शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

किनारपट्टीत वीज व पाण्याची तीव्र समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 20:33 IST

बार्देशच्या किनारपट्टीत हॉटेल्स, रिसॉर्ट्स वगैरे रोज आठ तास जनरेटवर चालतात असे मंत्री लोबो यांनी सांगितले.

ठळक मुद्देकळंगुट, कांदोळीसह अन्य पंचायत क्षेत्रंतील सुमारे पन्नास पंच सदस्यांना घेऊन मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्री  सावंत यांची भेट घेतली. वीज व पाणी समस्येमुळे बार्देश ते पेडणेपर्यंतच्या किनारी भागातील पर्यटनाला धक्का बसला आहे.

पणजी - उत्तर गोव्याच्या किनारपट्टीत वीज व पाण्याची समस्या तीव्र बनली आहे. त्यामुळे सगळेच हैराण झालेले आहेत अशी कैफियत विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी बार्देश तालुक्यातील अनेक पंच सदस्यांसोबत सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमोर मांडली. बार्देशच्या किनारपट्टीत हॉटेल्स, रिसॉर्ट्स वगैरे रोज आठ तास जनरेटवर चालतात असे मंत्री लोबो यांनी सांगितले.

कळंगुट, कांदोळीसह अन्य पंचायत क्षेत्रंतील सुमारे पन्नास पंच सदस्यांना घेऊन मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्री  सावंत यांची भेट घेतली. वीज मंत्री निलेश काब्राल यांनाही ते भेटले. बार्देश तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. लोक कंटाळले आहेत. हॉटेल्स व रिसॉर्ट्स तर जनरेटरवरच चालतात. यामुळे हवाही प्रदुषित होत आहे, असे मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर पत्रकारांना सांगितले. गेली पंधरा वर्षे वीज व पाणी क्षेत्रतील ज्या साधनसुविधांमध्ये सुधारणा व्हायला हवी होती, ती झालेलीच नाही. म्हापसा शहर आणि बार्देश तालुका पिण्याच्या पाण्याच्या तीव्र समस्येला सध्या सामोरा जात आहे, असे लोबो यांनी नमूद केले.

बार्देश तालुक्यात 1970 साली ज्या जलवाहिन्या टाकल्या गेल्या होत्या, त्यांची क्षमता कधीच संपून गेली आहे. त्यांचाच वापर अजुनही सुरू आहे. गेल्या दहा- पंधरा वर्षात नवे बदल झाले नाहीत. केवळ वरवरची डागडुजी तेवढी केली गेली, असे मंत्री लोबो यांनी सांगितले. म्हापसा शहराला सध्याही पाणी नाही. मी जेव्हा दर आठवडय़ाला उपजिल्हाधिकारी कार्यालयास भेट देण्यासाठी जातो तेव्हा तिथेही पाण्याची समस्या असल्याचे मला सांगितले जाते. सरकारी कार्यालयातही पाणी येत नाही व त्यामुळे शौचालयांमधून दरुगधी येते, असे कर्मचारी मला सांगतात असे लोबो यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वीज व पाणी समस्येमुळे बार्देश ते पेडणेपर्यंतच्या किनारी भागातील पर्यटनाला धक्का बसला आहे. पर्यटन व्यवसायाला स्थिती मारक ठरत आहे. कळंगुटला वीज उपकेंद्र उभे करण्यासाठी आम्ही कोमुनिदादीकडून सोमवारी ना हरकत दाखला मिळवून दिला. सुमारे पाच हजार सातशे चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा कोमुनिदादीने या उपकेंद्रासाठी दिली आहे. बार्देशला एकदा 180 कोटी रुपयांचे वीज केंद्र उभे झाले की, मग वीज समस्या सुटेल. त्यासाठी सरकार पुन्हा निविदा जारी करत असल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाWaterपाणीelectricityवीज