शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

...तर गोंयकारपण नष्ट होईल: उदय भेंब्रे

By पूजा प्रभूगावकर | Updated: January 16, 2025 09:42 IST

गोवा मुक्तीनंतर 'जनमत कौल' या दिवसालाही तितकेच महत्त्व आहे.

पूजा नाईक - प्रभुगावकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील जमिनी मोठ्या प्रमाणात विकल्या जात असून त्या जमिनी बाहेरचे लोक घेत आहेत. यावर नियंत्रण आणावे लागेल. ओपिनियन पोल किंवा 'जनमत कौल' या विषयाशी तसा त्याचा थेट संबंध नाही. मात्र सरकारने वेळीच ठोस भूमिका घ्यावी अन्यथा 'जमिनी' या विषयावरून गोवा व गोंयकारपण नष्ट होईल, अशी भीती माजी आमदार तथा १९६७ च्या जनमत कौल चळवळीतील नेते उदय भेंब्रे यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. 

गोवा मुक्तीनंतर 'जनमत कौल' या दिवसालाही तितकेच महत्त्व आहे. जनमत कौल म्हणजे दुसरे स्वातंत्र्यच. आपण जे घटकराज्य भोगत आहोत ते याच दिवसामुळे. मात्र जनमत कौलमुळे जे अधिकार मिळाले आहेत त्यानुसार सरकारचे काम होत नाही, धोरणे चुकत असल्याची खंतही भेंब्रे यांनी व्यक्त केली.

१९६७ साली गोव्यात विधानसभा होती, मंत्रिमंडळही अस्तित्वात होते. मात्र तो संघ प्रदेश असल्याने सर्व अधिकार लेफ्टनंट गर्व्हनरकडे होते. मंत्रिमंडळाने घेतलेला एखादा निर्णय ते नामंजूर करू शकत होते. अशातच गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यावर जनमत कौल घेण्याचा निर्णय झाला. त्यावेळी गोवा महाराष्ट्रात विलीन न करण्याचा 'कौल' लोकांद्वारे झाला. या जनमत कौलामुळे गोव्याला घटकराज्याचा दर्जाही प्राप्त झाला. संघप्रदेशवरून गोवा हे स्वतंत्र राज्य बनले. जनमत कौलाने गोव्याला स्वतःची ओळख, अस्मिता राखण्याचे अधिकार दिल्याचे भेंब्रे यांनी नमूद केले.

...शक्य नाही 

आर्थिक, शैक्षणिक मागासलेल्या राज्यांना विशेष राज्याचा दर्जा दिला जातो. मात्र गोवा तसा नाही. आर्थिक, शैक्षणिक तसेच अन्य क्षेत्रात गोव्याची प्रगती चांगली आहे. दरडोई उत्पन्न तसेच अन्य निकषांच्या आकडेवारीवर आधारित कुठल्या राज्यांना विशेष दर्जा द्यावा हे ठरवले जाते. त्यामुळे गोव्याला विशेष दर्जा शक्य नाही.

गोव्यात पुरेशा संधी नसल्याने डिग्री घेणारे गोमंतकीय तरुण, तरुणी नोकरीसाठी बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई येथे जात आहेत. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण होत असल्याने परप्रांतीय लोक गोव्यात येत आहेत. त्यामुळे गोव्यात सरकारने पुरेशा संधी निर्माण केल्यास गोमंतकीयांनाच ही पोकळी भरून काढता येईल. उदय भेंब्रे, जनमत कौल चळवळीतील एक नेते.

टॅग्स :goaगोवा