शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

विर्डी धरण परिसराची गोव्याकडून तातडीने पाहणी; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 08:38 IST

जलस्रोत विभाग लागला कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोलीः महाराष्ट्राने तब्बल सात वर्षांच्या विश्रांतीनंतर म्हादईची उपनदी असलेल्या वाळवंटी नदीवर विर्डी धरणाचे काम पुन्हा सुरू केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोव्याच्या दोन्ही शेजारील राज्यांनी आता पाण्यासाठी शह देण्यास आरंभ केल्याने राज्यावर जलसंकट ओढवण्याची भीती आहे. या बेकायदा कृतीची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली असुन जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना तातडीने धरण भागाची पाहणी करून सविस्तर अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. 

मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी या संदर्भात तातडीने कृती करताना गोवा जलसंसाधन खात्याचे तसेच म्हादई सेल कार्यकारी अभियंता दिलीप नाईक व त्यांच्या टीमला विर्डी येथे जाऊन सविस्तर अहवाल व एकूण परिस्थितीचे करण्यास पाठवले. या टीमने या भागाची पाहणी केली असून ते आपला अहवाल सदर करणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी नसल्याने असे काम सुरू करता येत नाही. त्यामुळे आवश्यक पाऊले तातडीने उचलण्यात येत असून अहवाल हाती येताच पुढील कृती करण्याबाबत निश्चित केले आहे.

महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी संपर्क

मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी महाराष्ट्र अधिकाऱ्यांशी संपर्क करून याबाबतचा तपशील गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे. विर्डी येथील चालू असलेले काम बेकायदा असल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आगामी भुमीका निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युद्धपातळीवर काम

सध्या अवजड मशिनरी तसेच मोठे ट्रक, जेसीबी व इतर मशिनरींच्या सहाय्याने युध्दपातळीवर काम सुरु आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणा वक्षतोड करून जाळपोळ करून परिसर साफ केला जात आहे. पश्चिम रत्नागिरी पाटबंधारे खात्यातर्फे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचेही सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी कठोर व्हावे 

हलतरा नदीवर एका बाजूने कर्नाटक व आता महाराष्ट्राने धरणाचे बेत निश्चित केल्याने दुहेरी भीती आहे. वाळवंटी नदीवर असलेले साखळी व पदोषे जलप्रकल्प संकटात येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कडक भुमीका घेण्याची मागणी केरकर यांनी केली आहे.

काय म्हणाला होता लवाद ?

पर्यावरण कार्यकर्ता राजेंद्र केरकर यांच्या मते महाराष्ट्राला लवादाने १.३३ टीएमसी पाणी वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र बोगदा तयार करून तिळारी खोऱ्यात पाणी नेण्याची योजना आहे. २०१३ साली लवादाच्या शिष्टमंडळाने भेट दिली. त्यावेळी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना कान पिचक्या देताच बेकायदा चालू असलेले काम बंद ठेवले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाMaharashtraमहाराष्ट्र