शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल गोव्यात मुक्तीनंतरही 57 वर्षांनी पाण्यासाठी सत्याग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 12:40 IST

गोवा राज्यात आयटी हब, आयटी पार्क, डिजिटल व्यवहार, स्मार्ट सिटी आणि ई-गवर्नन्सच्या गोष्टी रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत अखंडीतपणे अलिकडे सरकार सांगत आहे.

पणजी : गोवा राज्यात आयटी हब, आयटी पार्क, डिजिटल व्यवहार, स्मार्ट सिटी आणि ई-गवर्नन्सच्या गोष्टी रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत अखंडीतपणे अलिकडे सरकार सांगत आहे. मात्र गोवा मुक्त होऊन 57 वर्षे झाली तरी, राजधानी पणजीपासून केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भागांना सरकार अजून पिण्याचे पाणी पुरवू शकत नाही. यामुळे गोमंतकीयांना अजूनही सत्याग्रह करावा लागत असल्याचा अनुभव सध्या येत आहे.

गोव्यात साळावली, अंजुणा, आमठाणो, चापोली, म्हैसाळ अशी धरणे आहेत. गोव्याची रोजची पाण्याची गरज जेवढी आहे, त्यापेक्षा जास्त पाणी येथे उपलब्ध आहे. मात्र 20 टक्के पाणी पुरवठ्यावेळी गळून किंवा चोरीद्वारे वाया जाते. राजधानी पणजी शहर स्मार्ट बनविण्याच्या कामात सध्या गोवा सरकार व्यस्त आहे. मात्र पणजीपासून जवळच असलेल्या ताळगाव, करंजाळे, पर्वरी, रायबंदर-कदंब पठार या भागांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. पणजीपासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हापसा शहरालाही पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते आणि गोव्याचा विधानसभा प्रकल्प ज्या पेन्ह द फ्रान्स पंचायत क्षेत्रात येतो, त्या क्षेत्रत व पर्वरीतही पाण्याची समस्या आहे.

पर्वरीचे आमदार व मंत्री रोहन खंवटे यांनी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांना नुकतेच पाणी समस्येबाबत पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली आहे. पाणी पुरवठा कार्यालयांवर मोर्चा नेऊन म्हापशाचे लोक तर थकलेच आहेत. सरकार तुयें येथे इलेक्ट्रॉनिक सिटी, चिंबलला आयटी पार्क आणतेय. तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी दोनापावल येथे एक हजार कोटी रुपयांचे कनवेन्शन सेंटर बांधण्याची घोषणा केली जाते. पणजीत स्मार्ट सिटीची कामे तर पर्वरीला पहिले डिजिटल शहर बनविण्याचाही संकल्प सरकार सोडते. मात्र पणजीपासून जवळच असलेल्या कदंब पठारावरील लोकांनी पाण्यासाठी सत्याग्रह आरंभला आहे. 57 वा गोवा मुक्तीदिन सोहळा काल बुधवारी गोव्यात धुमधडाक्यात साजरा झाला. त्याचवेळी कदंब पठारावरील गोमंतकीयांनी नळाद्वारे पाणी मिळावे म्हणून सत्याग्रह केला व कथित डिजिटल गोव्याचा दुसरा चेहराही दाखवून दिला. याचवेळी डिचोलीतील साळ येथे 200 मीटरचा रस्ता बांधून मिळावा म्हणून तेथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले.

टॅग्स :Waterपाणीgoaगोवा