शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

राज्यात पावसाचा हाहाकार; डिचोलीत पूर, रस्ते पाण्याखाली, लोकांच्या घरात शिरले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 16:15 IST

डिचाेलीत नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बाजार परिसरात पूर आला. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला त्यामुळे गुरुवारी सकाळी राज्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने काही भागात गावांकडील संपर्क तुटला आहे.

 पणजी : मुसळधार पावसामुळे राज्यात ठीक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडल्या तर घरांमध्ये पाणी शिरुन पडझड झाली. शाळेत गेलेेले विद्यार्थी अडकून पडल्याने शिक्षण संचालकांनी पालकांनी शाळेत येऊन मुलांना सुरक्षित घरी नेण्याचे आवाहन केले. राज्य हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केला आहे.

डिचाेलीत नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बाजार परिसरात पूर आला. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला त्यामुळे गुरुवारी सकाळी राज्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने काही भागात गावांकडील संपर्क तुटला आहे.राज्यात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला गुरुवारी सकाळी राज्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडल्या तर घरांमध्ये पुराचे पाणी शिरुन पडझड झाली. शाळेत गेलेेले विद्यार्थी अडकून पडल्याने शिक्षण संचालकांनी पालकांनी शाळेत येऊन मुलांना सुरक्षित घरी नेण्याचे आवाहन केले. राज्य हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केला. तसेच मुसळधार पावसाने निर्माण हाेणाऱ्या आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी ०८३२ -२४१९५५० / ०८३२ -२२२५३८३ / ०८३२ -२७९४१०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने सर्व राज्याला फटका बसला आहे. नानोडा डिचाेली येथे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेलेली कदंब बस पाण्यात अडकून बंद पडली. डिचाेलीत नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बाजार परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. वाळवंटी नदीला पूर आल्याने केरीतील पूल पाण्याखाली गेला. तसेच म्हादईची पातळी वाढल्याने गांजे उसगाव रस्ता पाण्याखाली गेला. दूधसागर नदीची पातळी वाढल्याने निरंकाल तसेच अन्य गावात पाणी भरले. तसेच सावर्शे सत्तरीत नदीचे पाणी वाढल्याने वाळपई फोंडा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होतो.तसेच पेडणे परिसरात कळणे नदीला पूर आल्याने चांदेलमधील रस्ता पाण्याखाली गेला कासारवर्णेत पुरस्थिती निर्माण झाली. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच साळ येथील भुमिका मंदिर परिसरात पाणी साचल्याने. नागधर पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गावर जाेडणारा रस्ता पाण्याखाली गेला. मोपातील कडशी नदीला पूर आल्याने दोन पुल पाण्याखाली गेले यामुळे गावांचा संपर्क तुटला. तिळारीचा धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला आहे. तिळारी नदी धोक्याची पातळी ओलांडणार असल्याने सतर्क राहण्याचा इशारा दिला. तसेच राजधानी पणजीत पावसाने अनेक रस्ते पाण्याखाली गेले.२४ तासांत ५.३३ इंच पाऊसराज्यात गेल्या २४ तासांत ५.३३ इंच पाऊस झाला यात केपेमध्ये सर्वाधिक जास्त ७.८७ इंच पाऊस झाला आहे. आतापर्यत वाळपईत सर्वात जास्त म्हणजे १५१.५१ इंच पाऊस झाला आहे. राज्यात १ जून ते १ ऑगस्ट या दोन महिन्यात आतापर्यंत १२१.७ इंच पाऊस झाला आहे. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर