शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

डिजिटल गोव्यात मुक्तीनंतरही 57 वर्षांनी पाण्यासाठी सत्याग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 12:40 IST

गोवा राज्यात आयटी हब, आयटी पार्क, डिजिटल व्यवहार, स्मार्ट सिटी आणि ई-गवर्नन्सच्या गोष्टी रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत अखंडीतपणे अलिकडे सरकार सांगत आहे.

पणजी : गोवा राज्यात आयटी हब, आयटी पार्क, डिजिटल व्यवहार, स्मार्ट सिटी आणि ई-गवर्नन्सच्या गोष्टी रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत अखंडीतपणे अलिकडे सरकार सांगत आहे. मात्र गोवा मुक्त होऊन 57 वर्षे झाली तरी, राजधानी पणजीपासून केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भागांना सरकार अजून पिण्याचे पाणी पुरवू शकत नाही. यामुळे गोमंतकीयांना अजूनही सत्याग्रह करावा लागत असल्याचा अनुभव सध्या येत आहे.

गोव्यात साळावली, अंजुणा, आमठाणो, चापोली, म्हैसाळ अशी धरणे आहेत. गोव्याची रोजची पाण्याची गरज जेवढी आहे, त्यापेक्षा जास्त पाणी येथे उपलब्ध आहे. मात्र 20 टक्के पाणी पुरवठ्यावेळी गळून किंवा चोरीद्वारे वाया जाते. राजधानी पणजी शहर स्मार्ट बनविण्याच्या कामात सध्या गोवा सरकार व्यस्त आहे. मात्र पणजीपासून जवळच असलेल्या ताळगाव, करंजाळे, पर्वरी, रायबंदर-कदंब पठार या भागांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. पणजीपासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हापसा शहरालाही पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते आणि गोव्याचा विधानसभा प्रकल्प ज्या पेन्ह द फ्रान्स पंचायत क्षेत्रात येतो, त्या क्षेत्रत व पर्वरीतही पाण्याची समस्या आहे.

पर्वरीचे आमदार व मंत्री रोहन खंवटे यांनी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांना नुकतेच पाणी समस्येबाबत पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली आहे. पाणी पुरवठा कार्यालयांवर मोर्चा नेऊन म्हापशाचे लोक तर थकलेच आहेत. सरकार तुयें येथे इलेक्ट्रॉनिक सिटी, चिंबलला आयटी पार्क आणतेय. तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी दोनापावल येथे एक हजार कोटी रुपयांचे कनवेन्शन सेंटर बांधण्याची घोषणा केली जाते. पणजीत स्मार्ट सिटीची कामे तर पर्वरीला पहिले डिजिटल शहर बनविण्याचाही संकल्प सरकार सोडते. मात्र पणजीपासून जवळच असलेल्या कदंब पठारावरील लोकांनी पाण्यासाठी सत्याग्रह आरंभला आहे. 57 वा गोवा मुक्तीदिन सोहळा काल बुधवारी गोव्यात धुमधडाक्यात साजरा झाला. त्याचवेळी कदंब पठारावरील गोमंतकीयांनी नळाद्वारे पाणी मिळावे म्हणून सत्याग्रह केला व कथित डिजिटल गोव्याचा दुसरा चेहराही दाखवून दिला. याचवेळी डिचोलीतील साळ येथे 200 मीटरचा रस्ता बांधून मिळावा म्हणून तेथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले.

टॅग्स :Waterपाणीgoaगोवा