शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

गोव्यात स्वच्छ भारत मोहीमेचे तीनतेरा, दोन्ही जिल्हे 'उघड्यावरील शौचा'पासून मुक्त नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 14:10 IST

जागतिक नकाशावर लौकीकप्राप्त पर्यटनस्थळ म्हणून झळकणा-या तसेच साक्षरतेच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या गोव्यात दोनपैकी एकही जिल्हा खुल्या नैसर्गिक विधीपासून मुक्त नसल्याचे केंद्र सरकारला आढळून आले आहे.

पणजी : जागतिक नकाशावर लौकीकप्राप्त पर्यटनस्थळ म्हणून झळकणा-या तसेच साक्षरतेच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या गोव्यात दोनपैकी एकही जिल्हा खुल्या नैसर्गिक विधीपासून मुक्त नसल्याचे केंद्र सरकारला आढळून आले आहे. स्वच्छ भारत मोहीमेला तीन वर्षे उलटली तरी राज्यात ही स्थिती आहे. गोवा हे दोन जिल्ह्यांचेच लहान राज्य असल्याने स्वच्छ भारत मोहिमेची अंमलबजावणी यशस्वीपणे व्हायला हवी होती, असे केंद्राचे म्हणणे आहे. 

स्वच्छ भारत मोहीमेच्या ग्रामीण भागातील मोहिमेबाबत केंद्राची अधिकृत आकडेवारी अशी सांगते की, २0१४ ही मोहीम सुरू झाली त्या वर्षी राज्य स्तरावर सरासरी कव्हरेज ६0.५९ टक्के तर २0१५-१६ मध्ये सरासरी ७६.२२ टक्के कव्हरेज होते. त्यानंतर कव्हरेज वाढलेच नाही. उत्तर गोव्यात ७७.८४ टक्के तर दक्षिण गोव्यात ७३.८१ टक्के भागात ही मोहीम पोहोचली आहे. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे असे म्हणणे आहे की, गोव्यात जमिनींचे प्रश्न भरपूर आहेत. कूळ कायदा, मुंडकार कायदा, सीआरझेड तसेच अन्य अनेक गोष्टींमुळे शौचालयांच्या बांधकामांना अडथळे येत आहेत, त्यावर आता तोडगा काढणार आहोत. हा विषय सरकारने प्राधान्यक्रमे हाती घेतला आहे. येत्या आॅक्टोबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत गोवा राज्य खुल्या जागेत नैसर्गिक विधींपासून मुक्त करण्याचे सरकारचे उदिद्ष्ट आहे. 

शनिवारी मडगांव येथे एका कार्यक्रमात राज्यात ७0 हजार शौचालयं बांधण्यात येणार असल्याचे आणि येत्या 2 आॅक्टोबरपर्यंत या गोष्टीची पूर्तता करणार असल्याचे त्यानी जाहीर केले होते.  बिहार, मणिपूरमध्येही असाच एकही खुल्या नैसर्गिक विधिपासून मुक्त जिल्हा सापडू शकला नाही. बिहारमध्ये ३८ तर मणिपूरमध्ये ९ जिल्हे आहेत. केंद्रीय जल मंत्रालयाचे सचिव परमेश्वरन् अय्यर यांनी दिल्लीत प्रसार माध्यमांना ही माहिती दिली आहे. गोव्यात नेमकी काय अडचण आहे हे पहावे लागेल, असे ते म्हणाले. जागतिक पर्यटनस्थळ असल्याने काही अडचणी असतील तर त्या लवकर दूर केल्या पाहिजे, असेही केंद्रीय अधिका-यांचे म्हणणे आहे.

गोव्याच्या भौगोलिक रचना पाहता डोंगराळ भाग असल्याने पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही ही देखील एक अडचण असण्याची शक्यता आहे, असे केंद्रातील अधिका-यांना वाटते. ग्रामीण भागात लोक उघड्यावरच नैसर्गिक विधी करतात. गोव्याच्या शहरी भागातही ही समस्या आहे याचे कारण मोठ्या प्रमाणात बांधकामे येत आहेत आणि लोक भाडेकरु ठेवत आहेत. स्थलांतरित मजूर तसेच त्यांची कुटुंबे शौचालये नसलेल्या भाड्याच्या घरांमध्ये राहतात, असे आढळून आले आहे. 

केंद्राची आकडेवारी असेही सांगते की, २0१४ साली राज्यात २८,६३७ शौचालयं बांधण्यात आली. १५.६२ टक्के घरांना सुविधा निर्माण करुन दिली तरी त्यानंतर नव्या शौचालयांची नोंद झालेली नाही किंवा खुल्या जागेत नैसर्गिक विधिमुक्त एकही पंचायत अधिसूचित झालेली नाही. 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानgoaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर