शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

गोव्यात अडकलेल्या दोन हजार विदेशी पर्यटकांना मायदेशी नेण्यासाठी येणार सात खास विमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 8:35 PM

वास्को: लॉकडाऊन मुळे गोव्यात अडकून राहीलेल्या दोन हजार विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी हालचाली चालू करण्यात आल्या आहेत. पुढच्या ...

वास्को: लॉकडाऊन मुळे गोव्यात अडकून राहीलेल्या दोन हजार विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी हालचाली चालू करण्यात आल्या आहेत. पुढच्या पाच दिवसात दाबोळी विमानतळावर विविध देशातून सात खास विमाने या पर्यटकांना नेण्यासाठी गोव्यात येणार आहेत. लॉकडाऊन मुळे गोव्यात अडकून राहीलेल्या ३९९ विदेशी पर्यटकांना यापूर्वी दाबोळी विमानतळावरून खास विमानाने त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलेले आहे.

कोरोना विषाणूची पसरण रोखण्यासाठी संपूर्ण भारतात २१ दिवसासाठी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. याचे पालन गोव्यात सुद्धा कडक रित्या करण्यात येत असून यामुळे दाबोळी विमानतळावर राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय विमानसेवा सद्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. याचा परिणाम गोव्यात असलेल्या विदेशी पर्यटकांवर पडलेला असून त्यांना सद्या मायदेशी जाणे कठीण झालेले आहे. सदर पर्यटकांना मायदेशी पाठवण्यासाठी विविध हालचाली चालू करण्यात आलेल्या असून लवकरच त्यांना त्यांच्या राष्ट्रात पाठवण्यात येणार असल्याचे दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी सांगितले.

लॉकडाऊन झाल्यानंतर गोव्यात अडकून राहीलेल्या ३९९ विदेशी पर्यटकांना अजून पर्यंत खास विमानाने त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले आहे. यात २४९ युनायटेड किंगडम, १२१ रशिया व २९ चेक प्रजासत्ताक चे नागरिक असल्याची माहीती गगन मलिक यांनी दिली. गोव्यात अजून आणखीन २००० विदेशी पर्यटक अडकून असल्याची माहीती मलिक यांनी देऊन येणाऱ्या चार ते पाच दिवसात त्यांना सुद्धा त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. गोव्यात अडकून राहीलेल्या या विदेशी पर्यटकात फ्रेंकफट (जर्मनी), फिनलँड, इस्त्राईल, रशिया व वॉरसॉ (पोलंड) या राष्ट्रातील नागरिकांचा समावेश असल्याची माहीती संचालक गगन मलिक यांनी दिली.

लॉकडाऊन मुळे अडकून राहीलेल्या विदेशी पर्यटकांना नेण्यासाठी चार ते पाच दिवसात दाबोळी विमानतळावर सात खास विमाने येणार असून ती त्यांना घेऊन त्यांच्या मायदेशी जाणार आहेत. या दोन हजार विदेशी पर्यटकांव्यतिरिक्त गोव्यात आणखीन विदेशी पर्यटक अडकून राहीलेले आहेत काय याची चौकशी चालू असून असे असल्यास त्यांना सुद्धा येथून नेण्यासाठी येणाºया काळात उचित पावले उचलण्यात येणार असल्याचा विश्वास गगन मलिक यांनी पुढे व्यक्त केला. या पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येत असताना कोरोना विषाणूची पसरण होऊ नये यासाठी विविध प्रकारची खबरदारी बाळगण्यात येत आहे. प्रवाशी विमानातून जाताना सामाजिक अंतर (सोशल डीस्टंन्सीग) व इतर विविध प्रकारची सुरक्षेच्या दृष्टीने दाबोळी विमानतळावर पावले उचलण्यात येत असल्याचे मलिक यांनी माहीतीत शेवटी सांगितले.