शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कायदा देश सोडून पळालेल्या गुन्हेगारांना अद्दल घडवली; पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई

By वासुदेव.पागी | Updated: May 22, 2024 16:59 IST

भारतीय पत्र माहिती विभाग, गोवा श्रमिक पत्रकार संघ  आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदा संहिता या विषयावर वार्तालाप कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

पणजीः गुन्हेगारी संबंधी जुनी कायदा संहिता रद्द करून नवीन संहिता लागू केल्यामुळे  देशात गुन्हे करून पळून जाणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करणे सुलभ होईल असा विश्वास गोव्याचे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई यांनी व्यक्त केला आहे.  

भारतीय पत्र माहिती विभाग, गोवा श्रमिक पत्रकार संघ  आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदा संहिता या विषयावर वार्तालाप कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बिश्नोई बोलत होते. ते म्हणाले की  गुन्हेगारीचा जुना कायदा  मोडीत काढून नवीन कायदा लागू केल्याने अनेक महत्तवाकांक्षी बदल अपेक्षित आहेत.  गुन्हे प्रकरणे धसास लागण्याचे प्रमाणही वाढेल आणि गुन्हेगारी सिद्ध होण्याचेही प्रमाण वाढेल.  कारण गुन्हेगारी सिद्ध होण्यासाठी येणाऱ्या अनेक तांत्रिक अडथळ्यांचा विचारही नवीन कायद्यात करण्यात आला आहे. सुधारीत कायदा हा तपास कामाला अधिक गती देणारा आणि तपास कामात पारदर्शकता आणणारा आहे असे त्यांनी सांगितले. 

विशेष करून इलेक्ट्रॉनिक पुराव्यांना देण्यात आलेली मान्यता हे नवीन कायद्याचे वैशिष्ठ्य आहे. तपास कामेही त्यामुळे लांबणीवर पडणार नाहीत. नागरिक ऑनलाईन पद्धतीनेही तक्रार नोंदवू शकतो आणि त्या तक्रारीवर तीन दिवसात कारवाई करणे पोलीसांना सक्तीचे असणार आहे.  देशात गुन्हे करून पळून जाणाऱ्यांचे त्रांकडे मडणारी हा नवीन कायदा आहे. कारण अशा लोकांविरुद्ध कारवाई कऱण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडथळे निकालात काढण्यात आले आहेत. तसेच संबंधित संशयितांनी ताब्यात देण्या संबंधीचा करार अनेक देशांशी करण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले. उत्तर गोव्याचे अधिक्षक आयपीएस अधिकारी अक्षत कौशल आणि दक्षिण गोव्याचे अधीक्षक आयपीएस अधिकारी राहुल गुप्ता यांनी अनुक्रमे  भारतीय नाय्य संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता  यांची माहिती पत्रकारांना यावेळी दिली.