शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणावर ११ महिने अध्यक्ष नाही; काँग्रेसकडून संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 13:43 IST

राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणावर गेले ११ महिने अध्यक्ष नसल्याने पोलिसांकडून होणाऱ्या अन्यायाबाबत दाद मागणे लोकांना कठीण बनले आहे.

ठळक मुद्देराज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणावर गेले ११ महिने अध्यक्ष नसल्याने पोलिसांकडून होणाऱ्या अन्यायाबाबत दाद मागणे लोकांना कठीण बनले आहे.विरोधकांवर खोटे गुन्हे घालण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे आणि याविरुद्ध दाद मागण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने सत्ताधारी राजकारण्यांचे फावले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रोहित ब्रास डिसा यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र लिहून राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर लवकरात लवकर अध्यक्ष नेमावा, अशी मागणी केली आहे.

पणजी - राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणावर गेले ११ महिने अध्यक्ष नसल्याने पोलिसांकडून होणाऱ्या अन्यायाबाबत दाद मागणे लोकांना कठीण बनले आहे.

प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना असे म्हटले आहे, की सरकार पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून राजकीय विरोधकांना संपवू पाहत आहेत. विरोधकांवर खोटे गुन्हे घालण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे आणि याविरुद्ध दाद मागण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने सत्ताधारी राजकारण्यांचे फावले आहे. निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. एस. खांडेपारकर यांनी ११ महिन्यांपूर्वी अध्यक्षपद सोडल्यानंतर हे पद रिकामीच आहे.

ते म्हणाले की, केवळ पर्वरी आणि फातोर्डा येथीलच नव्हे, तर पणजी तसेच अन्य ठिकाणी पोलिसांचा वापर राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी केला जातो. काँग्रेस भवनवर पणजीत मोर्चा आणून हल्ला चढविणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. पोलीस कारवाईसाठी टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे अनेक अर्ज पडून आहेत. या लोकांना न्याय कधी मिळणार असा सवाल चोडणकर यांनी केला.

काँग्रेसचे प्रवक्ते रोहित ब्रास डिसा यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र लिहून राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर लवकरात लवकर अध्यक्ष नेमावा, अशी मागणी केली आहे. काही मंत्री पोलिसांचा वापर करून राजकीय विरोधकांचा छळ करीत आहेत. पर्वरी येथे खुद्द भाजपा पदाधिकाऱ्यावर हल्ला झाला आणि याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना एका मंत्र्याने जेरीस आणले. खुद्ध सरकारमध्येच ही स्थिती आहे. दक्षिण गोव्यातील एका मंत्र्याने नुवे येथे ख्रिसमस पार्टी पोलिसांना पाठवून बंद पाडली. या सर्व प्रकारांविरुद्ध दाद मागण्यासाठी प्राधिकरणावर अध्यक्षच नसल्याने लोकांची अडचण झाली आहे.

दरम्यान, राज्य मानवी हक्क आयोगालाही वाली नसल्याने तेथेही हक्कांसाठी धाव घेणाऱ्या लोकांची परवड झाली आहे. मूलभूत हक्कांसाठी लढण्याचा मार्गही राहिलेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवाPoliceपोलिस