शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बार्देशमधील गढूळ पाण्याचा प्रश्न 48 तासांत सोडवा - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 19:23 IST

बार्देस तालुक्यात महिन्याभरापासून असलेला पाणी टंचाई तसेच गढूळ पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे.

ठळक मुद्दे बार्देस तालुक्यात महिन्याभरापासून असलेला पाणी टंचाई तसेच गढूळ पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे.म्हापशासह बार्देसवासियांना महिन्याभरापासून गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे.गढूळ पाणी चाळीसही आमदारांना प्यायला देणार, असा इशारा उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीने दिला.

म्हापसा - बार्देस तालुक्यात महिन्याभरापासून असलेला पाणी टंचाई तसेच गढूळ पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खाते व जलस्त्रोत खात्याकडे वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाला अद्याप ठोस तोडगा काढता आलेला नाही. त्यामुळे हा विषय येत्या 48 तासांत न सोडविल्यास विधानसभेवर मोर्चा काढू. तसेच हे गढूळ पाणी चाळीसही आमदारांना प्यायला देणार, असा इशारा उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीने दिला आहे. दरम्यान, सर्व समविचारी लोकांनी एकत्रित येऊन या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

सोमवारी (22 जुलै) म्हापशातील कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विजय भिके, आत्माराम पणजीकर, सुदीन नाईक, शंकर फडते, प्रिया राटवड व इतर सदस्य उपस्थित होते.गोवेकरांना मुलभूत सुविधा देण्यास भारतीय जनता पक्षाला पूर्णत: अपयश आले आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही लोकांना स्वच्छ पाणीपुरवठा करता येत नाही. गेल्या गणेश चतुर्थीपासून हा पाण्याचा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. याबाबत अनेकदा तक्रार केल्यानंतरही संबंधित अभियंते व लोकप्रतिनिधी केवळ थातुरमातुर उत्तरे देऊन हा विषय सोडून देतात, असा आरोप यावेळी विजय भिके यांनी केला आहे. 

म्हापशासह बार्देसवासियांना महिन्याभरापासून गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. तर काहींना पाणी पुरवठाच होत नाही. झालाच तर दिवसाला तासभर पाणी येते व त्यातही वेळेचे निर्बंध असते. त्यामुळे लोकांना कामधंदे सोडून पाणी येण्याची वाट पाहावी लागते, असेही भिके म्हणाले आहेत. पाणी, रस्ता व वीज या सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजा असतात. मात्र, सरकारला ते उपलब्ध करून देता आलेले नाही. सरकारी यंत्रणा पूर्णत: कोलमडून पडल्याचा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. एकीकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे भाजपा गोरगरीबांचे सरकार असल्याचे मोठ्या वलगणा करतात. मात्र, प्रत्यक्षात यातून सरकारची अकार्यक्षमता दिसते, अशी टीका त्यांनी केली आहे. 

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणीcongressकाँग्रेस