शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

''किनारे सुरक्षेप्रकरणी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना बडतर्फ करा''

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 21:11 IST

जीवरक्षकांना एस्मा लावण्याची धमकी देणा-या पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

पणजी : किना-यांवर सेवा बजावणा-या जीवरक्षकांना छळ करणा-या कंत्राटदार दृष्टी लाइफ सेविंग कंपनीवर कारवाई करण्याचे सोडून जीवरक्षकांना एस्मा लावण्याची धमकी देणा-या पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

पत्रकार परिषदेत पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या स्वाती केरकर म्हणाल्या की, गोमंतकीय जीवरक्षकांना एस्मा लावण्याची धमकी देणे हेच ते खरे गोंयकारपण का? हेही मुख्यमंत्र्यानी स्पष्ट करावे. गेल्या दोन आठवड्यात किनाºयांवर  दोन पर्यटक व एक स्थानिक अशा तीन लोकांना दुर्दैवी मृत्यु आला. या घटनांना किनारे सुरक्षा व जीवरक्षक सुविधा पुरविणारी मेसर्स दृष्टी  कंपनी तसेच पर्यटन खाते पूर्णपणे जबाबदार आहे. 

केरकर म्हणाल्या की, ‘सरकारकडून १४१ कोटी उकळल्यानंतरसुद्धा या कंत्राटदार कंपनीने जीवरक्षकांना पगार वेळेवर दिला नाही. वॉकी-टॉकी सारखी उपकरणे तसेच जीवरक्षकाना पिण्याचे पाणी सुद्धा देण्याचे सौजन्य न दाखवणाºया मेसर्स दृष्टी कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचे सोडून आपल्या जीवाची बाजी लावणाºया जीवरक्षकाना एस्मा लावण्याची धमकी देणारे भाजप सरकार गोमंतकीयांप्रती असंवेदनशील असल्याचे उघड झाले आहे.’ 

‘सरकारने जीवरक्षकांना धमकावण्याचा व त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करु नये, त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. सरकारने ताबडतोब सर्व जीवरक्षकांना सरकारी सेवेत घ्यावे व माजी नौदल व लष्करीअधिकारी यांची नेमणूक करुन त्यांची देखरेख व मार्गदर्शनाखाली किनारे सुरक्षा व जीवरक्षक सेवा पुरवावी,’ असेही केरकर यांनी म्हटले आहे. 

केरकर म्हणतात की, ‘पर्यटन मंत्री बाबू आजगावकर याचे 'मिशन ३० टक्के कमिशन' हे एकमेव ध्येय असून त्याना इतर कशाचेही सोयर सुतक नाही. त्यामुळेच दृष्टी कंपनीला बडतर्फ करण्याची हिंमत त्यांना नाही. त्यांनी आजपर्यंत आपल्या कुटुंबियांसह केलेल्या विदेश वारींचा खर्च तसेच त्यांच्या बरोबर विदेश दौºयावर गेलेले सरकारी  नोकर असलेले  त्यांचे बंधू डॉ. श्रीकांत व भावजय रश्मी यांची परदेशवारी त्यांच्या स्वखर्चाने केल्याचे हिंमत असल्यास सिद्ध करून दाखवावे.’