संध्या डोंगरे यांचे पुस्तक एम.ई.एस. कॉलेजला लोकार्पण
By Admin | Updated: May 5, 2014 19:27 IST2014-05-05T11:33:50+5:302014-05-05T19:27:13+5:30
झुवारीनगर येथील एम.ई.एस. कॉलेजमधील प्राध्यापिका डॉ. संध्या भांडारे व सिकैरा यांनी आपल्या प्रबंधासाठी लिहिलेले कॅनेडियन लेखक जेम्स रियाने आणि गोमंतकीय लेखक पुंडलिक नाईक यांच्या नाटकामधील तुलनात्मक अभ्यासावर लिहिलेल्या केनेडियन आणि कोकणी नाटके यांचा अभ्यास हे पुस्तक एका कार्यक्रमाद्वारे एम.ई. एस. कॉलेजला अर्पण केले.

संध्या डोंगरे यांचे पुस्तक एम.ई.एस. कॉलेजला लोकार्पण
वास्को : झुवारीनगर येथील एम.ई.एस. कॉलेजमधील प्राध्यापिका डॉ. संध्या भांडारे व सिकैरा यांनी आपल्या प्रबंधासाठी लिहिलेले कॅनेडियन लेखक जेम्स रियाने आणि गोमंतकीय लेखक पुंडलिक नाईक यांच्या नाटकामधील तुलनात्मक अभ्यासावर लिहिलेल्या केनेडियन आणि कोकणी नाटके यांचा अभ्यास हे पुस्तक एका कार्यक्रमाद्वारे एम.ई. एस. कॉलेजला अर्पण केले.
झुवारीनगर येथील एम.ई.एस. कॉलेजच्या बीबीए सभागृहात झालेल्या या समारंभात एम.ई.एस. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य माधवराव कामत यांच्या हस्ते तसेच संशोधन मार्गदर्शक डॉ. एफ.ए. फेर्नांडीस आणि गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष तथा नाट्य लेखक पुंडलिक नाईक यांच्या उपस्थितीत हे पुस्तक अर्पण करण्यात आले.
यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असलेले संशोधन मार्गदर्शक डॉ. एफ.ए. फेर्नांडीस यांनी केलेल्या आपल्या भाषणात वा प्रबंधामागील उत्पत्तीच्या कथेला उजाळा देत डॉ. संध्या भांडारे सिकैरा यांना आपल्या मातृभाषेबद्दल योगदान देण्याची इच्छा होती आणि म्हणूनच संशोधनासाठी त्यांनी साहित्यिक तुलनेची निवड केली. गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष पुंडलिक नाईक यांनी अशा प्रकारे लेखन करून प्रत्येक लेखकाला आपल्या लेखनाचे मुल्यमापन करता येते, आले नविन विचार मोडता येतात तसेच आपल्या कृती कौशल्याचे फायदे आणि तोटे यांचे मुल्यमापन करता येते असे सांगून आमच्यावर ब्रिटिश, पोर्तुगीज यांच्यावर सत्ता गाजविली, पण गेली साडेचारशे वर्षे शेक्सपीअर यांनी आपल्या हृदयाला केलेला स्पर्श कुणालाही काढून घेणे शक्य झाले नाही. शेक्सपीअर यांच्याकडे भाषेचे प्रभुत्व होते आणि माणसाच्या स्वभावाची दूरदृष्टी होती. त्यामुळे त्यांचे प्रत्येक नाटक जगातील कोणत्याही भागात प्रत्येक दिवशी उभे राहते.
या पुस्तकाचे प्रस्तावना लेखक तसेच समारंभाचे अध्यक्ष प्रा. माधवराव कामत यांनी भाषणात जगामध्ये प्रत्येक राष्ट्रामध्ये असलेल्या विभाजनाच्या दरी कोसळत असल्यातरी १९९० मध्ये सुरू झालेले जागतिकीकरण मात्र सांस्कृतिक मिलाफापर्यंत वाढत चाललेले आहे. भारतातील सर्व भाषांमधील साहित्य इंग्रजी आणि साहित्याचे भारतीय भाषामध्ये रूपांतर होण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉ. संध्या भांडारे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. हरिंद्र नागवेकर, प्रो. एडवर्ड डिलिमा, डॉ. बिपीन साळकर, रेषा साळकर, डॉ. नरहरे जाम्बशी, उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या मेबिता क्वाद्रुश, डॉ. चं. लेखा डिसुझा आदी उपस्थित होते.
फोटो : प्रा. डॉ. संध्या भांडारे सिकैरा यांचे पुस्तक एमई कॉलेजला लोकार्पण करताना प्रा. माधवराव कामत, डॉ. ए.एफ. फेर्नांडीस, कोकणी अकादमीचे अध्यक्ष पुंडलिक नाईक व उप प्राचार्य वसंत सैल. (छाया : अनिल चोडणकर)