शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल गोव्यात मुक्तीनंतरही 57 वर्षांनी पाण्यासाठी सत्याग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 12:40 IST

गोवा राज्यात आयटी हब, आयटी पार्क, डिजिटल व्यवहार, स्मार्ट सिटी आणि ई-गवर्नन्सच्या गोष्टी रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत अखंडीतपणे अलिकडे सरकार सांगत आहे.

पणजी : गोवा राज्यात आयटी हब, आयटी पार्क, डिजिटल व्यवहार, स्मार्ट सिटी आणि ई-गवर्नन्सच्या गोष्टी रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत अखंडीतपणे अलिकडे सरकार सांगत आहे. मात्र गोवा मुक्त होऊन 57 वर्षे झाली तरी, राजधानी पणजीपासून केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भागांना सरकार अजून पिण्याचे पाणी पुरवू शकत नाही. यामुळे गोमंतकीयांना अजूनही सत्याग्रह करावा लागत असल्याचा अनुभव सध्या येत आहे.

गोव्यात साळावली, अंजुणा, आमठाणो, चापोली, म्हैसाळ अशी धरणे आहेत. गोव्याची रोजची पाण्याची गरज जेवढी आहे, त्यापेक्षा जास्त पाणी येथे उपलब्ध आहे. मात्र 20 टक्के पाणी पुरवठ्यावेळी गळून किंवा चोरीद्वारे वाया जाते. राजधानी पणजी शहर स्मार्ट बनविण्याच्या कामात सध्या गोवा सरकार व्यस्त आहे. मात्र पणजीपासून जवळच असलेल्या ताळगाव, करंजाळे, पर्वरी, रायबंदर-कदंब पठार या भागांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. पणजीपासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हापसा शहरालाही पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते आणि गोव्याचा विधानसभा प्रकल्प ज्या पेन्ह द फ्रान्स पंचायत क्षेत्रात येतो, त्या क्षेत्रत व पर्वरीतही पाण्याची समस्या आहे.

पर्वरीचे आमदार व मंत्री रोहन खंवटे यांनी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांना नुकतेच पाणी समस्येबाबत पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली आहे. पाणी पुरवठा कार्यालयांवर मोर्चा नेऊन म्हापशाचे लोक तर थकलेच आहेत. सरकार तुयें येथे इलेक्ट्रॉनिक सिटी, चिंबलला आयटी पार्क आणतेय. तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी दोनापावल येथे एक हजार कोटी रुपयांचे कनवेन्शन सेंटर बांधण्याची घोषणा केली जाते. पणजीत स्मार्ट सिटीची कामे तर पर्वरीला पहिले डिजिटल शहर बनविण्याचाही संकल्प सरकार सोडते. मात्र पणजीपासून जवळच असलेल्या कदंब पठारावरील लोकांनी पाण्यासाठी सत्याग्रह आरंभला आहे. 57 वा गोवा मुक्तीदिन सोहळा काल बुधवारी गोव्यात धुमधडाक्यात साजरा झाला. त्याचवेळी कदंब पठारावरील गोमंतकीयांनी नळाद्वारे पाणी मिळावे म्हणून सत्याग्रह केला व कथित डिजिटल गोव्याचा दुसरा चेहराही दाखवून दिला. याचवेळी डिचोलीतील साळ येथे 200 मीटरचा रस्ता बांधून मिळावा म्हणून तेथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले.

टॅग्स :Waterपाणीgoaगोवा