शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

नवीन कायदा देश सोडून पळालेल्या गुन्हेगारांना अद्दल घडवली; पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई

By वासुदेव.पागी | Updated: May 22, 2024 16:59 IST

भारतीय पत्र माहिती विभाग, गोवा श्रमिक पत्रकार संघ  आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदा संहिता या विषयावर वार्तालाप कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

पणजीः गुन्हेगारी संबंधी जुनी कायदा संहिता रद्द करून नवीन संहिता लागू केल्यामुळे  देशात गुन्हे करून पळून जाणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करणे सुलभ होईल असा विश्वास गोव्याचे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नोई यांनी व्यक्त केला आहे.  

भारतीय पत्र माहिती विभाग, गोवा श्रमिक पत्रकार संघ  आणि भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने नवीन कायदा संहिता या विषयावर वार्तालाप कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बिश्नोई बोलत होते. ते म्हणाले की  गुन्हेगारीचा जुना कायदा  मोडीत काढून नवीन कायदा लागू केल्याने अनेक महत्तवाकांक्षी बदल अपेक्षित आहेत.  गुन्हे प्रकरणे धसास लागण्याचे प्रमाणही वाढेल आणि गुन्हेगारी सिद्ध होण्याचेही प्रमाण वाढेल.  कारण गुन्हेगारी सिद्ध होण्यासाठी येणाऱ्या अनेक तांत्रिक अडथळ्यांचा विचारही नवीन कायद्यात करण्यात आला आहे. सुधारीत कायदा हा तपास कामाला अधिक गती देणारा आणि तपास कामात पारदर्शकता आणणारा आहे असे त्यांनी सांगितले. 

विशेष करून इलेक्ट्रॉनिक पुराव्यांना देण्यात आलेली मान्यता हे नवीन कायद्याचे वैशिष्ठ्य आहे. तपास कामेही त्यामुळे लांबणीवर पडणार नाहीत. नागरिक ऑनलाईन पद्धतीनेही तक्रार नोंदवू शकतो आणि त्या तक्रारीवर तीन दिवसात कारवाई करणे पोलीसांना सक्तीचे असणार आहे.  देशात गुन्हे करून पळून जाणाऱ्यांचे त्रांकडे मडणारी हा नवीन कायदा आहे. कारण अशा लोकांविरुद्ध कारवाई कऱण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडथळे निकालात काढण्यात आले आहेत. तसेच संबंधित संशयितांनी ताब्यात देण्या संबंधीचा करार अनेक देशांशी करण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले. उत्तर गोव्याचे अधिक्षक आयपीएस अधिकारी अक्षत कौशल आणि दक्षिण गोव्याचे अधीक्षक आयपीएस अधिकारी राहुल गुप्ता यांनी अनुक्रमे  भारतीय नाय्य संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता  यांची माहिती पत्रकारांना यावेळी दिली.