शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

गोमंतकीय युवकांना वाऱ्यावर सोडून दिले: विजय सरदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2024 10:39 IST

बेरोजगारी रोखण्यात अपयश

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील बेरोजगारीची टक्केवारी राष्ट्रीय टक्केवारीपेक्षा दुप्पट असल्याची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली आहे. यावरुन बेरोजगारी कमी करण्यास सरकारला पूर्णतः अपयश आले आहे, हे स्पष्ट होते असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला. सरकारने गोमंतकीय युवकांना अक्षरशः वाऱ्यांवर सोडून दिले आहे. भविष्यात हा एक मोठा समस्येचा विषय बनू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

सरदेसाई म्हणाले की, राज्यातील सरकारकडे बेरोजगारी कमी करण्याची मानसिकताच उपलब्ध नसून त्यांच्याकडे त्यासाठी कार्यपध्दतीही नाही. एकाबाजूने फार्मा उद्योग आपली नोकरभरती बाहेरच्या राज्यातून करत आहेत. सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे बेरोजगारी कमी करण्यासाठी कुठला दृष्टिकोन उपलब्ध नाही असा आरोप करताना सरदेसाई म्हणाले की, 'पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी गोमंतकीय युवकांना रोजगार मिळावा यासाठी झुआरी अॅग्रो कंपनीला ५० लाख चौ.मी. जागा प्रती चौ.मी. २५ पैसे या दराने दिली. 

मात्र सध्याच्या सरकारने हीच जमीन त्या कंपनीला औद्योगिक विभागातून वगळून सेटलमेंट विभागात बदलून दिली आहे. जेणेकरुन ही कंपनी राज्याबाहेरील धनाढ्यांसाठी घरे देऊ शकेल. त्याचा युवकांना रोजगारासाठी काडीचाही फायदा नाही. सरकारने अनास्था दाखविल्यास असंतोष निर्माण होईल.

रोजगारासाठी भटकंती

सरकारने गोमंतकीय युवकांना रोजगार देण्याची सक्ती करण्याचा कायदा आणला जाईल असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगूनही त्यादृष्टीने काहीच झालेले नाही. दुसऱ्या बाजूने कामगार मंत्र्यांच्या कार्यालयातून युवकांना नोकऱ्या देण्यासाठी पैसे मागितले जातात. यामुळे युवक निराश झाले आहेत. ते रोजगाराच्या शोधासाठी राज्य सोडून दुसरीकडे जात आहेत, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.

 

टॅग्स :goaगोवाUnemploymentबेरोजगारी