शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

वसाहतवादी मानसिकतेचा त्याग करा : उपराष्ट्रपती नायडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 13:44 IST

इंग्रजी भाषेचा स्वीकार करावा पण मातृभाषेचा विसर नको. इंग्रजी भाषा हा आधार आहे, मात्र त्याची विचारसरणी हा आजार आहे. सांस्कृतिक मातृभाषेचा आधार घेऊन मातृभाषेच्या उन्नतेची जबाबदारी स्वीकारावी.

पणजी : इंग्रजी भाषेचा स्वीकार करावा पण मातृभाषेचा विसर नको. इंग्रजी भाषा हा आधार आहे, मात्र त्याची विचारसरणी हा आजार आहे. सांस्कृतिक मातृभाषेचा आधार घेऊन मातृभाषेच्या उन्नतेची जबाबदारी स्वीकारावी. संस्कृतीचे जतन व रक्षण करणे गरजेचे आहे. घरात, मित्रपरिवारांसोबत मातृभाषेतून संवाद साधावा. भारत हा मुळातच शांतताप्रिय व बहुभाषिक देश आहे. येथील भूगोल वेगळा, हवामान वेगळं, भाषा वेगळी, आचार-विचार वेगळे, तरीही देश एकसंघ आहे. ही भारताची खरी संस्कृती. इंग्रजी, रशियन, जर्मन, पोर्तुगीजसारख्या भाषा आवर्जून आत्मसात कराव्यात, पण त्याच्या वसाहतवादी विचारसरणीचा त्याग करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.

निमित्त होते, राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान गोव्याचा (एनआयटी) चौथा पदवीदान सोहळा. शुक्रवारी २८ सप्टेंबरला उपराष्ट्रपती नायडू व राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या उपस्थित हा सोहळा पणजी येथील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात झाला. या वेळी व्यासपीठावर प्रो. डॉ. गोपाल मुगेरया व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. 

उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, देशाचा आर्थिक विकासाचा दर वाढलेला आहे. हे अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक पाऊल आहे. २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात प्रतिभावावंताची कमी नाही. सगळ्यांना सरकारी नोक-या भेटू शकत नाहीत. त्यामुळे प्रतिभा व कौशल्याच्या जोरावर स्वयंरोजगार सुरू करावा. यासाठी सरकारी योजनांचा अवलंब करावा. देशाला स्वातंत्र्य मिळवून सुद्धा काहीप्रमाणात निरक्षरता, गरीबी, रोगराई, अत्याचार, शेतक-यांचे प्रश्न व त्यांची आत्महत्या, सामाजिक समस्या हे चिंतेचे विषय आहेत. यावर कायमस्वरुपी तोडगा हवा, असे ते म्हणाले.

‘आजही महिलांवर अत्याचार होतात. ही खूप खेदाची बाब. ज्या देशात नद्यांना महिला देवतांची नावे दिली आहेत, अशा ठिकाणी असे किळसवाणा प्रकार घडणे लजास्पद आहे. त्यामुळे महिलांचा आदर व त्यांच्या संरक्षणाची प्रतिज्ञा सर्वांनी घ्यावी, असेही नायडू म्हणाले.’ आजही देशात धर्माच्या नावाने दंगली व हिंसाचार होतो. दहशतवादींना कोणाताही धर्म, जात-पात, वर्णव्देष लागत नाही. हिंसाचार ही समाजाला लागलेली किड आहे. त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ हा गंभीर विषय आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थेतर्फे (एनआयटी, गोवा) आज मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली. मात्र आजारी असलेले मुख्यमंत्री पर्रीकर दिल्लीत उपचार घेत आहेत. त्यामुळे ही पदवी   प्रो. डॉ. गोपाल मुगेरया यांनी स्वीकारली. या वेळी एनआयटीच्या बी.टेक, एम.टेक व पीएचडीचे पदवीधर मिळून सुमारे १३३ विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पदवीदान देऊन गौरवण्यात आले. यातील ८६ विद्यार्थ्यांना बी.टेकची, ४२ विद्यार्थ्यांना एम.टेकची तर ५ संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडीची प्रदान करण्यात आली.

‘शॉटकर्ट’ नको : नायडू

विद्यार्थी जिवनात किंवा आयुष्यात कधीही शॉटकर्ट मार्गाचा अवलंब करू नये, असा सल्लाही उपराष्ट्रपती नायडू या विद्यार्थ्यांना दिला. पदवी मिळाल्यानंतर ख-या आयुष्याला सुरुवात होते. जीवन हे शिक्षण प्रक्रिया असून त्याला खंड पडता कामा नये. जिवनात आव्हानांसोबत संधी सुध्दा येतात. त्याला धाडसाने सामोरे जावा. ध्येय व स्वप्न मोठं असावं, पण त्याला कष्टाची जोडही असावी. तरच ते सत्यात उतरेल. तत्त्वे व नैतिकत्ता यांना कधीही बगल देऊ नका, असे नायडू यांनी सांगितले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूgoaगोवा