळे युवक निराश झाले आहेत. ते रोजगाराच्या शोधासाठी राज्य सोडून दुसरीकडे जात आहेत, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.

 

टॅग्स :goaगोवाUnemploymentबेरोजगारी