शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

श्रीपाद जेव्हा स्वामी होतात; खासदारकीची २५ वर्ष अन् भाजपमधील कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 15:14 IST

नाईक यांनी खासदार या नात्याने २४-२५ वर्षांची कारकीर्द पूर्ण केली.

केंद्रीय राज्यमंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांचा वाढदिवस बुधवारी साजरा झाला. नाईक यांनी खासदार या नात्याने २४-२५ वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. १९९९ साली श्रीपादजी प्रथम खासदार झाले होते. ९० च्या दशकाच्या अखेरीस मडकई मतदारसंघात श्रीपाद नाईक विधानसभा निवडणूक हरले नसते तर ते कदाचित लोकसभेचे सदस्यही कधी होऊ शकले नसते. त्यांच्या वाट्याला वाजपेयी, मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होण्याचे भाग्यही कदाचित आले नसते. मात्र, दैवगती वेगळी असते. त्यामुळे ते सरपंच ते केंद्रीय मंत्री असा तेजस्वी प्रवास करू शकले. अत्यंत भीषण अपघातात ते अलीकडेच बचावले. त्या अपघातात त्यांच्या धर्मपत्नीचे निधन झाले. श्रीपाद नाईक यांच्यावर मनापासून प्रेम करणारे सगळेच गोमंतकीय त्यावेळी हळहळले. बुधवारी श्रीपाद नाईक यांचा वाढदिवस साजरा होत असताना त्यांच्या पत्नीची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवली.

श्रीपाद नाईक हे भाजपमधील स्वामीच आहेत किंवा ते भाजपचे स्वामीच आहेत, अशा अर्थाचे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाऊंच्या वाढदिवस सोहळ्यात केले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक यांनी प्रथम आपल्या भाषणात श्रीपादजींना 'स्वामी' ही पदवी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी श्रीपादजींचा 'स्वामी' असाच उल्लेख केला. कारण श्रीपाद नाईक नेहमीच संत सज्जन, साधू-स्वामी यांच्या सहवासात रमतात. त्यामुळे ते भाजपसाठी किंवा भाजपचे स्वामीच आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. श्रीपाद नाईक यांचे दिल्लीतील सरकारी निवासस्थान म्हणजे दिल्लीला जाणाऱ्या गोमंतकीयांचे हक्काचे घरच जणू, गोव्याहून भाऊंच्या परिचयाची कुणीही व्यक्ती दिल्लीला गेली की, श्रीपादजींच्या घरी जाते. तिथे चांगले आदरातिथ्यही होते आणि गरज पडल्यास निवासाचीही व्यवस्था होते. मुख्यमंत्री सावंत यांनीही नाईक यांच्या स्वभावगुणांचे कौतुक केले. 

गोव्यात जे केंद्राचे विविध प्रकल्प उभे राहिले, त्यात नाईक यांचे योगदान आहेच. श्रीपाद नाईक यांना चांगल्या अर्थाने 'स्वामी' ही पदवी मुख्यमंत्री व इतरांनी दिली. मात्र, नाईक यांना कुणी मठात मात्र बसवू नये, त्यांना पुन्हा तिकीट द्यावे, अशी मागणी श्रीपादजींच्या समर्थकांकडून मनोमन केली जाईलच. श्रीपाद नाईक यांचे कार्यकर्ते पुन्हा एकदा भाऊंना खासदार करण्यासाठी तळमळत आहेत. मात्र, अनेकांच्या मनात अजूनही तिकिटाविषयी धाकधूक आहे. काही महिन्यांपूर्वी स्वतः श्रीपाद नाईकदेखील अस्वस्थ झाले होते. 

सदानंद तानावडे राज्यसभेचे खासदार होण्यापूर्वी तानावडे यांचा धसका भाऊंनी काही प्रमाणात घेतला होताच. तानावडे उत्तर गोव्यात खूप फिरत होते. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीवेळी तिकिटावर दावा करतील, असे भाऊ समर्थकांना वाटत होते. मात्र, तानावडे राज्यसभेवर गेले व तो प्रश्न मिटला. बुधवारी योगायोगाने तानावडे हे एकटेच श्रीपादजींच्या वाढदिवस सोहळ्याला उपस्थित नव्हते. त्याचे कारण एवढेच की, त्यांना दोन दिवस ताप येत होता व प्रकृती ठीक नव्हती. श्रीपाद नाईक यांनी भाजपच्या एका बैठकीतदेखील काही महिन्यांपूर्वी स्वत:च्या तिकिटाविषयी शंका विचारली होती. 

मात्र, लोकसभेसाठी भाजपचे तिकीट हे शेवटी दिल्लीत ठरते, गोव्यात ठरत नाही. स्वर्गीय मनोहर पर्रीकर हयात होते तेव्हा मात्र भाजपचे सगळे महत्त्वाचे निर्णय गोव्यात होत असत. आता 'सब कुछ दिल्ली' अशी स्थिती आहे. पर्रीकर यांच्या शब्दाला मोठे वजन होते म्हणूनच विनय तेंडुलकर यांना राज्यसभा खासदार होण्याची संधी मिळाली होती. पर्रीकर व श्रीपाद नाईक यांच्यातील सुप्त संघर्ष हा वीस- बावीस वर्षे गोव्यात अनुभवायला मिळाला. १९९९ साली मडकईमध्ये भाऊंचा पराभव झाल्यानंतर लगेच लोकसभा निवडणुका आल्या व मग भाऊ दिल्लीत पोहोचले ते कायमचेच. त्यांनी सातत्याने लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विक्रम नोंदविला आहे. एकदाही ते लोकसभेची निवडणूक हरले नाहीत, हे विशेष. 

केंद्रात काँग्रेसप्रणित यूपीएची राजवट होती तेव्हादेखील भाऊ उत्तरेत जिंकलेच. आता यावेळी अनेकजण बाशिंग बांधत आहेत. श्रीपादभाऊ स्पर्धेत आहेतच. भाऊ हे सज्जन व स्वामी असले तरी ते मठात बसणाऱ्यांपैकी नाहीत. त्यांना अडवाणीप्रमाणे कुणी भाजपच्या मार्गदर्शक मंडळात पाठविण्याचा विचार करू नये एवढेच.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा