शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

बार्देशमधील गढूळ पाण्याचा प्रश्न 48 तासांत सोडवा - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 19:23 IST

बार्देस तालुक्यात महिन्याभरापासून असलेला पाणी टंचाई तसेच गढूळ पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे.

ठळक मुद्दे बार्देस तालुक्यात महिन्याभरापासून असलेला पाणी टंचाई तसेच गढूळ पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे.म्हापशासह बार्देसवासियांना महिन्याभरापासून गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे.गढूळ पाणी चाळीसही आमदारांना प्यायला देणार, असा इशारा उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीने दिला.

म्हापसा - बार्देस तालुक्यात महिन्याभरापासून असलेला पाणी टंचाई तसेच गढूळ पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खाते व जलस्त्रोत खात्याकडे वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाला अद्याप ठोस तोडगा काढता आलेला नाही. त्यामुळे हा विषय येत्या 48 तासांत न सोडविल्यास विधानसभेवर मोर्चा काढू. तसेच हे गढूळ पाणी चाळीसही आमदारांना प्यायला देणार, असा इशारा उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीने दिला आहे. दरम्यान, सर्व समविचारी लोकांनी एकत्रित येऊन या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

सोमवारी (22 जुलै) म्हापशातील कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विजय भिके, आत्माराम पणजीकर, सुदीन नाईक, शंकर फडते, प्रिया राटवड व इतर सदस्य उपस्थित होते.गोवेकरांना मुलभूत सुविधा देण्यास भारतीय जनता पक्षाला पूर्णत: अपयश आले आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही लोकांना स्वच्छ पाणीपुरवठा करता येत नाही. गेल्या गणेश चतुर्थीपासून हा पाण्याचा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. याबाबत अनेकदा तक्रार केल्यानंतरही संबंधित अभियंते व लोकप्रतिनिधी केवळ थातुरमातुर उत्तरे देऊन हा विषय सोडून देतात, असा आरोप यावेळी विजय भिके यांनी केला आहे. 

म्हापशासह बार्देसवासियांना महिन्याभरापासून गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. तर काहींना पाणी पुरवठाच होत नाही. झालाच तर दिवसाला तासभर पाणी येते व त्यातही वेळेचे निर्बंध असते. त्यामुळे लोकांना कामधंदे सोडून पाणी येण्याची वाट पाहावी लागते, असेही भिके म्हणाले आहेत. पाणी, रस्ता व वीज या सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजा असतात. मात्र, सरकारला ते उपलब्ध करून देता आलेले नाही. सरकारी यंत्रणा पूर्णत: कोलमडून पडल्याचा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. एकीकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे भाजपा गोरगरीबांचे सरकार असल्याचे मोठ्या वलगणा करतात. मात्र, प्रत्यक्षात यातून सरकारची अकार्यक्षमता दिसते, अशी टीका त्यांनी केली आहे. 

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणीcongressकाँग्रेस