शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीचे पाप; परिसरातील नागरिकांचा छळ अन् दर्जाहीन कामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 11:06 IST

नगरसेवकांपासून पणजीच्या आमदारापर्यंत अनेकांनी स्मार्ट सिटी कामांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. 

स्मार्ट सिटी प्रकल्पाने पणजीसह आसपासच्या परिसरांना जेवढे छळलेय, तेवढे अलिकडे कुणी छळले नसावे. स्मार्ट सिटी म्हणजे नरकासुरच, असे आता वाटू लागले आहे. शहरे स्मार्ट करावीत या चांगल्या हेतूने केंद्र सरकारने स्मार्ट सिटी संकल्पना पुढे आणली. त्यासाठी शेकडो कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र पणजी शहराने व गोव्यातील राज्यकर्त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाला बदनाम करून ठेवले आहे. स्मार्ट सिटीची कामे पणजीत करताना दर्जा राखला गेला नाही. योग्य नियोजन झाले नाही आणि त्यावर तज्ज्ञांनी नियमितपणे देखरेखही ठेवली नाही. नगरसेवकांपासून पणजीच्या आमदारापर्यंत अनेकांनी स्मार्ट सिटी कामांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. 

स्मार्ट सिटीशी निगडीत काम करताना सोमवारी रायबंदर येथे मजुराचा करुण अंत झाला. रस्त्याकडेला मातीच्या ढिगाऱ्याखाली तो गाडला गेला. कुणाच्याही हृदयाला पाझर फुटावा अशी ही घटना. दिवाडी फेरीबोट धक्क्याजवळ सकाळी आठच्या सुमारास अशी घटना घडली. सांडपाणी व्यवस्थेशी संबंधित वाहिनी टाकण्याचे काम रायबंदरला सुरू आहे. त्यासाठी रस्त्याचे खोदकाम सुरू होते. खड्डयात उतरलेल्या बिचाऱ्या मजुरावर मातीचा ढिगारा पडला. त्यात कोंडून त्याचा मृत्यू झाला.

स्मार्ट सिटी कामांवर रोज सकाळपासून देखरेख ठेवण्यासाठी कुणी उपस्थितच नसते. कंत्राटदार, अभियंते किंवा अन्य तज्ज्ञांची उपस्थिती रायबंदर किंवा पणजीत दिसूनच येत नाही. एका मजुराचा गेलेला जीव है कुणाचे पाप आहे, याचा शोध पोलिसांनी घ्यावा. कारण पोलिसांनी कंत्राटदारासह प्रकल्प पर्यवेक्षकावर गुन्हा नोंदवला आहे. मंगळवारी कंत्राटदाराला अटकही झाली. आता कोणतीही कारवाई झाली तरी, कामगाराचा जीव काही परत मिळणार नाही. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराला मृत्यू समोर दिसला असेल. त्याला किती यातना झाल्या असतील याची कल्पना करता येते. स्मार्ट सिटी प्रकल्पाशी निगडीत अधिकारी, अभियंते, पर्यवेक्षक, कंत्राटदार आता तरी सुधारतील काय?

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्व अधिकारी, कंत्राटदार व एकूणच स्मार्ट सिटी यंत्रणेची संयुक्त बैठक घेण्याची गरज आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटी प्रकल्पाची यंत्रणा कागदोपत्री आहे. ही यंत्रणा किंवा समिती भूमिगत झाल्यासारखीच स्थिती आहे. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात किंवा महापौर रोहित मोन्सेरात हे यंत्रणेचे सदस्य आहेत. मात्र सगळी सूत्रे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व मुख्य सचिवांकडे आहेत. त्यामुळे आमदार व महापौरांना स्मार्ट सिटीच्या कामात रस राहिलेला नाही. अनेक नगरसेवकदेखील कंटाळले आहेत. एका मजुराचा बळी गेला, इथपर्यंत क्रौर्याची मालिका मर्यादित राहील की आणखी बळी पहावे लागतील? सरकारी यंत्रणा जागी व संवेदनशील होण्यासाठी आणखी किती बळींची गरज आहे?बिहार, यूपी आणि अन्य भागांतून बिचारे मजूर येतात. त्यांच्या जीवावरच स्मार्ट सिटीची कामे होतात. पणजीत पावसाळ्यापूर्वी कामे करताना फक्त मजूर दिसायचे, पर्यवेक्षक, कंत्राटदार, अभियंते कधीच दिसले नाहीत. लोकांनी प्रचंड टीका केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी एके रात्री स्मार्ट सिटी कामाची पाहणी केली होती. 

मुख्यमंत्र्यांसोबत त्यावेळी सीईओ संजीत रॉड्रिग्ज होते. रॉड्रिग्ज यांची नियुक्ती उशिरा करण्यात आली होती. त्यांनी कामांना थोडा वेग दिला पण पणजीच्या वाट्याचे भोग संपलेले नाहीत. स्मार्ट सिटी असे विशेषण पणजीला लावताच येत नाही. काकुलो मॉलसमोरून जाणाऱ्या रस्त्याची चाळण झालेली आहे. अलिकडे पूर्ण सांतइनेज आणि पणजी, रायबंदरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा अनुभवायला मिळते. ज्या ताळगावमध्ये बाबूश मोन्सेरात यांचे निवासस्थान आहे, तिथे देखील रस्त्यांची दुरावस्था आहे. वाहन चालकांना वाहन चालविणे नकोसे वाटते. स्मार्ट सिटीच्या कामांवर सरकारने पणजीत आतापर्यंत किती खर्च केला, हे पैसे मांडवी नदीत वाहून गेले की केवळ सल्लागार व कंत्राटदार कंपन्यांपर्यंतच पोहोचले याची चौकशी कधी तरी करावी लागेल. मुख्यमंत्री सावंत यांनी चौकशी करून घ्यावी. किती कोटींचे कॅमेरे पणजीत बसविले गेले, त्यांचा फायदा काय होत आहे, हेही मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले तर बरे होईल.

 

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटी