शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांमुळे प्रशासनाचा बट्ट्याबोळ, पर्यटनाला फटका- रोहन खंवटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 19:35 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वत:च्या बुद्धीने विचारच करत नाहीत.

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वत:च्या बुद्धीने विचारच करत नाहीत. त्यामुळेच 144 कलम लागू करून सरकारने घोळ केला व त्याचा मोठा फटका गोव्याच्या पर्यटनाला बसला आहे, अशी टीका अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी शनिवारी येथे केली. मुख्यमंत्र्यांकडे योग्य अशा नेतृत्वाची क्षमताच नसल्याने सध्या प्रशासनाचा बट्टय़ाबोळ झाला आहे व राज्य कर्जात अडकले आहे, असेही खंवटेम्हणाले.

खंवटे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याला दहशतवादापासून धोका असल्याने कलम 144 लागू करण्यात आल्याचे सरकारने अगोदर जाहीर केले होते. आता मुख्यमंत्री म्हणतात की- दहशतवादाचा धोकाच नाही व त्यामुळे कलम 144 मागे घेण्याचा विचार ते करतात. पाचच दिवसांत दहशतवादाचा धोका टळला काय असा प्रश्न येतो. नीट अभ्यास व विचार न करताच मुख्यमंत्री वागत असल्याने परिणाम पर्यटन क्षेत्रला भोगावे लागत आहेत.

माझे काही मित्र दरवर्षी कार्निव्हलवेळी गोव्यात येतात. त्यांनी यावेळी दहशतवादाचा धोका असल्याने व कलम 144 लागू झाल्याने आपण येत नाही असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी नुकताच अर्थसंकल्प मांडला व राज्याचा 353 कोटींचा शिलकी म्हणजे अतिरिक्त महसुलाचा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. मात्र आता पुन्हा सरकार कर्ज घेऊ लागले आहे. नुकतेच शंभर कोटींचे कर्ज घेतले गेले. सरकार कर्ज घेऊन ते पूर्वीच्याच कर्जावरील व्याज भरण्यासाठी तसेच कर्मचा:यांना वेतन देण्यासाठी वापरत आहे. राज्याचा महसुल कसा वाढवावा याचे कोणतेही नवे मार्ग मुख्यमंत्र्यांना सूचत नाही, असे खंवटे म्हणाले.

माविनच्या भावाला वाचवतात

कायदा व सुव्यवस्था पूर्ण बिघडली आहे. मुख्यमंत्री सध्या प्रकाश नाईक मृत्यू प्रकरणात मंत्री माविन गुदिन्हो यांच्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रकाशचा खून झालाय असा नवा कोन पोलिसांनी दिला व चौकशी भलत्याच दिशेने नेली आहे. विल्सन गुदिन्हो या प्रकरणातून सहीसलामत सुटावा यासाठी सरकारची ही धडपड आहे, असा आरोप खंवटे यांनी केला. बागा येथे ला कालिप्सो हॉटेलमध्ये गुंड घुसतात व पर्यटकांना, कर्मचाऱ्यांना ओलीस धरतात.

पोलिस तिथेही कमी पडले. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आरक्षण प्रक्रियेतही मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप सुरू आहे. महालक्ष्मी बंगल्यावर बसून विरोधकांच्या ताब्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघांचे आरक्षण बदलण्याचे काम सुरू आहे, असे खंवटे म्हणाले. अधिका:यांनी मुख्यमंत्र्यांकडे आरक्षणाविषयी कोणती फाईल पाठवली होती, त्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. एकदा आरक्षण बदलून आल्यानंतर मग आम्ही सगळी स्थिती जाहीर करू, असाही इशारा खंवटे यांनी दिला.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा