शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बार्देशमधील गढूळ पाण्याचा प्रश्न 48 तासांत सोडवा - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 19:23 IST

बार्देस तालुक्यात महिन्याभरापासून असलेला पाणी टंचाई तसेच गढूळ पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे.

ठळक मुद्दे बार्देस तालुक्यात महिन्याभरापासून असलेला पाणी टंचाई तसेच गढूळ पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे.म्हापशासह बार्देसवासियांना महिन्याभरापासून गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे.गढूळ पाणी चाळीसही आमदारांना प्यायला देणार, असा इशारा उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीने दिला.

म्हापसा - बार्देस तालुक्यात महिन्याभरापासून असलेला पाणी टंचाई तसेच गढूळ पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खाते व जलस्त्रोत खात्याकडे वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाला अद्याप ठोस तोडगा काढता आलेला नाही. त्यामुळे हा विषय येत्या 48 तासांत न सोडविल्यास विधानसभेवर मोर्चा काढू. तसेच हे गढूळ पाणी चाळीसही आमदारांना प्यायला देणार, असा इशारा उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीने दिला आहे. दरम्यान, सर्व समविचारी लोकांनी एकत्रित येऊन या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

सोमवारी (22 जुलै) म्हापशातील कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विजय भिके, आत्माराम पणजीकर, सुदीन नाईक, शंकर फडते, प्रिया राटवड व इतर सदस्य उपस्थित होते.गोवेकरांना मुलभूत सुविधा देण्यास भारतीय जनता पक्षाला पूर्णत: अपयश आले आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही लोकांना स्वच्छ पाणीपुरवठा करता येत नाही. गेल्या गणेश चतुर्थीपासून हा पाण्याचा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. याबाबत अनेकदा तक्रार केल्यानंतरही संबंधित अभियंते व लोकप्रतिनिधी केवळ थातुरमातुर उत्तरे देऊन हा विषय सोडून देतात, असा आरोप यावेळी विजय भिके यांनी केला आहे. 

म्हापशासह बार्देसवासियांना महिन्याभरापासून गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. तर काहींना पाणी पुरवठाच होत नाही. झालाच तर दिवसाला तासभर पाणी येते व त्यातही वेळेचे निर्बंध असते. त्यामुळे लोकांना कामधंदे सोडून पाणी येण्याची वाट पाहावी लागते, असेही भिके म्हणाले आहेत. पाणी, रस्ता व वीज या सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजा असतात. मात्र, सरकारला ते उपलब्ध करून देता आलेले नाही. सरकारी यंत्रणा पूर्णत: कोलमडून पडल्याचा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. एकीकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे भाजपा गोरगरीबांचे सरकार असल्याचे मोठ्या वलगणा करतात. मात्र, प्रत्यक्षात यातून सरकारची अकार्यक्षमता दिसते, अशी टीका त्यांनी केली आहे. 

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणीcongressकाँग्रेस