शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात शाळा १ एप्रिलपासून, तर निकाल २९ रोजी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2025 09:42 IST

नव्या शैक्षणिक सत्राची शिक्षण खात्याकडून तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: यंदा शैक्षणिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असले तरी जुन्या वेळापत्रकात बदल न केल्यामुळे इयत्ता नववीपर्यंतचा निकाल हा २९ एप्रिल रोजीच लागणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करण्यासाठी तयारी असली तरी यंदा चालू शैक्षणिक वर्ष मात्र नवीन शैक्षणिक वर्षात संपवावे लागणार आहे.

शैक्षणिक धोरणात घेण्यात आलेल्या क्रांतीकारी निर्णयानुसार नवे शैक्षणिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू केले जाणार आहे. तसे परिपत्रकही दोन आठवड्यांपूर्वी शिक्षण खात्याकडून जारी करण्यात आले होते. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सबंधित घटकांशी संवाद साधून सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक संस्थांच्या मुख्याध्यापकांशी बैठकाही झाल्या आहेत. चालू वेळापत्रकानुसार इयत्ता नववीपर्यंतचे निकाल हे २९ एप्रिल रोजी जाहीर करावे लागणार असल्याचे शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले.

नवीन वर्षाची सुरूवात जरी निकाल जाहीर करण्यापूर्वी झाली तरी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करताना या संबंधी कोणतीही समस्या उद्भवणार नाही, असे संचालकांनी सांगितले. कारण इयतता आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण आहे आणि इयत्ता नववीला कुणी नापस झाले तर त्यांना पुरवणी परीक्षा देण्याची सवलत आहे.

 

टॅग्स :goaगोवाEducation Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणSchoolशाळा