शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Terror Attack : काश्मिरमधील हल्ल्याचा गोव्यात निषेध, संतप्त भावना व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 13:24 IST

पाकिस्तानला अद्दल घडवा, दहशतवाद खत्म करा अशा प्रकारचे संदेश गोमंतकीयांकडून सोशल मीडियावर खूप मोठ्या संख्येने पोस्ट केले जात आहेत.

ठळक मुद्देपाकिस्तानला अद्दल घडवा, दहशतवाद खत्म करा अशा प्रकारचे संदेश गोमंतकीयांकडून सोशल मीडियावर खूप मोठ्या संख्येने पोस्ट केले जात आहेत. दहशतवाद्यांना कुणीच पाठींबा देऊ नये, पाकला कठोर प्रत्युत्तर द्यावे अशा प्रकारची मागणी करणारे पोस्ट गोमंतकीय नागरिकांकडून फेसबुक, ट्वीटरवर टाकले जात आहेत. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनीही हल्ल्याचा निषेध करून आपल्या भावना ट्वीटरवरून व्यक्त केल्या आहेत.

पणजी : काश्मिरमधील पुलवामामध्ये गुरुवारी (14 फेब्रुवारी) झालेल्या भारतीय जवानांवरील हल्ल्याविरुद्ध गोव्यातही अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व सामाजिक संस्था आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत. गोव्यात निषेधाचे कार्यक्रमही सुरू झाले आहेत.

पाकिस्तानला अद्दल घडवा, दहशतवाद खत्म करा अशा प्रकारचे संदेश गोमंतकीयांकडून सोशल मीडियावर खूप मोठ्या संख्येने पोस्ट केले जात आहेत. दहशतवाद्यांना कुणीच पाठींबा देऊ नये, पाकला कठोर प्रत्युत्तर द्यावे अशा प्रकारची मागणी करणारे पोस्ट गोमंतकीय नागरिकांकडून फेसबुक, ट्वीटरवर टाकले जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवरही हल्ल्याच्या निषेधाचेच संदेश फिरविले जात आहेत.

गोव्यातील काही उद्योजक, काही वकील, सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्ते यांनी लोकमतशी बोलतानाही हल्ल्याचा निषेध केला व पाकविरुद्ध कारवाई करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केले. ज्या सैनिकांचे बळी गेले, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी एकत्र येऊया अशी आवाहने गोमंतकीयांनी सोशल मीडियावरून करणे सुरू केले आहे. सत्तरी तालुक्यातील पत्रकार संघाने वाळपई शहीद स्तंभाकडे एकत्र येऊन आपण वीर जवानांना श्रद्धांजली वाहूया असे म्हटले आहे. 

दरम्यान, गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनीही हल्ल्याचा निषेध करून आपल्या भावना ट्वीटरवरून व्यक्त केल्या आहेत. सीआरपीएफ जवानांवरील हल्ला हा माणुसकीविरुद्धचा भ्याड हल्ला आहे. शांततेसाठी भारताने केलेला निर्धार म्हणजे कमकुवतपणा आहे असे कुणी समजू नये. भारत देश पूर्णपणे सीआरपीएफ, शहीद जवान आणि त्यांच्या कुटूंबियांच्या मागे ठामपणे उभा राहत असल्याचे पर्रीकर यांनी नमूद केले आहे.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरgoaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर