शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात स्वच्छ भारत मोहीमेचे तीनतेरा, दोन्ही जिल्हे 'उघड्यावरील शौचा'पासून मुक्त नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 14:10 IST

जागतिक नकाशावर लौकीकप्राप्त पर्यटनस्थळ म्हणून झळकणा-या तसेच साक्षरतेच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या गोव्यात दोनपैकी एकही जिल्हा खुल्या नैसर्गिक विधीपासून मुक्त नसल्याचे केंद्र सरकारला आढळून आले आहे.

पणजी : जागतिक नकाशावर लौकीकप्राप्त पर्यटनस्थळ म्हणून झळकणा-या तसेच साक्षरतेच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या गोव्यात दोनपैकी एकही जिल्हा खुल्या नैसर्गिक विधीपासून मुक्त नसल्याचे केंद्र सरकारला आढळून आले आहे. स्वच्छ भारत मोहीमेला तीन वर्षे उलटली तरी राज्यात ही स्थिती आहे. गोवा हे दोन जिल्ह्यांचेच लहान राज्य असल्याने स्वच्छ भारत मोहिमेची अंमलबजावणी यशस्वीपणे व्हायला हवी होती, असे केंद्राचे म्हणणे आहे. 

स्वच्छ भारत मोहीमेच्या ग्रामीण भागातील मोहिमेबाबत केंद्राची अधिकृत आकडेवारी अशी सांगते की, २0१४ ही मोहीम सुरू झाली त्या वर्षी राज्य स्तरावर सरासरी कव्हरेज ६0.५९ टक्के तर २0१५-१६ मध्ये सरासरी ७६.२२ टक्के कव्हरेज होते. त्यानंतर कव्हरेज वाढलेच नाही. उत्तर गोव्यात ७७.८४ टक्के तर दक्षिण गोव्यात ७३.८१ टक्के भागात ही मोहीम पोहोचली आहे. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे असे म्हणणे आहे की, गोव्यात जमिनींचे प्रश्न भरपूर आहेत. कूळ कायदा, मुंडकार कायदा, सीआरझेड तसेच अन्य अनेक गोष्टींमुळे शौचालयांच्या बांधकामांना अडथळे येत आहेत, त्यावर आता तोडगा काढणार आहोत. हा विषय सरकारने प्राधान्यक्रमे हाती घेतला आहे. येत्या आॅक्टोबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत गोवा राज्य खुल्या जागेत नैसर्गिक विधींपासून मुक्त करण्याचे सरकारचे उदिद्ष्ट आहे. 

शनिवारी मडगांव येथे एका कार्यक्रमात राज्यात ७0 हजार शौचालयं बांधण्यात येणार असल्याचे आणि येत्या 2 आॅक्टोबरपर्यंत या गोष्टीची पूर्तता करणार असल्याचे त्यानी जाहीर केले होते.  बिहार, मणिपूरमध्येही असाच एकही खुल्या नैसर्गिक विधिपासून मुक्त जिल्हा सापडू शकला नाही. बिहारमध्ये ३८ तर मणिपूरमध्ये ९ जिल्हे आहेत. केंद्रीय जल मंत्रालयाचे सचिव परमेश्वरन् अय्यर यांनी दिल्लीत प्रसार माध्यमांना ही माहिती दिली आहे. गोव्यात नेमकी काय अडचण आहे हे पहावे लागेल, असे ते म्हणाले. जागतिक पर्यटनस्थळ असल्याने काही अडचणी असतील तर त्या लवकर दूर केल्या पाहिजे, असेही केंद्रीय अधिका-यांचे म्हणणे आहे.

गोव्याच्या भौगोलिक रचना पाहता डोंगराळ भाग असल्याने पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही ही देखील एक अडचण असण्याची शक्यता आहे, असे केंद्रातील अधिका-यांना वाटते. ग्रामीण भागात लोक उघड्यावरच नैसर्गिक विधी करतात. गोव्याच्या शहरी भागातही ही समस्या आहे याचे कारण मोठ्या प्रमाणात बांधकामे येत आहेत आणि लोक भाडेकरु ठेवत आहेत. स्थलांतरित मजूर तसेच त्यांची कुटुंबे शौचालये नसलेल्या भाड्याच्या घरांमध्ये राहतात, असे आढळून आले आहे. 

केंद्राची आकडेवारी असेही सांगते की, २0१४ साली राज्यात २८,६३७ शौचालयं बांधण्यात आली. १५.६२ टक्के घरांना सुविधा निर्माण करुन दिली तरी त्यानंतर नव्या शौचालयांची नोंद झालेली नाही किंवा खुल्या जागेत नैसर्गिक विधिमुक्त एकही पंचायत अधिसूचित झालेली नाही. 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानgoaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर