शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात बिबट्यांची स्थिती प्रतिकूल; असुरक्षितता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 11:16 IST

बिबट्यांना असुरक्षितता निर्माण झाली आहे.

राजेंद्र पां. केरकर, पर्यावरणवादी 

डिचोली तालुक्यातल्या लाटंबार्सेतल्या नानोडा सोनारबाग येथील बाबल नाना वरक यांनी त्यांच्या जर्सी गायीची गोठ्यातली दोन पाडसे आणि बांबूच्या साटातल्या आठ बकन्या बिबट्यांनी लंपास केल्याची तक्रार २७ जानेवारी २०१० रोजी केली होती. बाबल वरक यांच्या कुटुंबाचा पशुपालन हा पारंपरिक उदरनिर्वाहाचा व्यवसाय असून, दोन पाडसे आणि आठ बकऱ्यांचा फडशा बिबट्याने पाडल्याने वरक कुटुंबीयांनी सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. 

लाटंबार्से हा डिचोली तालुक्यातला भौगोलिकदृष्ट्या आकाराने मोठ्या असलेल्या गावात एकेकाळी स्थानिक वृक्षवेलींनी नटलेली जंगले आणि गवताच्या कुरणांमुळे मृगकुळातली जनावरे मुबलक प्रमाणात होती. त्यांच्या मांसावर गुजराण करण्यासाठी बिबट्यांचे वास्तव्य येथे होते. परंतु जंगली मांसाची चटक लागलेल्या मंडळींसाठी फास, सापळे लावून रानडुक्कर, हरणे मारण्याचे आणि त्यांच्या मांसाची तस्करी करण्याचे प्रमाण वाढल्याने बिबट्यांनी सहज उपलब्ध होणारी भटकी कुत्री आणि गुरा-ढोरांची शिकार करण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे

लाटंबा, वन, म्हावळिंगे या गावात बेकायदेशीररीत्या चिरेखणी, खडी क्रशरही सुरू असून, त्यामुळेही बिबट्यांना असुरक्षितता निर्माण झाली आहे. फाशात सापळ्यात अडकून बऱ्याचदा बिबटे मरणप्राय यातना भोगून मृत्युमुखी पडले आहेत. शेती, बागायतीच्या रक्षणाच्या नावाखाली काही ठिकाणी विजेच्या धक्क्याद्वारे जंगली श्वापदांना मारण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. गेल्या दशकभरापासून गोव्यात केवळ जंगलातच नव्हे तर माळरानावर लावलेल्या सापळ्यात किंवा बटाट्याद्वारे होणाऱ्या बॉम्बस्फोटात रानडुकरे, हरणे यांच्याबरोबर बिबटे जायबंदी आणि मृत्युमुखी पडण्याची प्रकरणे उद्भवली आहेत. अशी अघोरी कृत्ये करणाऱ्यांवर कडक कारवाई करणारी वनखात्याची यंत्रणा सक्रिय नसल्याने गुन्हेगारांचे आयतेच फावलेले आहे.

वन्यजीवांची हत्या, तस्करी आणि तत्सम गुन्ह्यांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात भरारी पथक आणि गुन्हेगारी रोखण्यासंदर्भात योग्य उपाययोजना करण्यात गोव्यातली वनखात्याची यंत्रणा कूर्मगतीने काम करत आहे. त्यामुळे जंगल समृद्ध सत्तरी, सांगे, काणकोण, धारबांदोड्यासारखे तालुकेच नव्हे तर फोंडा, पेडणे, बार्देश, सासष्टी, केपेसारख्या तालुक्यात घोरपडीच्या कातड्यांसाठी, खवले मांजराच्या खवल्यांसाठी, हरण-रानडुकरांच्या मांसासाठी, गव्यांच्या भारदस्त शिंगांसाठी वन्यजीवांची शिकार निर्धोक होत आहे. अन्नपाण्यासाठी गलितगात्र होऊन बिबट्यांसारखे मार्जार कुळातले प्राणी लोकवस्ती, शेती आणि बागायतींकडे वळले आहेत. भटके कुत्रे, भटकी गुरे ढोरेच नव्हे तर गोठ्यातल्या म्हशी, बकऱ्या उचलून नेऊन बिबटे फस्त करत आहेत.

माहिती हक्क कायद्याद्वारे उपलब्ध माहितीत २०१७ साली वनखात्याने राज्यभरात ७१ बिबटे प्राणिगणनेत २०१४ साली नोंद झाल्याचे म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून गोव्यात मानव आणि बिबट्या यांच्यातला संघर्ष विकोपाला जाण्याची प्रकरणे लक्षणीय संख्येने गावोगावी नव्हे तर वेर्णासारख्या नागरिकीकरणाच्या विळख्यात सापडलेल्या औद्योगिक वसाहतीत वाढलेली आहेत. गोव्यात लाटंबार्से, बोरी, वेर्णासारखी काही गावे बिबट्या प्रवण क्षेत्र होण्याच्या वाटेवर आहेत. मानव- बिबट्या यांच्यात निर्माण झालेल्या तणावाची कारणे कोणती याविषयी वनखात्याने खरं तर रीतसर संशोधन करणे गरजेचे होते. परंतु असे संशोधन झालेले नाही, असे स्पष्टीकरण वनखात्याच्या एका अधिकाऱ्याने केलेले आहे. पाळीव जनावरांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत कारणीभूत ठरलेल्या बिबट्यांच्या स्वभावधर्मात वागणुकीत, अन्नपाण्याची उपलब्धता, हवामान बदलाचे त्यांच्यावर झालेले परिणाम याचा अभ्यास आणि संशोधन वनखात्याने केलेले नाही. नुकसान भरपाईची प्रकरणे निकालात काढण्याच्या प्रकरणांना दिरंगाई होत आहे.

आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा नियोजनबद्ध उपयोग करून बिबट्यांचे नैसर्गिक अधिवासातून होणारे स्थलांतर, मृगकुळातल्या जनावरांऐवजी पाळीव आणि भाकड जनावरांच्या रक्त, मांसाची बिबट्यांना लागलेली चटक आणि त्यामुळे मानवी वस्ती, शेती, बागायतीत वाढलेल्या संचारासंदर्भात अभ्यास आणि संशोधन करून लवकरात लवकर उपाययोजना करण्यात आली नाही तर त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊन मानव-बिबट्यांतले संबंध ताणले जातील आणि त्यात बिबट्यांवर नामशेष होण्याची पाळी येईल. गोव्याच्या एकूण अर्थसंकल्पीय तरतुदींपैकी वनखात्याला राज्य सरकारकडून खूप कमी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याचेही गंभीर दुष्परिणाम नियोजनबद्ध उपाययोजनेवर होत असल्याचे वारंवार उघडकीस आलेले आहे.

 

टॅग्स :goaगोवाleopardबिबट्या