शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

विर्डी धरण परिसराची गोव्याकडून तातडीने पाहणी; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 08:38 IST

जलस्रोत विभाग लागला कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोलीः महाराष्ट्राने तब्बल सात वर्षांच्या विश्रांतीनंतर म्हादईची उपनदी असलेल्या वाळवंटी नदीवर विर्डी धरणाचे काम पुन्हा सुरू केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोव्याच्या दोन्ही शेजारील राज्यांनी आता पाण्यासाठी शह देण्यास आरंभ केल्याने राज्यावर जलसंकट ओढवण्याची भीती आहे. या बेकायदा कृतीची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली असुन जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना तातडीने धरण भागाची पाहणी करून सविस्तर अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. 

मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी या संदर्भात तातडीने कृती करताना गोवा जलसंसाधन खात्याचे तसेच म्हादई सेल कार्यकारी अभियंता दिलीप नाईक व त्यांच्या टीमला विर्डी येथे जाऊन सविस्तर अहवाल व एकूण परिस्थितीचे करण्यास पाठवले. या टीमने या भागाची पाहणी केली असून ते आपला अहवाल सदर करणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी नसल्याने असे काम सुरू करता येत नाही. त्यामुळे आवश्यक पाऊले तातडीने उचलण्यात येत असून अहवाल हाती येताच पुढील कृती करण्याबाबत निश्चित केले आहे.

महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी संपर्क

मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी महाराष्ट्र अधिकाऱ्यांशी संपर्क करून याबाबतचा तपशील गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे. विर्डी येथील चालू असलेले काम बेकायदा असल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आगामी भुमीका निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युद्धपातळीवर काम

सध्या अवजड मशिनरी तसेच मोठे ट्रक, जेसीबी व इतर मशिनरींच्या सहाय्याने युध्दपातळीवर काम सुरु आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणा वक्षतोड करून जाळपोळ करून परिसर साफ केला जात आहे. पश्चिम रत्नागिरी पाटबंधारे खात्यातर्फे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचेही सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी कठोर व्हावे 

हलतरा नदीवर एका बाजूने कर्नाटक व आता महाराष्ट्राने धरणाचे बेत निश्चित केल्याने दुहेरी भीती आहे. वाळवंटी नदीवर असलेले साखळी व पदोषे जलप्रकल्प संकटात येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कडक भुमीका घेण्याची मागणी केरकर यांनी केली आहे.

काय म्हणाला होता लवाद ?

पर्यावरण कार्यकर्ता राजेंद्र केरकर यांच्या मते महाराष्ट्राला लवादाने १.३३ टीएमसी पाणी वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र बोगदा तयार करून तिळारी खोऱ्यात पाणी नेण्याची योजना आहे. २०१३ साली लवादाच्या शिष्टमंडळाने भेट दिली. त्यावेळी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना कान पिचक्या देताच बेकायदा चालू असलेले काम बंद ठेवले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाMaharashtraमहाराष्ट्र