शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईप्रश्नी महाराष्ट्राचे मृगजळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 08:27 IST

म्हादई लढ्यात महाराष्ट्राने गोव्याच्या बरोबरीने कर्नाटकविरोधात मदत करण्याचे दिलेले आश्वासन गोव्यासाठी मृगजळच ठरण्याची शक्यता आहे.

- राजेंद्र पां. केरकर, पर्यावरणवादी 

म्हादई जलविवाद लवादाने गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकला म्हादई आणि तिच्या उपनद्यांतल्या पाण्याचा जो वाटा दिला आहे, तो आणखीन वाढवून द्यावा म्हणून तिन्ही राज्यांनी दाखल केलेल्या विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीस येणार आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि म्हादई जलविवाद लवादासमोर म्हादई आणि तिच्या उपनद्यांतल्या पाणी वाटपाचा तंटा अजून सुटलेला नसताना गोव्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी म्हादईसंदर्भातली लढाई संयुक्तरित्या लढण्याचे घोषित केले आहे.

१९७० पासून कर्नाटकातले अभियंता शिवाप्पा गुरुबसाप्पा बाळेकुंद्री यांनी मलप्रभा नदीत म्हादई आणि तिच्या उपनद्यांचे पाणी वळविण्यासाठी धारवाड येथील नवलतीर्थ धरणाच्या जलाशयात साठा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर कर्नाटकात सत्तास्थानी येणाऱ्या प्रत्येक मुख्यमंत्र्याने म्हादईचे पाणी मलप्रभेत वळविण्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा आरंभला. त्यांनी २००२ साली केंद्रीय जलस्रोत मंत्रालयाकडून कळसा-भांडुरा नाल्यांचे पाणी मलप्रभेत वळविण्यासाठी मंजुरी पत्र मिळवले. गोव्याने सर्वपक्षीय शिष्टमंडळाद्वारे हे पत्र स्थगित ठेवण्यात यश मिळवले. परंतु, असे असताना कर्नाटक सरकारने २००६ पासून कळसा नाल्याचे पाणी मलप्रभेत वळविण्यासाठी महाकाय कालवे खोदून पावसाळी मोसमात यश मिळवले कर्नाटक सरकारच्या कळसा कालव्याच्या योजनेला चालना मिळाल्याचे पाहून महाराष्ट्र सरकारने कट्टीका नाल्यावर एकतर्फी धरण उभारण्याला ना केंद्र सरकारची, ना गोव्याची परवानगी घेतली. गोवा व महाराष्ट्राने प्रतापसिंह राणे आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना गोवा-महाराष्ट्राच्या सीमेवर पावलांची कोड येथे संयुक्तपणे धरण प्रस्ताव राबविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु असे असताना महाराष्ट्र सरकारने गोव्याला अजिबात न कळवता एकतर्फी कट्टीका नाल्यावर २००६ साली धरणाचे बांधकाम सुरू करून बहुतांश प्रकल्प पूर्णत्वास नेला.

केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी २०१५ साली महाराष्ट्र सरकारने विर्डी धरणासाठी पर्यावरणीय दाखला घेतला नसल्याचे स्पष्ट केले होते. गोव्यातील म्हादई अभयारण्य क्षेत्रापासून हे धरण २.४५ किलोमीटर अंतरावर असल्याने केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या नियमानुसार १० किलोमीटर अंतराच्या कक्षेत येणाऱ्या धरणासारख्या प्रकल्पांना पर्यावरणीय ना हरकत दाखला बंधनकारक असूनही महाराष्ट्राने आजतागायत हा दाखला घेतलेला नाही. ही बाब म्हादई जलविवाद लवादाच्या त्रिसदस्यीय न्यायमूर्तीच्या लक्षात आणून दिल्यावर महाराष्ट्राला धरणाचे काम बंद ठेवावे लागले. 

यंदा एप्रिल २०२३ मध्ये महाराष्ट्राने कट्टीका नाला धरणाचे काम पुन्हा सुरू केले होते. परंतु, गोवा सरकारने या संदर्भात पत्र पाठवताच विर्डी येथील हे काम बंद ठेवण्यात आले. मात्र, गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संस्थेच्या मदतीने विर्डी धरणाचे गोव्याला कोणते फायदे-तोटे होऊ शकतात आणि पर्यावरणावर काय परिणाम होऊ शकतात, याविषयीचा अहवाल दिल्यानंतर विर्डी धरणाला हिरवा कंदिल दाखवला जाईल, असे म्हटले आहे. 

पाणी वाटपाचा विवाद खरंतर सर्वोच्च न्यायालय आणि लवादासमोर सुनावणीला आलेला नसताना, महाराष्ट्राच्या विर्डी धरणाला मान्यता देणे ही चुकीची बाब ठरणार आहे. लवादाने आपल्या अंतिम निवाड्यात महाराष्ट्रातील स्थानिक जनतेला म्हादई खोऱ्यातले १.३३ टीएमसी फिट पाणी वापरण्यास अनुमती दिली असून, आवश्यक परवाने घेण्याची अट घातली आहे. तरीही रितसर दाखले न घेता महाराष्ट्राने विर्डी धरणाचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न वारंवार करत अखेर बांधकाम पूर्णत्वाकडे नेले. लवादाने दिलेल्या निकालानुसार विर्डीत चार बंधारे आणि आंबडगावात एक बंधारा बांधून १.३३ टीएमसी फिट पाणी स्थानिक जनतेच्या हितासाठी वापरण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे सध्या कट्टीका नाला धरणाचे महाराष्ट्र काय करणार, याबाबत अनिश्चितता असताना मुख्यमंत्री सावंत यांनी तेथील पर्जन्यवृष्टी, जलसंचय क्षेत्रात झालेली अपरिमित जंगलतोड, जलाशयाची पाणी साठविण्याची क्षमता आणि लवादाने दिलेला निवाडा याचा विचार न करता विर्डी धरणाला मान्यता देण्याविषयी प्रतिपादन केले आहे. हा चुकीचा पायंडा ठरलेला आहे. 

महाराष्ट्र व कर्नाटककडे कृष्णासारख्या नद्या आणि शेकडो नदीनाले असताना म्हादई, कळसा, हलतरा, सुर्ला, भांडुरा या आंतरराज्य नाल्यांचे पाणी मलप्रभेत वळविण्यासाठी जे प्रस्ताव तयार केले, ते गोव्यासाठी घातक ठरणार आहेत. म्हादई लढ्यात महाराष्ट्राने गोव्याच्या बरोबरीने कर्नाटकविरोधात मदत करण्याचे दिलेले आश्वासन गोव्यासाठी मृगजळच ठरण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :goaगोवाriverनदीDamधरण