शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
7
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
8
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
9
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
10
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
11
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
12
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
13
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
14
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
15
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
16
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
17
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
18
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
19
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
20
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप

श्रीपाद जेव्हा स्वामी होतात; खासदारकीची २५ वर्ष अन् भाजपमधील कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 15:14 IST

नाईक यांनी खासदार या नात्याने २४-२५ वर्षांची कारकीर्द पूर्ण केली.

केंद्रीय राज्यमंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांचा वाढदिवस बुधवारी साजरा झाला. नाईक यांनी खासदार या नात्याने २४-२५ वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. १९९९ साली श्रीपादजी प्रथम खासदार झाले होते. ९० च्या दशकाच्या अखेरीस मडकई मतदारसंघात श्रीपाद नाईक विधानसभा निवडणूक हरले नसते तर ते कदाचित लोकसभेचे सदस्यही कधी होऊ शकले नसते. त्यांच्या वाट्याला वाजपेयी, मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होण्याचे भाग्यही कदाचित आले नसते. मात्र, दैवगती वेगळी असते. त्यामुळे ते सरपंच ते केंद्रीय मंत्री असा तेजस्वी प्रवास करू शकले. अत्यंत भीषण अपघातात ते अलीकडेच बचावले. त्या अपघातात त्यांच्या धर्मपत्नीचे निधन झाले. श्रीपाद नाईक यांच्यावर मनापासून प्रेम करणारे सगळेच गोमंतकीय त्यावेळी हळहळले. बुधवारी श्रीपाद नाईक यांचा वाढदिवस साजरा होत असताना त्यांच्या पत्नीची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवली.

श्रीपाद नाईक हे भाजपमधील स्वामीच आहेत किंवा ते भाजपचे स्वामीच आहेत, अशा अर्थाचे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाऊंच्या वाढदिवस सोहळ्यात केले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक यांनी प्रथम आपल्या भाषणात श्रीपादजींना 'स्वामी' ही पदवी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी श्रीपादजींचा 'स्वामी' असाच उल्लेख केला. कारण श्रीपाद नाईक नेहमीच संत सज्जन, साधू-स्वामी यांच्या सहवासात रमतात. त्यामुळे ते भाजपसाठी किंवा भाजपचे स्वामीच आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. श्रीपाद नाईक यांचे दिल्लीतील सरकारी निवासस्थान म्हणजे दिल्लीला जाणाऱ्या गोमंतकीयांचे हक्काचे घरच जणू, गोव्याहून भाऊंच्या परिचयाची कुणीही व्यक्ती दिल्लीला गेली की, श्रीपादजींच्या घरी जाते. तिथे चांगले आदरातिथ्यही होते आणि गरज पडल्यास निवासाचीही व्यवस्था होते. मुख्यमंत्री सावंत यांनीही नाईक यांच्या स्वभावगुणांचे कौतुक केले. 

गोव्यात जे केंद्राचे विविध प्रकल्प उभे राहिले, त्यात नाईक यांचे योगदान आहेच. श्रीपाद नाईक यांना चांगल्या अर्थाने 'स्वामी' ही पदवी मुख्यमंत्री व इतरांनी दिली. मात्र, नाईक यांना कुणी मठात मात्र बसवू नये, त्यांना पुन्हा तिकीट द्यावे, अशी मागणी श्रीपादजींच्या समर्थकांकडून मनोमन केली जाईलच. श्रीपाद नाईक यांचे कार्यकर्ते पुन्हा एकदा भाऊंना खासदार करण्यासाठी तळमळत आहेत. मात्र, अनेकांच्या मनात अजूनही तिकिटाविषयी धाकधूक आहे. काही महिन्यांपूर्वी स्वतः श्रीपाद नाईकदेखील अस्वस्थ झाले होते. 

सदानंद तानावडे राज्यसभेचे खासदार होण्यापूर्वी तानावडे यांचा धसका भाऊंनी काही प्रमाणात घेतला होताच. तानावडे उत्तर गोव्यात खूप फिरत होते. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीवेळी तिकिटावर दावा करतील, असे भाऊ समर्थकांना वाटत होते. मात्र, तानावडे राज्यसभेवर गेले व तो प्रश्न मिटला. बुधवारी योगायोगाने तानावडे हे एकटेच श्रीपादजींच्या वाढदिवस सोहळ्याला उपस्थित नव्हते. त्याचे कारण एवढेच की, त्यांना दोन दिवस ताप येत होता व प्रकृती ठीक नव्हती. श्रीपाद नाईक यांनी भाजपच्या एका बैठकीतदेखील काही महिन्यांपूर्वी स्वत:च्या तिकिटाविषयी शंका विचारली होती. 

मात्र, लोकसभेसाठी भाजपचे तिकीट हे शेवटी दिल्लीत ठरते, गोव्यात ठरत नाही. स्वर्गीय मनोहर पर्रीकर हयात होते तेव्हा मात्र भाजपचे सगळे महत्त्वाचे निर्णय गोव्यात होत असत. आता 'सब कुछ दिल्ली' अशी स्थिती आहे. पर्रीकर यांच्या शब्दाला मोठे वजन होते म्हणूनच विनय तेंडुलकर यांना राज्यसभा खासदार होण्याची संधी मिळाली होती. पर्रीकर व श्रीपाद नाईक यांच्यातील सुप्त संघर्ष हा वीस- बावीस वर्षे गोव्यात अनुभवायला मिळाला. १९९९ साली मडकईमध्ये भाऊंचा पराभव झाल्यानंतर लगेच लोकसभा निवडणुका आल्या व मग भाऊ दिल्लीत पोहोचले ते कायमचेच. त्यांनी सातत्याने लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विक्रम नोंदविला आहे. एकदाही ते लोकसभेची निवडणूक हरले नाहीत, हे विशेष. 

केंद्रात काँग्रेसप्रणित यूपीएची राजवट होती तेव्हादेखील भाऊ उत्तरेत जिंकलेच. आता यावेळी अनेकजण बाशिंग बांधत आहेत. श्रीपादभाऊ स्पर्धेत आहेतच. भाऊ हे सज्जन व स्वामी असले तरी ते मठात बसणाऱ्यांपैकी नाहीत. त्यांना अडवाणीप्रमाणे कुणी भाजपच्या मार्गदर्शक मंडळात पाठविण्याचा विचार करू नये एवढेच.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा