शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वसाहतवादी मानसिकतेचा त्याग करा : उपराष्ट्रपती नायडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 13:44 IST

इंग्रजी भाषेचा स्वीकार करावा पण मातृभाषेचा विसर नको. इंग्रजी भाषा हा आधार आहे, मात्र त्याची विचारसरणी हा आजार आहे. सांस्कृतिक मातृभाषेचा आधार घेऊन मातृभाषेच्या उन्नतेची जबाबदारी स्वीकारावी.

पणजी : इंग्रजी भाषेचा स्वीकार करावा पण मातृभाषेचा विसर नको. इंग्रजी भाषा हा आधार आहे, मात्र त्याची विचारसरणी हा आजार आहे. सांस्कृतिक मातृभाषेचा आधार घेऊन मातृभाषेच्या उन्नतेची जबाबदारी स्वीकारावी. संस्कृतीचे जतन व रक्षण करणे गरजेचे आहे. घरात, मित्रपरिवारांसोबत मातृभाषेतून संवाद साधावा. भारत हा मुळातच शांतताप्रिय व बहुभाषिक देश आहे. येथील भूगोल वेगळा, हवामान वेगळं, भाषा वेगळी, आचार-विचार वेगळे, तरीही देश एकसंघ आहे. ही भारताची खरी संस्कृती. इंग्रजी, रशियन, जर्मन, पोर्तुगीजसारख्या भाषा आवर्जून आत्मसात कराव्यात, पण त्याच्या वसाहतवादी विचारसरणीचा त्याग करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.

निमित्त होते, राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान गोव्याचा (एनआयटी) चौथा पदवीदान सोहळा. शुक्रवारी २८ सप्टेंबरला उपराष्ट्रपती नायडू व राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या उपस्थित हा सोहळा पणजी येथील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात झाला. या वेळी व्यासपीठावर प्रो. डॉ. गोपाल मुगेरया व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. 

उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, देशाचा आर्थिक विकासाचा दर वाढलेला आहे. हे अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक पाऊल आहे. २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात प्रतिभावावंताची कमी नाही. सगळ्यांना सरकारी नोक-या भेटू शकत नाहीत. त्यामुळे प्रतिभा व कौशल्याच्या जोरावर स्वयंरोजगार सुरू करावा. यासाठी सरकारी योजनांचा अवलंब करावा. देशाला स्वातंत्र्य मिळवून सुद्धा काहीप्रमाणात निरक्षरता, गरीबी, रोगराई, अत्याचार, शेतक-यांचे प्रश्न व त्यांची आत्महत्या, सामाजिक समस्या हे चिंतेचे विषय आहेत. यावर कायमस्वरुपी तोडगा हवा, असे ते म्हणाले.

‘आजही महिलांवर अत्याचार होतात. ही खूप खेदाची बाब. ज्या देशात नद्यांना महिला देवतांची नावे दिली आहेत, अशा ठिकाणी असे किळसवाणा प्रकार घडणे लजास्पद आहे. त्यामुळे महिलांचा आदर व त्यांच्या संरक्षणाची प्रतिज्ञा सर्वांनी घ्यावी, असेही नायडू म्हणाले.’ आजही देशात धर्माच्या नावाने दंगली व हिंसाचार होतो. दहशतवादींना कोणाताही धर्म, जात-पात, वर्णव्देष लागत नाही. हिंसाचार ही समाजाला लागलेली किड आहे. त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ हा गंभीर विषय आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थेतर्फे (एनआयटी, गोवा) आज मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली. मात्र आजारी असलेले मुख्यमंत्री पर्रीकर दिल्लीत उपचार घेत आहेत. त्यामुळे ही पदवी   प्रो. डॉ. गोपाल मुगेरया यांनी स्वीकारली. या वेळी एनआयटीच्या बी.टेक, एम.टेक व पीएचडीचे पदवीधर मिळून सुमारे १३३ विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पदवीदान देऊन गौरवण्यात आले. यातील ८६ विद्यार्थ्यांना बी.टेकची, ४२ विद्यार्थ्यांना एम.टेकची तर ५ संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडीची प्रदान करण्यात आली.

‘शॉटकर्ट’ नको : नायडू

विद्यार्थी जिवनात किंवा आयुष्यात कधीही शॉटकर्ट मार्गाचा अवलंब करू नये, असा सल्लाही उपराष्ट्रपती नायडू या विद्यार्थ्यांना दिला. पदवी मिळाल्यानंतर ख-या आयुष्याला सुरुवात होते. जीवन हे शिक्षण प्रक्रिया असून त्याला खंड पडता कामा नये. जिवनात आव्हानांसोबत संधी सुध्दा येतात. त्याला धाडसाने सामोरे जावा. ध्येय व स्वप्न मोठं असावं, पण त्याला कष्टाची जोडही असावी. तरच ते सत्यात उतरेल. तत्त्वे व नैतिकत्ता यांना कधीही बगल देऊ नका, असे नायडू यांनी सांगितले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूgoaगोवा