शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

गोव्यात रेशनसाठी आलेल्या धान्याची तस्करी;  एसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 22:28 IST

गोदामात उतरविले जात असता दक्षता खात्याच्या लाचलुचपत विरोधी विभागाच्या पथकाने शुक्रवारी पहाटे कोलवाळ येथे धाड घालून रंगेहाथ पकडले.

पणजी : गोव्यातील स्वस्त धान्य दुकानांसाठी आलेले तांदूळ, गहू आदी धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी कोलवाळ येथे एका खासगी गोदामात उतरविले जात असता दक्षता खात्याच्या लाचलुचपत विरोधी विभागाच्या पथकाने शुक्रवारी पहाटे कोलवाळ येथे धाड घालून रंगेहाथ पकडले. हे धान्य कोल्हापूरकडे वळविण्याचा डाव होता, अशी प्राथमिक माहिती मिळते. 

एसीबीच्या अधिका-यांनी या कारवाईबाबत मात्र कमालीची गुप्तता बाळगली असून, तोंड बंद ठेवले आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सत्तरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांसाठी तांदूळ तसेच गव्हाचा हा साठा आला होता, परंतु तो परस्पर कोलवाळ येथे एका खासगी गोदामात वळविण्यात आला. तेथे तो उतरवून घेऊन नंतर वेगळ्या पिशव्यांमध्ये भरून कोल्हापूरकडे रवाना केला जाणार होता. परंतु त्याआधीच ही धाड टाकण्यात आली. कोलवाळ येथे हीरा पेट्रोल पंपच्या मागील बाजूस खासगी गोदाम आहे. पहाटे हे छापासत्र सुरू झाले. 

दरम्यान, लाचलुचपतविरोधी विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही अधिक माहिती देण्याचे टाळले. भादंविच्या कलम ४0६ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ खाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, एवढेच सांगण्यात आले. रेशन धान्याचा काळाबाजार करण्याचा असाच प्रकार राज्यात अन्यत्रही चालू होता का, हे तपासण्यासाठी गुप्तता पाळण्यात आल्याचे सांगण्यात आले. ‘याक्षणी याबाबत अधिक माहिती देता येणार नाही.’ असे अधिका-यांनी स्पष्ट केले. 

एका वजनदार राजकीय नेत्याच्या दबावाखाली ही कारवाई काही वेळातच गुंडाळण्यात आल्याची चर्चा होती. परंतु एसीबीच्या अधिका-यांनी ती फेटाळून लावली. राज्यात अन्य ठिकाणीही असे प्रकार चालू असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने चौकशी चालू होती, त्यामुळे कारवाईबाबत काही गोष्टी उघड करण्यात आल्या नाहीत, असे सांगण्यात आले. 

गोव्यातील सुमारे ४५0 रेशन दुकानांसाठी तांदूळ व गव्हाचा कोटा भारतीय अन्न महामंडळाच्या वास्को आणि वेर्णा येथील गोदामांमध्ये येतो. हा माल रेल्वे वाघिणींमधून येतो. गहू चंदीगढ, पंजाबहून येतो. हे धान्य नंतर ट्रकांमधून वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये रेशन दुकानांसाठी पाठवले जाते. वरील प्रकरणात भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून उचललेला माल प्रत्यक्षात सत्तरी तालुक्यात वितरणासाठी गेलाच नाही, तर तो थेट कोलवाळ येथे खासगी गोदामात नेण्यात आला. तेथून तो वेगळ्या पोत्यांमध्ये भरून काळ्या बाजारात विकण्यासाठी अन्यत्र पाठवला जाणार होता, असा संशय आहे. अधिकारी या दृष्टिकोनातून तपास करीत आहेत.