शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

विर्डी धरण परिसराची गोव्याकडून तातडीने पाहणी; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 08:38 IST

जलस्रोत विभाग लागला कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोलीः महाराष्ट्राने तब्बल सात वर्षांच्या विश्रांतीनंतर म्हादईची उपनदी असलेल्या वाळवंटी नदीवर विर्डी धरणाचे काम पुन्हा सुरू केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोव्याच्या दोन्ही शेजारील राज्यांनी आता पाण्यासाठी शह देण्यास आरंभ केल्याने राज्यावर जलसंकट ओढवण्याची भीती आहे. या बेकायदा कृतीची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली असुन जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना तातडीने धरण भागाची पाहणी करून सविस्तर अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. 

मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी या संदर्भात तातडीने कृती करताना गोवा जलसंसाधन खात्याचे तसेच म्हादई सेल कार्यकारी अभियंता दिलीप नाईक व त्यांच्या टीमला विर्डी येथे जाऊन सविस्तर अहवाल व एकूण परिस्थितीचे करण्यास पाठवले. या टीमने या भागाची पाहणी केली असून ते आपला अहवाल सदर करणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी नसल्याने असे काम सुरू करता येत नाही. त्यामुळे आवश्यक पाऊले तातडीने उचलण्यात येत असून अहवाल हाती येताच पुढील कृती करण्याबाबत निश्चित केले आहे.

महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी संपर्क

मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी महाराष्ट्र अधिकाऱ्यांशी संपर्क करून याबाबतचा तपशील गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे. विर्डी येथील चालू असलेले काम बेकायदा असल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आगामी भुमीका निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युद्धपातळीवर काम

सध्या अवजड मशिनरी तसेच मोठे ट्रक, जेसीबी व इतर मशिनरींच्या सहाय्याने युध्दपातळीवर काम सुरु आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणा वक्षतोड करून जाळपोळ करून परिसर साफ केला जात आहे. पश्चिम रत्नागिरी पाटबंधारे खात्यातर्फे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचेही सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी कठोर व्हावे 

हलतरा नदीवर एका बाजूने कर्नाटक व आता महाराष्ट्राने धरणाचे बेत निश्चित केल्याने दुहेरी भीती आहे. वाळवंटी नदीवर असलेले साखळी व पदोषे जलप्रकल्प संकटात येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कडक भुमीका घेण्याची मागणी केरकर यांनी केली आहे.

काय म्हणाला होता लवाद ?

पर्यावरण कार्यकर्ता राजेंद्र केरकर यांच्या मते महाराष्ट्राला लवादाने १.३३ टीएमसी पाणी वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र बोगदा तयार करून तिळारी खोऱ्यात पाणी नेण्याची योजना आहे. २०१३ साली लवादाच्या शिष्टमंडळाने भेट दिली. त्यावेळी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना कान पिचक्या देताच बेकायदा चालू असलेले काम बंद ठेवले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाMaharashtraमहाराष्ट्र