शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

गोव्यातील साईभक्त पदयात्रेतून शिर्डीकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 14:03 IST

वयाची 75 वर्षे गाठलेल्या जेष्ठ नागरिकांपासून ते 20 वर्षीय युवकापर्यंतचे 70 साईभक्त बुधवारी (6 फेब्रुवारी) शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी गोव्यातून पदयात्रेद्वारे निघाले आहेत.

म्हापसा : वयाची 75 वर्षे गाठलेल्या जेष्ठ नागरिकांपासून ते 20 वर्षीय युवकापर्यंतचे 70 साईभक्त बुधवारी (6 फेब्रुवारी) शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी गोव्यातून पदयात्रेद्वारे निघाले आहेत. साई भक्त परिवारातर्फे सुरू करण्यात आलेल्या या पहिल्या आणि दीर्घ पल्ल्याच्या दुस-या पदयात्रेला म्हापसा शहरातील टॅक्सी स्थानकावर असलेल्या साई मंदिरापासून सुरुवात झाली. ही पदयात्रा शिर्डीपर्यंतचा 550 किलोमीटरचा प्रवास 15 दिवसांत पूर्ण करुन शिर्डीमध्ये पोहोचणार आहे. या पदयात्रेची सांगता 20 फेब्रुवारीला शिर्डीमध्ये दाखल झाल्यानंतर केली जाणार आहे.  

टॅक्सी स्थानकावर साईंच्या आरती आणि जयजयकार केल्यानंतर यात्रेला शुभारंभ म्हापसा पालिकेतील नगरसेवक आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. 15 दिवसांच्या या प्रवासात दरदिवशी सरासरी 40 ते 50 किलोमीटर तर शेवटच्या दिवशी 15 ते 20 किलोमीटर यात्रा केली जाणार असल्याची माहिती संस्थापक प्रशांत वेर्लेकर यांनी दिली. ही पदयात्रा धारगळ मार्गे बांदा, आंबोली, गडहिंग्लज, चिकोडी-तासगाव, विटा, बारामती, दौंड-नगर ते शिर्डी असा प्रवास करणार आहे. शेवटच्या दिवशी पदयात्रा दिंडी तसेच गजराने साई मंदिरात प्रवेश करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. 

संस्थेने आयोजित केलेली ही यंदाची सहावी पदयात्रा आहे. 2013 साली सुरू झालेल्या या पदयात्रेत त्यावेळी सहभागी साईभक्तांची संख्या ७ होती. आता ही संख्या सत्तरच्या घरात गेली आहे. गेल्या वर्षी सुमारे ३५ भक्त सहभागी झाले होते. काही भक्तगण वाटेत सुद्धा यात्रेत सहभागी होत असतात. त्यात गोव्यातील विविध भागातून आलेल्या साईभक्तांसोबत महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील भक्तांचा सुद्धा समावेश असल्याचे ते म्हणाले. 

पूर्वी ही यात्रा सर्वात जास्त किलोमीटर अंतर पार करुन शिर्डीत जाणारी यात्रा होती; पण आता दिल्लीतून सुद्धा शिर्डीपर्यंत एक पदयात्रा येत असल्याने ही दुसरी लांब पल्ल्याची यात्रा असल्याची माहिती निलेश वेर्णेकर यांनी दिली. मात्र साईभक्त परिवार ही शिर्डीत यात्रा सुरू करणारी पहिली संस्था असल्याचा दावा यावेळी वेर्णेकर यांच्या वतीने करण्यात आला. यात्रेत पढंरीची वारी करणारे वारकरी सुद्धा समावेश होतात असेही यावेळी सांगितले. 

यात्रा दरम्यान प्रत्येक ठिकाणी चांगले स्वागत तसेच केले जाते. ज्या गावात रात्रीचे वास्तव्य केले जाते त्या गावातील लोकांकडून चांगले सहकार्य सुद्धा केले जाते. काही भक्तांकडून महाप्रसाद तसेच इतर कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. काही गावात तर गोव्यात सुद्धा वारकरी असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात असल्याचे वेर्णेकर यांनी माहिती देऊन सांगितले. 

टॅग्स :shirdiशिर्डीgoaगोवा