शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी आणि त्यांचे नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 13:34 IST

एसटींना जेव्हा आरक्षण मिळेल तेव्हा त्या आरक्षणावरील मलई काही ठरावीक राजकारणी स्वतःच्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतील. 

राज्यातील अनुसूचित जमातींना (एसटी) विधानसभेचे चार किंवा पाच मतदारसंघ आरक्षित करून मिळायला हवेत याविषयी दुमत नाही. आम्ही यापूर्वीही याच स्तंभात लिहिले होते की, राजकीय आरक्षणावर एसटींचा पूर्ण अधिकार आहे. गोवा सरकारने मध्यंतरी चालढकल केली. भाजपने वेळकाढूपणा केला. त्यामुळे आरक्षण प्रक्रिया संथ झाली हे मान्य करावे लागेल. एसटींना जेव्हा आरक्षण मिळेल तेव्हा त्या आरक्षणावरील मलई काही ठरावीक राजकारणी स्वतःच्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतील. 

दरवेळी होतेय असे की, गरीब, कष्टकरी समाजातील लोक चळवळी करतात आणि त्याचा राजकीय लाभ मात्र मोजक्यांनाच मिळतो. त्या चळवळींतून जे काही निष्पन्न होते, त्याचा लाभ पूर्ण समाजाला किंवा समाजातील सर्व गरजू घटकांना मिळत असेल तर त्या आंदोलनांना अर्थ असतो. उटाचे बाळ्ळी येथे झालेले हिंसक आंदोलन सर्वांना अजूनही आठवते. दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने स्वतः चा मेंदू वापरून आंदोलनास आक्रमक रूप दिले होते. त्या आंदोलनावेळी पडद्यामागील सूत्रधार म्हणून जे वावरत होते, त्यांची हानी काही झाली नाही. शिवाय ज्या दिगंबर कामत यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला होता, ते कामत आरामात पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहिले आणि आज तेच भाजपमध्ये आहेत. शिवाय गोविंद गावडे (त्यावेळच्या आंदोलनातील एक पुढारी) हेही भाजपचे मंत्री आहेत. रमेश तवडकर तर सभापती आहेत. मग ज्या दोघा निष्पाप युवकांचा जीव गेला, त्या युवकांच्या कुटुंबांचे काय? त्यांच्या जीवनातील गरीबीचा अंधार तरी दूर झाला का, हे पाहावे लागेल. 

एसटी समाजातील गरीब, गरजू कष्टकरी लोकांना चळवळीचा फायदा मिळाला असेल तर आंदोलन यशस्वी झाले असे म्हणता येते. चळवळीचा लाभ मिळणे म्हणजे प्रत्येक जण मंत्री आमदार होणे असा अर्थ होत नाही. अवघेचजण आंदोलनांच्या मार्गावरून सत्तास्थानी पोहोचतात; पण ज्यांच्या पिढ्या गरीबीतच संपल्या, अशा अनेक लोकांना बिचाऱ्यांना सत्तेशी निगडीत लाभ कधी मिळतच नाहीत. आदिवासी कल्याण खाते विविध योजना राबवते; पण त्या योजना अनेकदा खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत. आजदेखील केपे, काणकोण सांगे, सासष्टी आदी तालुक्यांतील एसटी समाजातील अनेक कुटुंबे गरीबीचे चटके सहन करतात. अनेक कुटुंबांकडे नीट घरे नाहीत. शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्या पोहोचाव्यात म्हणून गोविंद गावडे, रमेश तवडकर तसेच प्रकाश वेळीप अशा सर्वच नेत्यांनी अधिक प्रयत्न करावेत. तवडकर यांचे काम सुरू आहे; पण त्या कामाची व्याप्ती काणकोणच्या पलीकडे जायला हवी.

अलीकडे मंत्री गावडे व तवडकर यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे नाव न घेता जे शरसंधान केले, त्यावरून एसटी समाजातील सामान्य माणूस चिंतातूर झाला असेल. गणेश गावकर, पांडुरंग मडकईकर असे अनेक राजकारणी एसटी समाजात आहेत. काहीजण विधानसभा निवडणुकीवेळी एकमेकांना पाडण्याचे काम पडद्याआड राहून करत असतात. गावडे व तवडकर हे एकाच दिवशी समान पद्धतीचा कार्यक्रम ठेवतात. त्यावरूनही समाजबांधवांमध्ये चलबिचल होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना दोन्ही कार्यक्रमांची निमंत्रणे असतात; पण मुख्यमंत्री जात नाहीत. मुख्यमंत्री दिल्लीला निघून जातात. याचा अर्थ असा की, मुख्यमंत्री सावंत यांना कोणत्याच वादात पडण्याची इच्छा नाही. गावडे व तवडकर यांच्यातील संघर्षापासून मुख्यमंत्र्यांना दूर राहायचे आहे, असाही याचा अर्थ होतो.

एसटी समाजाला पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत किमान चार जागा तरी आरक्षित करून मिळतील, असे दिसते. त्यामुळे किती राजकारण्यांचे भाग्य फळफळेल ते पाहावे लागेल. पंचायत, पालिका, झेडपी अशा स्तरांवरही आरक्षण आहे. शिक्षण व सरकारी नोकरीतील आरक्षण हे समाजाच्या विकासासाठी उपयुक्त ठरते. एसटी समाजाने गोव्याच्या विकासात योगदान दिले आहे, तो भूमिपुत्र आहे. त्यांनी शेती, बागायतींची लागवड केली. या समाजाच्या नेत्यांनी सातत्याने स्वत:चे मतभेद चव्हाट्यावर आणून चळवळीचा मूळ हेतू नष्ट करू नये एवढेच.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण