शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

श्रीपाद जेव्हा स्वामी होतात; खासदारकीची २५ वर्ष अन् भाजपमधील कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 15:14 IST

नाईक यांनी खासदार या नात्याने २४-२५ वर्षांची कारकीर्द पूर्ण केली.

केंद्रीय राज्यमंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांचा वाढदिवस बुधवारी साजरा झाला. नाईक यांनी खासदार या नात्याने २४-२५ वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. १९९९ साली श्रीपादजी प्रथम खासदार झाले होते. ९० च्या दशकाच्या अखेरीस मडकई मतदारसंघात श्रीपाद नाईक विधानसभा निवडणूक हरले नसते तर ते कदाचित लोकसभेचे सदस्यही कधी होऊ शकले नसते. त्यांच्या वाट्याला वाजपेयी, मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होण्याचे भाग्यही कदाचित आले नसते. मात्र, दैवगती वेगळी असते. त्यामुळे ते सरपंच ते केंद्रीय मंत्री असा तेजस्वी प्रवास करू शकले. अत्यंत भीषण अपघातात ते अलीकडेच बचावले. त्या अपघातात त्यांच्या धर्मपत्नीचे निधन झाले. श्रीपाद नाईक यांच्यावर मनापासून प्रेम करणारे सगळेच गोमंतकीय त्यावेळी हळहळले. बुधवारी श्रीपाद नाईक यांचा वाढदिवस साजरा होत असताना त्यांच्या पत्नीची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवली.

श्रीपाद नाईक हे भाजपमधील स्वामीच आहेत किंवा ते भाजपचे स्वामीच आहेत, अशा अर्थाचे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाऊंच्या वाढदिवस सोहळ्यात केले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक यांनी प्रथम आपल्या भाषणात श्रीपादजींना 'स्वामी' ही पदवी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी श्रीपादजींचा 'स्वामी' असाच उल्लेख केला. कारण श्रीपाद नाईक नेहमीच संत सज्जन, साधू-स्वामी यांच्या सहवासात रमतात. त्यामुळे ते भाजपसाठी किंवा भाजपचे स्वामीच आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. श्रीपाद नाईक यांचे दिल्लीतील सरकारी निवासस्थान म्हणजे दिल्लीला जाणाऱ्या गोमंतकीयांचे हक्काचे घरच जणू, गोव्याहून भाऊंच्या परिचयाची कुणीही व्यक्ती दिल्लीला गेली की, श्रीपादजींच्या घरी जाते. तिथे चांगले आदरातिथ्यही होते आणि गरज पडल्यास निवासाचीही व्यवस्था होते. मुख्यमंत्री सावंत यांनीही नाईक यांच्या स्वभावगुणांचे कौतुक केले. 

गोव्यात जे केंद्राचे विविध प्रकल्प उभे राहिले, त्यात नाईक यांचे योगदान आहेच. श्रीपाद नाईक यांना चांगल्या अर्थाने 'स्वामी' ही पदवी मुख्यमंत्री व इतरांनी दिली. मात्र, नाईक यांना कुणी मठात मात्र बसवू नये, त्यांना पुन्हा तिकीट द्यावे, अशी मागणी श्रीपादजींच्या समर्थकांकडून मनोमन केली जाईलच. श्रीपाद नाईक यांचे कार्यकर्ते पुन्हा एकदा भाऊंना खासदार करण्यासाठी तळमळत आहेत. मात्र, अनेकांच्या मनात अजूनही तिकिटाविषयी धाकधूक आहे. काही महिन्यांपूर्वी स्वतः श्रीपाद नाईकदेखील अस्वस्थ झाले होते. 

सदानंद तानावडे राज्यसभेचे खासदार होण्यापूर्वी तानावडे यांचा धसका भाऊंनी काही प्रमाणात घेतला होताच. तानावडे उत्तर गोव्यात खूप फिरत होते. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीवेळी तिकिटावर दावा करतील, असे भाऊ समर्थकांना वाटत होते. मात्र, तानावडे राज्यसभेवर गेले व तो प्रश्न मिटला. बुधवारी योगायोगाने तानावडे हे एकटेच श्रीपादजींच्या वाढदिवस सोहळ्याला उपस्थित नव्हते. त्याचे कारण एवढेच की, त्यांना दोन दिवस ताप येत होता व प्रकृती ठीक नव्हती. श्रीपाद नाईक यांनी भाजपच्या एका बैठकीतदेखील काही महिन्यांपूर्वी स्वत:च्या तिकिटाविषयी शंका विचारली होती. 

मात्र, लोकसभेसाठी भाजपचे तिकीट हे शेवटी दिल्लीत ठरते, गोव्यात ठरत नाही. स्वर्गीय मनोहर पर्रीकर हयात होते तेव्हा मात्र भाजपचे सगळे महत्त्वाचे निर्णय गोव्यात होत असत. आता 'सब कुछ दिल्ली' अशी स्थिती आहे. पर्रीकर यांच्या शब्दाला मोठे वजन होते म्हणूनच विनय तेंडुलकर यांना राज्यसभा खासदार होण्याची संधी मिळाली होती. पर्रीकर व श्रीपाद नाईक यांच्यातील सुप्त संघर्ष हा वीस- बावीस वर्षे गोव्यात अनुभवायला मिळाला. १९९९ साली मडकईमध्ये भाऊंचा पराभव झाल्यानंतर लगेच लोकसभा निवडणुका आल्या व मग भाऊ दिल्लीत पोहोचले ते कायमचेच. त्यांनी सातत्याने लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विक्रम नोंदविला आहे. एकदाही ते लोकसभेची निवडणूक हरले नाहीत, हे विशेष. 

केंद्रात काँग्रेसप्रणित यूपीएची राजवट होती तेव्हादेखील भाऊ उत्तरेत जिंकलेच. आता यावेळी अनेकजण बाशिंग बांधत आहेत. श्रीपादभाऊ स्पर्धेत आहेतच. भाऊ हे सज्जन व स्वामी असले तरी ते मठात बसणाऱ्यांपैकी नाहीत. त्यांना अडवाणीप्रमाणे कुणी भाजपच्या मार्गदर्शक मंडळात पाठविण्याचा विचार करू नये एवढेच.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा