शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

समुद्राची ओढ आतापर्यंत 9 पर्यटकांच्या जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 18:14 IST

जानेवारी ते आजपर्यंत गोव्यात तब्बल 39 जणांना बुडून मृत्यू आला असून त्यात 9 पर्यटकांचा समावेश आहे. त्यातील बहुतेक मृत्यू उत्तर गोव्यातील समुद्रात झाले आहेत.

ठळक मुद्दे जानेवारी ते आजपर्यंत गोव्यात तब्बल 39 जणांना बुडून मृत्यू आला असून त्यात 9 पर्यटकांचा समावेश आहे. मागच्या साडेसहा महिन्यात एकूण 58 जणांचा जीव वाचविण्यात आला असून त्यापैकी 48 जण पर्यटक आहेत.बहुतेक मृत्यू उत्तर गोव्यातील समुद्रात झाले आहेत.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - खवळलेल्या समुद्रात जीवरक्षकांनी दिलेला इशारा धुडकावून पाण्यात उतरलेल्या दिल्लीहून आलेल्या दहा पर्यटकांच्या गटातील अनुभव अगरवाल या 20 वर्षीय युवकाला सिकेरी येथे बुडून मृत्यू झाला. पर्यटकाच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जानेवारी ते आजपर्यंत गोव्यात तब्बल 39 जणांना बुडून मृत्यू आला असून त्यात 9 पर्यटकांचा समावेश आहे. त्यातील बहुतेक मृत्यू उत्तर गोव्यातील समुद्रात झाले आहेत.

बुधवारच्या या दुर्घटनेत बुडणाऱ्या अन्य दोन महिलांचे प्राण जीवरक्षकांनी वाचविले. आतापर्यंत मागच्या साडेसहा महिन्यात एकूण 58 जणांचा जीव वाचविण्यात आला असून त्यापैकी 48 जण पर्यटक आहेत. यात 25 एप्रिल रोजी वास्को येथे स्कुबा डायव्हिंगसाठी बोटवरुन गेलेल्या 30 पर्यटकांसह, 13 जून रोजी काब द राम येथील दर्यात अडकलेल्या आणि शेवटी नौदलाच्या विमानातून जीव वाचविलेल्या लेफ्ट. शिवम या पुण्यातील नौदल अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

मागच्या साडेसहा महिन्यांच्या घटनांचा आलेख घेतल्यास गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांची योग्य ती माहिती नसल्यामुळेच हे अपघात होत असल्याचे उघडकीस आले असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या सिकेरीच्या ताज्या घटनेतही या दहा पर्यटकांना दर्या खवळल्यामुळे पाण्यात जाऊ नका असा इशारा दिला होता. असे असतानाही हे पर्यटक पाण्यात उतरले. या सर्वाना पाण्यातील जोरदार लाटेने ओढून नेले. मात्र त्यातील सातजण तडीवर आले तर अनुभवसह अन्य महिला सुमारे 25 मीटर आत खेचल्या गेल्या. खरेतर या तिघांनाही जीवरक्षकांनी वर आणले. मात्र अनुभवचा जीव ते वाचवू शकले नाहीत.

13 जून रोजी झालेल्या दुर्घटनाही अशाचप्रकारची असून पुण्यात नौदल अधिकारी म्हणून असलेला लेफ्ट. शिवम हा दक्षिण गोव्यातील काणकोण नजीक असलेल्या काब द राम या समुद्र किनाऱ्यावर उतरला होता. फेसाळलेल्या समुद्राचे फोटो काढण्यासाठी तो तेथील खडकावर चढला होता. मात्र खडक निसरडे असल्याने त्याच्यावरुन पाय घसरून तो पाण्यात पडला. केवळ नौदल अधिकारी असल्यामुळेच तो आपले प्राण वाचवू शकला असे म्हणावे लागेल. शेवटी नौदलाच्या विमानाने त्याचा जीव वाचविला.

14 मे रोजी पाटणो काणकोण येथे 108 रुग्णवाहिका सेवेत डॉक्टर म्हणून कामाला असलेली तमिळनाडूची डॉ. व्ही. रामकुमारी हिलाही अशाचप्रकारे मृत्यू आला होता. या आस्थापनाचा एक गट पिकनीक करण्यासाठी पाटणोला आला होता. त्यावेळी डॉ.  रामकुमारी आणि अन्य फोटो काढण्यासाठी खडकावर चढले असता एका लाटेच्या माऱ्याने त्यातील तिघेजण पाण्यात पडले. त्यापैकी दोघांना मच्छीमारांनी वाचविले. मात्र रामकुमारी हिला कुणी वाचवू शकले नाही.

17 फेब्रुवारी रोजी अशाचप्रकारची घटना हरमल येथे झाली होती. प्रशांत अंजानी या 44 वर्षीय बंगळुरुच्या पर्यटकाला खवळलेल्या दर्याच्या लाटेने ओढून नेले होते. तेही छायाचित्र घेण्यासाठीच समुद्रातील खडकावर चढले होते. आतापर्यंत मृत्यू आलेल्या 9 पर्यटकांपैकी 7 जण भारतीय पर्यटक असून त्यातील प्रत्येकी दोघे दिल्ली व बंगळुरुचे तर मध्यप्रदेश, कोल्हापूर व तमिळनाडू येथील एका पर्यटकाचा समावेश आहे. त्याशिवाय दोन विदेशी पर्यटकांनाही मृत्यू आला असून त्यातील एक घटना उत्तर गोव्यातील हणजुणो येथे तर दुसरी घटना दक्षिण गोव्यातील बाणावली येथील आहे.

या दुर्घटनांबद्दल बोलताना दृष्टीच्या जीवरक्षकांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर जी माहिती दिली ती खरोखरच गंभीर अशी होती. तो म्हणाला, पावसाळ्यात समुद्रात कुणी उतरू नये असे फलक समुद्र किनाऱ्यावर लावले असताना आणि आम्ही प्रत्येकवेळी इशारे दिलेले असतानाही केवळ दर्याच्या ओढीने पर्यटक समुद्रात उतरतात. समुद्राच्या लाटांचा अंदाज नसल्याने तसेच समुद्र कुठे सपाट आहे व कुठे खोल आहे याचीही माहिती नसल्याने ते समुद्राचे बळी ठरतात. त्यामुळे गोवा मात्र नाहक बदनाम होतो असे ते म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू