शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

राज्यात पावसाचा हाहाकार; डिचोलीत पूर, रस्ते पाण्याखाली, लोकांच्या घरात शिरले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 16:15 IST

डिचाेलीत नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बाजार परिसरात पूर आला. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला त्यामुळे गुरुवारी सकाळी राज्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने काही भागात गावांकडील संपर्क तुटला आहे.

 पणजी : मुसळधार पावसामुळे राज्यात ठीक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडल्या तर घरांमध्ये पाणी शिरुन पडझड झाली. शाळेत गेलेेले विद्यार्थी अडकून पडल्याने शिक्षण संचालकांनी पालकांनी शाळेत येऊन मुलांना सुरक्षित घरी नेण्याचे आवाहन केले. राज्य हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केला आहे.

डिचाेलीत नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बाजार परिसरात पूर आला. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला त्यामुळे गुरुवारी सकाळी राज्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने काही भागात गावांकडील संपर्क तुटला आहे.राज्यात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला गुरुवारी सकाळी राज्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडल्या तर घरांमध्ये पुराचे पाणी शिरुन पडझड झाली. शाळेत गेलेेले विद्यार्थी अडकून पडल्याने शिक्षण संचालकांनी पालकांनी शाळेत येऊन मुलांना सुरक्षित घरी नेण्याचे आवाहन केले. राज्य हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केला. तसेच मुसळधार पावसाने निर्माण हाेणाऱ्या आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी ०८३२ -२४१९५५० / ०८३२ -२२२५३८३ / ०८३२ -२७९४१०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने सर्व राज्याला फटका बसला आहे. नानोडा डिचाेली येथे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेलेली कदंब बस पाण्यात अडकून बंद पडली. डिचाेलीत नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बाजार परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. वाळवंटी नदीला पूर आल्याने केरीतील पूल पाण्याखाली गेला. तसेच म्हादईची पातळी वाढल्याने गांजे उसगाव रस्ता पाण्याखाली गेला. दूधसागर नदीची पातळी वाढल्याने निरंकाल तसेच अन्य गावात पाणी भरले. तसेच सावर्शे सत्तरीत नदीचे पाणी वाढल्याने वाळपई फोंडा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होतो.तसेच पेडणे परिसरात कळणे नदीला पूर आल्याने चांदेलमधील रस्ता पाण्याखाली गेला कासारवर्णेत पुरस्थिती निर्माण झाली. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच साळ येथील भुमिका मंदिर परिसरात पाणी साचल्याने. नागधर पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गावर जाेडणारा रस्ता पाण्याखाली गेला. मोपातील कडशी नदीला पूर आल्याने दोन पुल पाण्याखाली गेले यामुळे गावांचा संपर्क तुटला. तिळारीचा धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला आहे. तिळारी नदी धोक्याची पातळी ओलांडणार असल्याने सतर्क राहण्याचा इशारा दिला. तसेच राजधानी पणजीत पावसाने अनेक रस्ते पाण्याखाली गेले.२४ तासांत ५.३३ इंच पाऊसराज्यात गेल्या २४ तासांत ५.३३ इंच पाऊस झाला यात केपेमध्ये सर्वाधिक जास्त ७.८७ इंच पाऊस झाला आहे. आतापर्यत वाळपईत सर्वात जास्त म्हणजे १५१.५१ इंच पाऊस झाला आहे. राज्यात १ जून ते १ ऑगस्ट या दोन महिन्यात आतापर्यंत १२१.७ इंच पाऊस झाला आहे. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर