शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

किनारपट्टीत वीज व पाण्याची तीव्र समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 20:33 IST

बार्देशच्या किनारपट्टीत हॉटेल्स, रिसॉर्ट्स वगैरे रोज आठ तास जनरेटवर चालतात असे मंत्री लोबो यांनी सांगितले.

ठळक मुद्देकळंगुट, कांदोळीसह अन्य पंचायत क्षेत्रंतील सुमारे पन्नास पंच सदस्यांना घेऊन मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्री  सावंत यांची भेट घेतली. वीज व पाणी समस्येमुळे बार्देश ते पेडणेपर्यंतच्या किनारी भागातील पर्यटनाला धक्का बसला आहे.

पणजी - उत्तर गोव्याच्या किनारपट्टीत वीज व पाण्याची समस्या तीव्र बनली आहे. त्यामुळे सगळेच हैराण झालेले आहेत अशी कैफियत विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी बार्देश तालुक्यातील अनेक पंच सदस्यांसोबत सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमोर मांडली. बार्देशच्या किनारपट्टीत हॉटेल्स, रिसॉर्ट्स वगैरे रोज आठ तास जनरेटवर चालतात असे मंत्री लोबो यांनी सांगितले.

कळंगुट, कांदोळीसह अन्य पंचायत क्षेत्रंतील सुमारे पन्नास पंच सदस्यांना घेऊन मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्री  सावंत यांची भेट घेतली. वीज मंत्री निलेश काब्राल यांनाही ते भेटले. बार्देश तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. लोक कंटाळले आहेत. हॉटेल्स व रिसॉर्ट्स तर जनरेटरवरच चालतात. यामुळे हवाही प्रदुषित होत आहे, असे मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर पत्रकारांना सांगितले. गेली पंधरा वर्षे वीज व पाणी क्षेत्रतील ज्या साधनसुविधांमध्ये सुधारणा व्हायला हवी होती, ती झालेलीच नाही. म्हापसा शहर आणि बार्देश तालुका पिण्याच्या पाण्याच्या तीव्र समस्येला सध्या सामोरा जात आहे, असे लोबो यांनी नमूद केले.

बार्देश तालुक्यात 1970 साली ज्या जलवाहिन्या टाकल्या गेल्या होत्या, त्यांची क्षमता कधीच संपून गेली आहे. त्यांचाच वापर अजुनही सुरू आहे. गेल्या दहा- पंधरा वर्षात नवे बदल झाले नाहीत. केवळ वरवरची डागडुजी तेवढी केली गेली, असे मंत्री लोबो यांनी सांगितले. म्हापसा शहराला सध्याही पाणी नाही. मी जेव्हा दर आठवडय़ाला उपजिल्हाधिकारी कार्यालयास भेट देण्यासाठी जातो तेव्हा तिथेही पाण्याची समस्या असल्याचे मला सांगितले जाते. सरकारी कार्यालयातही पाणी येत नाही व त्यामुळे शौचालयांमधून दरुगधी येते, असे कर्मचारी मला सांगतात असे लोबो यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वीज व पाणी समस्येमुळे बार्देश ते पेडणेपर्यंतच्या किनारी भागातील पर्यटनाला धक्का बसला आहे. पर्यटन व्यवसायाला स्थिती मारक ठरत आहे. कळंगुटला वीज उपकेंद्र उभे करण्यासाठी आम्ही कोमुनिदादीकडून सोमवारी ना हरकत दाखला मिळवून दिला. सुमारे पाच हजार सातशे चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा कोमुनिदादीने या उपकेंद्रासाठी दिली आहे. बार्देशला एकदा 180 कोटी रुपयांचे वीज केंद्र उभे झाले की, मग वीज समस्या सुटेल. त्यासाठी सरकार पुन्हा निविदा जारी करत असल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाWaterपाणीelectricityवीज