शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला विरोध करणार्‍यांनी खुशाल कोर्टात जावे : मनोहर पर्रिकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 14:26 IST

गोव्यात नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला  विरोध करणार्‍यांनी खुशाल कोर्टात जावे, असा सल्ला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला.

पणजी - गोव्यात नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला  विरोध करणार्‍यांनी खुशाल कोर्टात जावे, असा सल्ला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिला. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणा बाबत परस्पर समझोता कराराच्या मसुद्याचे सादरीकरण राज्यातील आमदार,  बिगर शासकीय संघटना, सरपंच यांच्या समोर करण्यात आले. त्यावेळी  विरोध करणार्‍या संघटनांनी निदर्शनेही केली.

मुख्यमंत्र्यांनी समर्थन करताना सांगितले की, हे राष्ट्रीयीकरण नसून नद्यांना केवळ राष्ट्रीय महत्त्व दिले जाणार आहे. परस्पर समझोता करार महत्त्वाचा आहे कारण या कराराद्वारे भारतीय अंतर्गत जलवाहतूक प्राधिकरणाकडून काही अधिकार बंदर कप्तान खात्याला मिळणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परवान्यांसाठी केंद्राकडे जावे लागणार नाही तर बंदर कप्तान हे सर्व परवाने देऊ शकतील.  केंद्राकडून मिळणाऱ्या निधीतून राज्यातील नद्यामधील गाळ उपसण्याचे काम करता येईल ज्यामुळे अंतर्गत जलवाहतुकीसाठी या नद्या उपयुक्त ठरतील. 

सध्या साळ  तसेच मांडवी नदीतील प्रदूषण पाहता ते अत्यंत धोकादायक बनले आहे. राज्यातील प्रमुख नद्यांमधील गाळ उपसणे महत्वाचे आहे या सर्व नद्यांची साफसफाई हाती घेतली तर सुमारे दोन हजार कोटी रुपये लागतील. केवळ साळ नदीतील गाळ उपसणेवरच साठ ते सत्तर कोटी रुपये लागतील. हा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त होणार आहे.  पर्रीकर म्हणाले की, 2016 मध्ये संसदेत कायदा झाला त्यावेळी कोणीही विरोध केला नाही. हा कायदा आता लागू झाला असून परस्पर समझोता करार केला नाही तरीसुध्दा तो लागू आहे.  त्यामुळे राज्य सरकार त्यात अधिक काही करू शकत नाही. 

केंद्राकडे सल्लामसलत करून  दोन महत्वाच्या तरतुदींचा परस्पर समझोता करारात अंतर्भाव केलेला आहे त्यातील एका कलमानुसार राज्य सरकारच्या बंदर कप्तान कडे बहुतांश अधिकार येणार आहेत.  नद्यांमध्ये किंवा नदीकिनारी  वगैरे कोणतेही बांधकाम करायचे झाल्यास बंदर कप्तान परवाने देऊ शकतील  2016 च्‍या वरील कायद्यामुळे किंवा या करारामुळे गोव्यातील नद्यांचे सर्व अधिकार केंद्राकडे जातील ही चुकीची समजूत असून काही लोक त्याबाबत दिशाभूल करीत आहेत,   हे योग्य नव्हे,  असे पर्रीकर म्हणाले. काँग्रेसचे आमदार रवि नाईक यांनी हा करार हवाच कशाला, त्याऐवजी केंद्रातून निधी आणून नद्यांची साफसफाई करा,असा सल्ला दिला आणि या करारास काँग्रेसचा सक्त विरोध असल्याचे सांगितले.  

त्यावर मुख्यमंत्र्यांनी करारामुळे उलट बंदर कप्तान खात्याला अधिकार प्राप्त होतील व कोणतेही परवान्यासाठी केंद्राकडे जावे लागणार नाही उलट करार न केल्यास प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारकडे धाव घ्यावी लागेल,  असे सांगितले.  विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, आमदार नीळकंठ हळर्णकर, विल्फ्रेड डीसा,  टोनी फर्नांडिस यावेळी उपस्थित होते. मंत्री जयेश साळगावकर, मंत्री विनोद पालयेकर, महसूलमंत्री रोहन खंवटे,  राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव,  अपक्ष आमदार प्रसाद गांवकर, आदी यावेळी उपस्थित होते . 

भारत मुक्ती मोर्चा संघटनेच्या अध्यक्षा मॅगी सिल्वेरा  तसेच संघटनांच्या प्रतिनिधींनी या वेळी काही प्रश्न विचारून नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाआपली भीती व्यक्त केली. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अशी माहिती दिली की,  केंद्र सरकार नद्यांच्या साफसफाई व तसेच गाळ उपसण्यावर जेवढा खर्च करणार आहे त्याच्या दोन टक्के रक्कम उलट राज्य सरकारला प्राप्त होणार आहे . गोव्यातील नद्या अंतर्गत जलवाहतुकीसाठी सुलभ आणि सुटसुटीत करण्याचे उद्दिष्ट आहे.  राज्यातील नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.  दक्षिण गोव्यातील नदीत साळ तसेच मांडवी नदीत इ कोलिफाॅम मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.  या नद्या घातक ठरल्या आहेत.  या सादरीकरणावेळी बाहेर हातात फलक घेऊन काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली जोरदार निदर्शने केली. मुख्यमंत्री सादरीकरण पूर्ण झाल्यानंतर खाली उतरले तेव्हा शेम, शेम अशा घोषणाही दिल्या. कार्यकर्त्यांच्या हातात निषेधाचे फलक होते.

टॅग्स :goaगोवा