शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

Pulwama Terror Attack : काश्मिरमधील हल्ल्याचा गोव्यात निषेध, संतप्त भावना व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 13:24 IST

पाकिस्तानला अद्दल घडवा, दहशतवाद खत्म करा अशा प्रकारचे संदेश गोमंतकीयांकडून सोशल मीडियावर खूप मोठ्या संख्येने पोस्ट केले जात आहेत.

ठळक मुद्देपाकिस्तानला अद्दल घडवा, दहशतवाद खत्म करा अशा प्रकारचे संदेश गोमंतकीयांकडून सोशल मीडियावर खूप मोठ्या संख्येने पोस्ट केले जात आहेत. दहशतवाद्यांना कुणीच पाठींबा देऊ नये, पाकला कठोर प्रत्युत्तर द्यावे अशा प्रकारची मागणी करणारे पोस्ट गोमंतकीय नागरिकांकडून फेसबुक, ट्वीटरवर टाकले जात आहेत. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनीही हल्ल्याचा निषेध करून आपल्या भावना ट्वीटरवरून व्यक्त केल्या आहेत.

पणजी : काश्मिरमधील पुलवामामध्ये गुरुवारी (14 फेब्रुवारी) झालेल्या भारतीय जवानांवरील हल्ल्याविरुद्ध गोव्यातही अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व सामाजिक संस्था आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत. गोव्यात निषेधाचे कार्यक्रमही सुरू झाले आहेत.

पाकिस्तानला अद्दल घडवा, दहशतवाद खत्म करा अशा प्रकारचे संदेश गोमंतकीयांकडून सोशल मीडियावर खूप मोठ्या संख्येने पोस्ट केले जात आहेत. दहशतवाद्यांना कुणीच पाठींबा देऊ नये, पाकला कठोर प्रत्युत्तर द्यावे अशा प्रकारची मागणी करणारे पोस्ट गोमंतकीय नागरिकांकडून फेसबुक, ट्वीटरवर टाकले जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवरही हल्ल्याच्या निषेधाचेच संदेश फिरविले जात आहेत.

गोव्यातील काही उद्योजक, काही वकील, सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्ते यांनी लोकमतशी बोलतानाही हल्ल्याचा निषेध केला व पाकविरुद्ध कारवाई करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केले. ज्या सैनिकांचे बळी गेले, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी एकत्र येऊया अशी आवाहने गोमंतकीयांनी सोशल मीडियावरून करणे सुरू केले आहे. सत्तरी तालुक्यातील पत्रकार संघाने वाळपई शहीद स्तंभाकडे एकत्र येऊन आपण वीर जवानांना श्रद्धांजली वाहूया असे म्हटले आहे. 

दरम्यान, गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनीही हल्ल्याचा निषेध करून आपल्या भावना ट्वीटरवरून व्यक्त केल्या आहेत. सीआरपीएफ जवानांवरील हल्ला हा माणुसकीविरुद्धचा भ्याड हल्ला आहे. शांततेसाठी भारताने केलेला निर्धार म्हणजे कमकुवतपणा आहे असे कुणी समजू नये. भारत देश पूर्णपणे सीआरपीएफ, शहीद जवान आणि त्यांच्या कुटूंबियांच्या मागे ठामपणे उभा राहत असल्याचे पर्रीकर यांनी नमूद केले आहे.

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरgoaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर