शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

...तर गोंयकारपण नष्ट होईल: उदय भेंब्रे

By पूजा प्रभूगावकर | Updated: January 16, 2025 09:42 IST

गोवा मुक्तीनंतर 'जनमत कौल' या दिवसालाही तितकेच महत्त्व आहे.

पूजा नाईक - प्रभुगावकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील जमिनी मोठ्या प्रमाणात विकल्या जात असून त्या जमिनी बाहेरचे लोक घेत आहेत. यावर नियंत्रण आणावे लागेल. ओपिनियन पोल किंवा 'जनमत कौल' या विषयाशी तसा त्याचा थेट संबंध नाही. मात्र सरकारने वेळीच ठोस भूमिका घ्यावी अन्यथा 'जमिनी' या विषयावरून गोवा व गोंयकारपण नष्ट होईल, अशी भीती माजी आमदार तथा १९६७ च्या जनमत कौल चळवळीतील नेते उदय भेंब्रे यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. 

गोवा मुक्तीनंतर 'जनमत कौल' या दिवसालाही तितकेच महत्त्व आहे. जनमत कौल म्हणजे दुसरे स्वातंत्र्यच. आपण जे घटकराज्य भोगत आहोत ते याच दिवसामुळे. मात्र जनमत कौलमुळे जे अधिकार मिळाले आहेत त्यानुसार सरकारचे काम होत नाही, धोरणे चुकत असल्याची खंतही भेंब्रे यांनी व्यक्त केली.

१९६७ साली गोव्यात विधानसभा होती, मंत्रिमंडळही अस्तित्वात होते. मात्र तो संघ प्रदेश असल्याने सर्व अधिकार लेफ्टनंट गर्व्हनरकडे होते. मंत्रिमंडळाने घेतलेला एखादा निर्णय ते नामंजूर करू शकत होते. अशातच गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यावर जनमत कौल घेण्याचा निर्णय झाला. त्यावेळी गोवा महाराष्ट्रात विलीन न करण्याचा 'कौल' लोकांद्वारे झाला. या जनमत कौलामुळे गोव्याला घटकराज्याचा दर्जाही प्राप्त झाला. संघप्रदेशवरून गोवा हे स्वतंत्र राज्य बनले. जनमत कौलाने गोव्याला स्वतःची ओळख, अस्मिता राखण्याचे अधिकार दिल्याचे भेंब्रे यांनी नमूद केले.

...शक्य नाही 

आर्थिक, शैक्षणिक मागासलेल्या राज्यांना विशेष राज्याचा दर्जा दिला जातो. मात्र गोवा तसा नाही. आर्थिक, शैक्षणिक तसेच अन्य क्षेत्रात गोव्याची प्रगती चांगली आहे. दरडोई उत्पन्न तसेच अन्य निकषांच्या आकडेवारीवर आधारित कुठल्या राज्यांना विशेष दर्जा द्यावा हे ठरवले जाते. त्यामुळे गोव्याला विशेष दर्जा शक्य नाही.

गोव्यात पुरेशा संधी नसल्याने डिग्री घेणारे गोमंतकीय तरुण, तरुणी नोकरीसाठी बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई येथे जात आहेत. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण होत असल्याने परप्रांतीय लोक गोव्यात येत आहेत. त्यामुळे गोव्यात सरकारने पुरेशा संधी निर्माण केल्यास गोमंतकीयांनाच ही पोकळी भरून काढता येईल. उदय भेंब्रे, जनमत कौल चळवळीतील एक नेते.

टॅग्स :goaगोवा