शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

खाणबंदीच्या प्रश्नावर विधानसभेचे विशेष अधिवेशन विनाविलंब बोलवा - बाबू कवळेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 4:13 AM

खाणबंदीच्या प्रश्नावर चर्चेसाठी विधानसभेचे खास अधिवेशन विनाविलंब बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना वेगवेगळी पत्रे लिहून केली आहे. 

पणजी : खाणबंदीच्या प्रश्नावर चर्चेसाठी विधानसभेचे खास अधिवेशन विनाविलंब बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना वेगवेगळी पत्रे लिहून केली आहे. 

या पत्रात कवळेकर म्हणतात की, राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. हजारो लोकांसमोर खास करून डिचोली, सत्तरी, केपे, सांगे, धारबांदोडा, फोंडा तालुक्यातील लोकांच्या समोर संकट उभे ठाकले आहे. राज्य तसेच केंद्र सरकारचा महसूल बुडत आहे. त्यामुळे सामाजिक अस्वस्थता  निर्माण झाली आहे. या प्रश्नावर विधानसभेत  व्यापक चर्चा आवश्यक असून केंद्र सरकारला भावना कळवायला हव्यात त्यासाठी विधानसभेचे खास अधिवेशन बोलवावे, अशी मागणी कवळेकर यांनी केली आहे.

 सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील ८८ लीजांचे नूतनीकरण रद्दबातल ठरविलेनंतर गेल्या १५ मार्च पासून गोव्यात खाणी बंद आहेत. केंद्र सरकारने वटहुकूम काढावा किंवा एम एम डी आर कायद्यात दुरुस्ती करून खाणींना जीवदान द्यावे, अशी मागणी गेले काही महिने होत असताना केंद्र या दोन्ही गोष्टींसाठी अनुकूल नसल्याच्या बातम्या दिल्लीहून धडकल्याने खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक, बार्जमालक तसेच अन्य संबंधित व्यवसायिक यांच्यात अस्वस्थतेचे वातावरण आहे. खाणी कधी सुरू होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

 खाण अवलंबितांनी सभापती प्रमोद सावंत यांच्या घरावर धडक देऊन त्यांची भेट घेतली तसेच भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनाही अवलंबितांचे शिष्टमंडळ भेटलेले आहे.  पंधरा ते वीस दिवसात याबाबत तोडगा काढू, असे आश्वासन तेंडुलकर यांनी अवलंबितांना दिलेले आहे. परंतु ही केवळ वरवरची आश्वासने आहेत अशी आता खाण अवलंबितांची भावना बनलेली आहे. विरोधी कॉंग्रेस पक्षाने आता हे प्रकरण गंभीरपणे घेतले असून सरकारने चर्चेसाठी खास अधिवेशन बोलवावे अशी मागणी पक्ष पुढे रेटू लागला आहे.

टॅग्स :goaगोवा