शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

रमेश तवडकर पूर्वीच्या गोष्टी बोलत असावेत; आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलाय: दामू नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 07:31 IST

दामू पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांमध्ये गेल्यानंतर जवळीक वाढते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपमध्ये मिक्स भाजी व खतखतें झालेय, हे सभापती रमेश तवडकर यांनी केलेले विधान आता लागू होत नाही. ते पूर्वीच्या गोष्टी बोलत असावेत, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

सभापती तवडकर यांच्या विधानाबद्दल विचारले असता दामू नाईक म्हणाले की, मधल्या काळात काही गोष्टी वर खाली झाल्या असतीलही. परंतु आता तसे काही नाही. उलट कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला आहे. जुने कार्यकर्ते मला भेटतात. माझ्याशी संपर्क साधतात. मी लोकांमध्ये जायला मिळावे म्हणून अधिकाधिक कार्यक्रम घेत असतो. मी घरी अभावानेच असतो. जास्त वेळ फिरण्यातच जातो. मात्र, कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांच्या मनात नवे-जुने असे काहीच दिसून येत नाही. पक्षासाठी मोठ्या उत्साहाने एकत्रपणे काम करताना दिसतात, असेही प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी सांगितले.

दामू पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांमध्ये गेल्यानंतर जवळीक वाढते. नवीन लोकांना पक्षाकडे कसे आकर्षित करता येईल याला माझे प्राधान्य आहे. कधीकाळी आम्ही कुठेतरी चुकलोही असू किंवा कमी पडलो असू, परंतु आता तसे काही नाही. सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे व जुन्या कार्यकर्त्यांना मी भेटतच आहे." मंत्रिमंडळ फेररचनेबाबत दामू नाईक म्हणाले की, तो विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतो. पक्षाचे स्थानिक नेते, मुख्यमंत्री तसेच केंद्रीय नेते एकत्र येऊनच काय तो निर्णय होणार आहे. तूर्त बदलाच्या हालचाली वगैरे असे काहीही नसल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा