शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात रेशनसाठी आलेल्या धान्याची तस्करी;  एसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 22:28 IST

गोदामात उतरविले जात असता दक्षता खात्याच्या लाचलुचपत विरोधी विभागाच्या पथकाने शुक्रवारी पहाटे कोलवाळ येथे धाड घालून रंगेहाथ पकडले.

पणजी : गोव्यातील स्वस्त धान्य दुकानांसाठी आलेले तांदूळ, गहू आदी धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी कोलवाळ येथे एका खासगी गोदामात उतरविले जात असता दक्षता खात्याच्या लाचलुचपत विरोधी विभागाच्या पथकाने शुक्रवारी पहाटे कोलवाळ येथे धाड घालून रंगेहाथ पकडले. हे धान्य कोल्हापूरकडे वळविण्याचा डाव होता, अशी प्राथमिक माहिती मिळते. 

एसीबीच्या अधिका-यांनी या कारवाईबाबत मात्र कमालीची गुप्तता बाळगली असून, तोंड बंद ठेवले आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सत्तरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांसाठी तांदूळ तसेच गव्हाचा हा साठा आला होता, परंतु तो परस्पर कोलवाळ येथे एका खासगी गोदामात वळविण्यात आला. तेथे तो उतरवून घेऊन नंतर वेगळ्या पिशव्यांमध्ये भरून कोल्हापूरकडे रवाना केला जाणार होता. परंतु त्याआधीच ही धाड टाकण्यात आली. कोलवाळ येथे हीरा पेट्रोल पंपच्या मागील बाजूस खासगी गोदाम आहे. पहाटे हे छापासत्र सुरू झाले. 

दरम्यान, लाचलुचपतविरोधी विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही अधिक माहिती देण्याचे टाळले. भादंविच्या कलम ४0६ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ खाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, एवढेच सांगण्यात आले. रेशन धान्याचा काळाबाजार करण्याचा असाच प्रकार राज्यात अन्यत्रही चालू होता का, हे तपासण्यासाठी गुप्तता पाळण्यात आल्याचे सांगण्यात आले. ‘याक्षणी याबाबत अधिक माहिती देता येणार नाही.’ असे अधिका-यांनी स्पष्ट केले. 

एका वजनदार राजकीय नेत्याच्या दबावाखाली ही कारवाई काही वेळातच गुंडाळण्यात आल्याची चर्चा होती. परंतु एसीबीच्या अधिका-यांनी ती फेटाळून लावली. राज्यात अन्य ठिकाणीही असे प्रकार चालू असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने चौकशी चालू होती, त्यामुळे कारवाईबाबत काही गोष्टी उघड करण्यात आल्या नाहीत, असे सांगण्यात आले. 

गोव्यातील सुमारे ४५0 रेशन दुकानांसाठी तांदूळ व गव्हाचा कोटा भारतीय अन्न महामंडळाच्या वास्को आणि वेर्णा येथील गोदामांमध्ये येतो. हा माल रेल्वे वाघिणींमधून येतो. गहू चंदीगढ, पंजाबहून येतो. हे धान्य नंतर ट्रकांमधून वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये रेशन दुकानांसाठी पाठवले जाते. वरील प्रकरणात भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून उचललेला माल प्रत्यक्षात सत्तरी तालुक्यात वितरणासाठी गेलाच नाही, तर तो थेट कोलवाळ येथे खासगी गोदामात नेण्यात आला. तेथून तो वेगळ्या पोत्यांमध्ये भरून काळ्या बाजारात विकण्यासाठी अन्यत्र पाठवला जाणार होता, असा संशय आहे. अधिकारी या दृष्टिकोनातून तपास करीत आहेत.