शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पावसाचा हाहाकार; डिचोलीत पूर, रस्ते पाण्याखाली, लोकांच्या घरात शिरले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 16:15 IST

डिचाेलीत नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बाजार परिसरात पूर आला. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला त्यामुळे गुरुवारी सकाळी राज्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने काही भागात गावांकडील संपर्क तुटला आहे.

 पणजी : मुसळधार पावसामुळे राज्यात ठीक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडल्या तर घरांमध्ये पाणी शिरुन पडझड झाली. शाळेत गेलेेले विद्यार्थी अडकून पडल्याने शिक्षण संचालकांनी पालकांनी शाळेत येऊन मुलांना सुरक्षित घरी नेण्याचे आवाहन केले. राज्य हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केला आहे.

डिचाेलीत नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बाजार परिसरात पूर आला. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला त्यामुळे गुरुवारी सकाळी राज्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने काही भागात गावांकडील संपर्क तुटला आहे.राज्यात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला गुरुवारी सकाळी राज्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडल्या तर घरांमध्ये पुराचे पाणी शिरुन पडझड झाली. शाळेत गेलेेले विद्यार्थी अडकून पडल्याने शिक्षण संचालकांनी पालकांनी शाळेत येऊन मुलांना सुरक्षित घरी नेण्याचे आवाहन केले. राज्य हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केला. तसेच मुसळधार पावसाने निर्माण हाेणाऱ्या आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी ०८३२ -२४१९५५० / ०८३२ -२२२५३८३ / ०८३२ -२७९४१०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने सर्व राज्याला फटका बसला आहे. नानोडा डिचाेली येथे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेलेली कदंब बस पाण्यात अडकून बंद पडली. डिचाेलीत नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बाजार परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. वाळवंटी नदीला पूर आल्याने केरीतील पूल पाण्याखाली गेला. तसेच म्हादईची पातळी वाढल्याने गांजे उसगाव रस्ता पाण्याखाली गेला. दूधसागर नदीची पातळी वाढल्याने निरंकाल तसेच अन्य गावात पाणी भरले. तसेच सावर्शे सत्तरीत नदीचे पाणी वाढल्याने वाळपई फोंडा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होतो.तसेच पेडणे परिसरात कळणे नदीला पूर आल्याने चांदेलमधील रस्ता पाण्याखाली गेला कासारवर्णेत पुरस्थिती निर्माण झाली. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच साळ येथील भुमिका मंदिर परिसरात पाणी साचल्याने. नागधर पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गावर जाेडणारा रस्ता पाण्याखाली गेला. मोपातील कडशी नदीला पूर आल्याने दोन पुल पाण्याखाली गेले यामुळे गावांचा संपर्क तुटला. तिळारीचा धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला आहे. तिळारी नदी धोक्याची पातळी ओलांडणार असल्याने सतर्क राहण्याचा इशारा दिला. तसेच राजधानी पणजीत पावसाने अनेक रस्ते पाण्याखाली गेले.२४ तासांत ५.३३ इंच पाऊसराज्यात गेल्या २४ तासांत ५.३३ इंच पाऊस झाला यात केपेमध्ये सर्वाधिक जास्त ७.८७ इंच पाऊस झाला आहे. आतापर्यत वाळपईत सर्वात जास्त म्हणजे १५१.५१ इंच पाऊस झाला आहे. राज्यात १ जून ते १ ऑगस्ट या दोन महिन्यात आतापर्यंत १२१.७ इंच पाऊस झाला आहे. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर