शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

दक्षिणेची चावी 'सासष्टी'कडे नाही! अॅड. नरेंद्र सावईकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 13:55 IST

भाजपसाठीच अनुकूल स्थिती असल्याचा दावा.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाची चावी आता सासष्टी तालुक्याकडे राहिलेली नाही. या मतदारसंघात भाजपला अत्यंत अनुकूल स्थिती आहे. काँग्रेसमधून फुटून भाजपवासी झालेल्या आमदारांमुळे भाजपला अतिरिक्त मते मिळतील, असा दावा 'भाजप'चे इच्छुक उमेदवार अॅड. नरेंद्र सावईकर यांनी केला.

'लोकमत' कार्यालयास सोमवारी (दि. १८) दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी ते बोलत होते. फुटीर काँग्रेसी आमदारांचा यावेळी भाजप उमेदवाराला किती फायदा होणार? सासष्टीत आलेक्स सिक्वेरा यांच्या रूपाने भाजपने ख्रिस्ती मंत्री दिल्याने त्याचा येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला किती फायदा होणार, असा प्रश्न केला असता त्यांनी वरील उत्तर दिले. भाजपची स्वतःची ताकद आहेच शिवाय काँग्रेसमधून आलेले आमदारही भाजपसाठी मते आणतील, असे ते म्हणाले.

भाजपने ख्रिस्ती उमेदवार दिला तर? असा प्रश्न केला असता अॅड. सावईकर म्हणाले की, विल्फ्रेड मिस्किता यांना तिकीट देऊन पक्षाने हा प्रयोग करून पाहिला आहे. उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यातील स्थिती वेगळी असली तरी येथे खिस्ती उमेदवार देऊन फायदा होतोच, असे नाही, हे सिद्ध झालेले आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात २ लाख ४० हजार खिस्ती, सुमारे ८५ हजार मुस्लीम व २ लाख ९० हजारच्या आसपास हिंदू मतदार असल्याची माहिती त्यांनी दिली. दक्षिण गोव्यात काँग्रेसची पारंपरिक मते आहेत. परंतु या पक्षाचा उमेदवार निवडणूक जिंकू शकणार नाही. कारण, समीकरणे बरीच बदलली आहेत. भाजपची ताकद दक्षिणेत वाढलेली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या ९,५०० मतांनी पराभव पत्करावा लागला तरी मी फिल्डवर माझे काम चालूच ठेवले आहे, असे सावईकर म्हणाले. २०१४च्या निवडणुकीत ३२ हजार मतांचे मताधिक्य आपण मिळवले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.

केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. विश्वकर्मा योजनेत राज्यात २२ हजार वेगवेगळ्या व्यावसायिकांची नोंदणी केली जाणार आहे. भाजप कोणत्याही योजनेत किंवा अन्य बाबतीत अल्पसंख्याकांबाबत कोणताही पक्षपात करत नाही, असे ते एका प्रश्नावर म्हणाले. करण्या साठी सावंत सरकार आटोकाट प्रयत्न करीत आहे. नऊ खाण ब्लॉक्सचा लिलावही झालेला आहे. खाणी लवकरच सुरू होतील, असा विश्वास सावईकर यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना व्यक्त केला.

तिकीटावर दावा केला नाही

माजी खासदार तथा एनआरआय आयुक्त असलेले अॅड. सावईकर यांना तुम्ही भाजपच्या तिकिटासाठी दावा करणार का?, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, २००९ साली मला तिकीट दिली तेव्हा मी उमेदवारीचा विचारही केला नव्हता. पर्रीकरांनी फोनवरून मला माहिती दिली तेव्हा मी कोर्टात होतो. मी त्यावेळी प्रॅक्टिस करायचो. अनपेक्षितपणे त्यावेळी मला पहिल्यांदा तिकीट मिळाले. परंतु त्यानंतर २०१४ मध्ये मी खासदार म्हणून निवडून आलो, भाजपचे रमाकांत आंगले व मी मिळून आम्ही दोघेजण दक्षिण गोव्यात याआधी भाजपचे खासदार झालेलो आहोत. आतादेखील मी तिकिटावर दावा करण्याचा किंवा ती मागण्याचा प्रश्न नाही. पक्ष जी जबाबदारी देईल, ती स्वीकारण्याची माझी तयारी आहे. १९९७ पासून २००७ पर्यंत मी पक्षाचा प्रदेश सरचिटणीस होतो. त्यानंतर २०१४ मध्ये खासदार झालो. एवढ्या वर्षांचे माझे काम आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईल, असे मला वाटते.

८,५०० खलाशांना सुखरूपपणे आणले

कोविड महामारीच्या काळात एनआरआयची खरी सत्त्वपरीक्षा ठरल्याचे सांगून सावईकर म्हणाले की, त्यावेळी आखातात अडकलेल्या सुमारे ८,५०० खलाशांना सुखरूपपणे गोव्यात आणण्याचे काम आयुक्तालयाने केले. रशिया-युक्रेन युद्धाच्यावेळी २१ गोवेकरांना सुखरूप परत आणले.

२३५ प्रकल्प आणले

२०१४ मध्ये निवडून आल्यानंतर खासदार निधीतून तसेच अन्य माध्यमांतून २३५ प्रकल्प आपण आणल्याचे सावईकर यांनी सांगितले. मडगाव रेल्वे स्थानकात सौरऊर्जा प्रकल्प आणला. या प्रकल्पामुळे उत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा पुरस्कार अलीकडेच देण्यात आला. मतदारसंघात अनेक मैदाने बांधली. खोला, काणकोण गाव दत्तक घेऊन तेथे घरांना वीज दिली. सर्वच कामे खासदार निधीतून होतात, असे नाही. जुवारी कंपनीकडून सीएसआरखाली मदत घेऊन बार्से येथे ४० ते ४५ घरांना पिण्याचे पाणी दिले, असे ते म्हणाले.

या प्रकल्पांची गरज

रेल्वे दुपदरीकरणासाठी आता विशेष विरोध राहिलेला नाही. बाणावलीत काम सुरू झालेले आहे. काही विघ्नसंतोषी मंडळी आंदोलने वगैरे उभारतात. परंतु लोकांना आता कळून चुकले आहे, असे सावईकर म्हणाले, तामनार वीज प्रकल्प ही गोव्याची गरज आहे. कोणत्याही प्रकल्पाच्याआधारावर केलेले राजकारण फार काळ टिकत नाही, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणLokmatलोकमत