शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

किनारपट्टीत वीज व पाण्याची तीव्र समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 20:33 IST

बार्देशच्या किनारपट्टीत हॉटेल्स, रिसॉर्ट्स वगैरे रोज आठ तास जनरेटवर चालतात असे मंत्री लोबो यांनी सांगितले.

ठळक मुद्देकळंगुट, कांदोळीसह अन्य पंचायत क्षेत्रंतील सुमारे पन्नास पंच सदस्यांना घेऊन मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्री  सावंत यांची भेट घेतली. वीज व पाणी समस्येमुळे बार्देश ते पेडणेपर्यंतच्या किनारी भागातील पर्यटनाला धक्का बसला आहे.

पणजी - उत्तर गोव्याच्या किनारपट्टीत वीज व पाण्याची समस्या तीव्र बनली आहे. त्यामुळे सगळेच हैराण झालेले आहेत अशी कैफियत विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी बार्देश तालुक्यातील अनेक पंच सदस्यांसोबत सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमोर मांडली. बार्देशच्या किनारपट्टीत हॉटेल्स, रिसॉर्ट्स वगैरे रोज आठ तास जनरेटवर चालतात असे मंत्री लोबो यांनी सांगितले.

कळंगुट, कांदोळीसह अन्य पंचायत क्षेत्रंतील सुमारे पन्नास पंच सदस्यांना घेऊन मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्री  सावंत यांची भेट घेतली. वीज मंत्री निलेश काब्राल यांनाही ते भेटले. बार्देश तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. लोक कंटाळले आहेत. हॉटेल्स व रिसॉर्ट्स तर जनरेटरवरच चालतात. यामुळे हवाही प्रदुषित होत आहे, असे मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर पत्रकारांना सांगितले. गेली पंधरा वर्षे वीज व पाणी क्षेत्रतील ज्या साधनसुविधांमध्ये सुधारणा व्हायला हवी होती, ती झालेलीच नाही. म्हापसा शहर आणि बार्देश तालुका पिण्याच्या पाण्याच्या तीव्र समस्येला सध्या सामोरा जात आहे, असे लोबो यांनी नमूद केले.

बार्देश तालुक्यात 1970 साली ज्या जलवाहिन्या टाकल्या गेल्या होत्या, त्यांची क्षमता कधीच संपून गेली आहे. त्यांचाच वापर अजुनही सुरू आहे. गेल्या दहा- पंधरा वर्षात नवे बदल झाले नाहीत. केवळ वरवरची डागडुजी तेवढी केली गेली, असे मंत्री लोबो यांनी सांगितले. म्हापसा शहराला सध्याही पाणी नाही. मी जेव्हा दर आठवडय़ाला उपजिल्हाधिकारी कार्यालयास भेट देण्यासाठी जातो तेव्हा तिथेही पाण्याची समस्या असल्याचे मला सांगितले जाते. सरकारी कार्यालयातही पाणी येत नाही व त्यामुळे शौचालयांमधून दरुगधी येते, असे कर्मचारी मला सांगतात असे लोबो यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वीज व पाणी समस्येमुळे बार्देश ते पेडणेपर्यंतच्या किनारी भागातील पर्यटनाला धक्का बसला आहे. पर्यटन व्यवसायाला स्थिती मारक ठरत आहे. कळंगुटला वीज उपकेंद्र उभे करण्यासाठी आम्ही कोमुनिदादीकडून सोमवारी ना हरकत दाखला मिळवून दिला. सुमारे पाच हजार सातशे चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा कोमुनिदादीने या उपकेंद्रासाठी दिली आहे. बार्देशला एकदा 180 कोटी रुपयांचे वीज केंद्र उभे झाले की, मग वीज समस्या सुटेल. त्यासाठी सरकार पुन्हा निविदा जारी करत असल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाWaterपाणीelectricityवीज