शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सात सरकारी 'मराठी' शाळांना लागले टाळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2024 10:52 IST

मराठीप्रेमी असणाऱ्या डिचोलीतील चार तर फोंड्यातील ३ शाळांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : एकही विद्यार्थी नसल्याने सात सरकारी मराठी प्राथमिक शाळा चालू शैक्षणिक वर्षात बंद पडल्या आहेत. यापैकी चार सरकारी शाळा मराठीप्रेमी मोठ्या संख्येने असलेल्या डिचोली तालुक्यांमधील तर तीन सरकारी शाळा फोंडा तालुक्यातील आहेत.

डिचोली तालुक्यात आमठाणे स. प्रा. शाळा, खारेखाजन-विर्डी स. प्रा. शाळा, चिंचवाडा-पाळे स. प्रा. शाळा व लामगाव स. प्रा. शाळा या चार शाळा बंद पडलेल्या आहेत. तर फोंडा तालुक्यात गावणे नं. १ स. प्रा. शाळा, साक्रे-शिरोडा स. प्रा. शाळा व तिराळ उसगाव स. प्रा. शाळा या तीन शाळा बंद पडलेल्या आहेत. पटसंख्या कमी झाल्यावर एरव्ही एखादी सरकारी शाळा नजीकच्या दुसऱ्या शाळेत विलीन केली जाते. परंतु वरील सातही शाळांना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत एकही विद्यार्थी मिळू शकला नाही. त्यामुळे त्या विलीन करण्याचीही संधी मिळू शकली नाही.

शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी वरील शाळांमध्ये एकही विद्यार्थी नव्हता, त्यामुळे त्या बंद कराव्या लागल्या. एक जरी विद्यार्थी असला तरी आम्ही शाळा चालू ठेवतो. पालकांचा विरोध होत असल्याने कमी पटसंख्या असलेल्या शाळा जवळच्या अन्य शाळांमध्ये विलीन करण्याचेही आम्ही बंद केले आहे.

'खासगी'ला पसंती

बंद पडलेल्या वरील शाळांमधील सर्व दस्तऐवज साहाय्यक भाग शिक्षण निरीक्षकांच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहेत. त्याची सूची करण्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. सरकारी शाळा बंद पडत असल्या तरी खासगी मराठी प्राथमिक शाळांमध्ये भरमसाट फी भरुन पाल्यांना पाठवणारे पालक मोठ्या संख्येने आहेत.

२०० शाळा बंद होणार

दोन वर्षापूर्वी मी भाकीत केले होते की पुढील तीन वर्षात २०० प्राथमिक शाळा बंद पडतील. माझे म्हणणे खरे ठरले आहे. काही शाळांमध्ये नोकऱ्या टिकवण्यासाठी पटसंख्या दाखवली जात आहे. प्रत्यक्षात विद्यार्थी नाहीत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली परंतु १४० शिक्षकांची भरती गेली दोन वर्षे रखडली आहे, असेही प्रा. वेलिंगकर यांनी निदर्शनास आणून दिले.

सरकारला कोणतेही स्वारस्य नाही : वेलिंगकर

भारतीय भाषा सुरक्षा मंचचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी टीका करताना हे सरकार एकही शाळा टिकवू शकणार नाही, असा हल्लाबोल केला. केवळ इमारती बांधल्या म्हणून भागणार नाही. मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा टिकवण्याचीही तेवढीच गरज आहे. आम्ही सरकारचा एकही पैसा न घेता ५० शाळा चालवल्या. सरकारला जमत नसेल तर पाच वर्षासाठी या शाळा विद्या भारतीकडे द्या, आम्ही त्या चालवून दाखवतो. 

टॅग्स :goaगोवाSchoolशाळा