शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

जंगल संवर्धनासाठी मृदा आरोग्य कार्ड उपयुक्त: वनमंत्री विश्वजीत राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 11:40 IST

वाळपईत वन प्रशिक्षण केंद्रामध्ये विशेष कार्यक्रम, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन : वृक्षारोपणाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : वैश्विक तापमान वाढीच्या संकटावर उपाय शोधायचा असेल तर जंगलांचे संवर्धन अत्यावश्यक आहे. यासाठी वन खात्यांच्या जमिनींचे मृदा संशोधन कार्ड (आरोग्य कार्ड) करणे महत्त्वाचे ठरेल, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

वाळपई येथील वन प्रशिक्षण केंद्रामध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात त्यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी व्यासपीठावर वनविभागाचे अधिकारी कमल दत्ता, के. रमेश कुमार, प्रवीण कुमार राघव, एन. पलनीकांत बेंगलोर, अंकित कुमार, वनविभागाचे इतर अधिकारी, वाळपई वन प्रशिक्षण केंद्राचे विश्वनाथ पिंगुळकर उपस्थित होते.

मंत्री म्हणाले की, जमिनींचे आरोग्य कार्ड तयार झाल्यामुळे कोणत्या जमिनीत कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे, त्यानुसार त्या जमिनीस योग्य खत व्यवस्थापन करता येईल. त्यामुळे झाडांची वाढ जोमाने होईल आणि त्या जंगलाच्या परिस्थितीनुसार योग्य झाडांची निवड करून लागवड करता येईल. त्यामुळे झाडांचे व मातीचे आरोग्य सुधारेल, फळे फुले मुबलक येतील आणि जंगलातील वन्यजीवांचे संगोपनही शक्य होईल.

वन अधिकाऱ्यांना चांगल्या ठिकाणी प्रशिक्षण देणे, त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे हीही काळाची गरज असल्याचे मंत्री राणे यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनविभागाचे सिद्धेश गावडे यांनी केले तर आभार वन प्रशिक्षण केंद्राचे विश्वनाथ पिंगुळकर यांनी मानले. कार्यक्रमाला अनेक अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

जंगलात गवतासह फळझाडांची लागवड

जंगलात जंगली गवत वाढविण्यावर लक्ष द्यावे, जेणेकरून रानटी गवे ग्रामीण भागात घुसून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणार नाहीत तसेच जंगलामध्ये आंबा, जांभूळ, पेरू, सीताफळ यांसारखी झाडे लावून त्यांची जलद वाढ सुनिश्चित करणे गरजेचे आहे. या झाडांवरील फळांवर जंगली प्राणी आपली गुजराण करतील आणि त्यामुळे त्यांचा लोकवस्तीतील संचार कमी होईल, असे मंत्री राणे म्हणाले.

माती परीक्षणानंतर झाडांना अन्नद्रव्ये पुखणार

जागतिक हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पंतप्रधानांच्या 'एक पेड माँ के नाम' या घोषणेनंतर राज्यात पाच लाख झाडे लावली आहेत. यापुढे दहा लाख झाडांची लागवड व त्यांचे संगोपन करण्यावर भर दिला जाणार आहे. जसे लहान मुलांच्या तपासण्या करून योग्य औषधोपचार दिला जातो, त्याप्रमाणे माती परीक्षणामुळे झाडांना योग्य अन्नद्रव्ये पुरविता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणforestजंगलforest departmentवनविभाग