शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सात सरकारी 'मराठी' शाळांना लागले टाळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2024 10:52 IST

मराठीप्रेमी असणाऱ्या डिचोलीतील चार तर फोंड्यातील ३ शाळांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : एकही विद्यार्थी नसल्याने सात सरकारी मराठी प्राथमिक शाळा चालू शैक्षणिक वर्षात बंद पडल्या आहेत. यापैकी चार सरकारी शाळा मराठीप्रेमी मोठ्या संख्येने असलेल्या डिचोली तालुक्यांमधील तर तीन सरकारी शाळा फोंडा तालुक्यातील आहेत.

डिचोली तालुक्यात आमठाणे स. प्रा. शाळा, खारेखाजन-विर्डी स. प्रा. शाळा, चिंचवाडा-पाळे स. प्रा. शाळा व लामगाव स. प्रा. शाळा या चार शाळा बंद पडलेल्या आहेत. तर फोंडा तालुक्यात गावणे नं. १ स. प्रा. शाळा, साक्रे-शिरोडा स. प्रा. शाळा व तिराळ उसगाव स. प्रा. शाळा या तीन शाळा बंद पडलेल्या आहेत. पटसंख्या कमी झाल्यावर एरव्ही एखादी सरकारी शाळा नजीकच्या दुसऱ्या शाळेत विलीन केली जाते. परंतु वरील सातही शाळांना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत एकही विद्यार्थी मिळू शकला नाही. त्यामुळे त्या विलीन करण्याचीही संधी मिळू शकली नाही.

शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी वरील शाळांमध्ये एकही विद्यार्थी नव्हता, त्यामुळे त्या बंद कराव्या लागल्या. एक जरी विद्यार्थी असला तरी आम्ही शाळा चालू ठेवतो. पालकांचा विरोध होत असल्याने कमी पटसंख्या असलेल्या शाळा जवळच्या अन्य शाळांमध्ये विलीन करण्याचेही आम्ही बंद केले आहे.

'खासगी'ला पसंती

बंद पडलेल्या वरील शाळांमधील सर्व दस्तऐवज साहाय्यक भाग शिक्षण निरीक्षकांच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहेत. त्याची सूची करण्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. सरकारी शाळा बंद पडत असल्या तरी खासगी मराठी प्राथमिक शाळांमध्ये भरमसाट फी भरुन पाल्यांना पाठवणारे पालक मोठ्या संख्येने आहेत.

२०० शाळा बंद होणार

दोन वर्षापूर्वी मी भाकीत केले होते की पुढील तीन वर्षात २०० प्राथमिक शाळा बंद पडतील. माझे म्हणणे खरे ठरले आहे. काही शाळांमध्ये नोकऱ्या टिकवण्यासाठी पटसंख्या दाखवली जात आहे. प्रत्यक्षात विद्यार्थी नाहीत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली परंतु १४० शिक्षकांची भरती गेली दोन वर्षे रखडली आहे, असेही प्रा. वेलिंगकर यांनी निदर्शनास आणून दिले.

सरकारला कोणतेही स्वारस्य नाही : वेलिंगकर

भारतीय भाषा सुरक्षा मंचचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी टीका करताना हे सरकार एकही शाळा टिकवू शकणार नाही, असा हल्लाबोल केला. केवळ इमारती बांधल्या म्हणून भागणार नाही. मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळा टिकवण्याचीही तेवढीच गरज आहे. आम्ही सरकारचा एकही पैसा न घेता ५० शाळा चालवल्या. सरकारला जमत नसेल तर पाच वर्षासाठी या शाळा विद्या भारतीकडे द्या, आम्ही त्या चालवून दाखवतो. 

टॅग्स :goaगोवाSchoolशाळा