शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

काँग्रेसच्या नाटकाचा निषेध, भाजपाची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 21:06 IST

गोवा सरकार स्थापन झाल्यानंतर 425 दिवसांनी गोव्यातील काँग्रेस पक्ष जागा झाला आहे व त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे..

पणजी : गोवा सरकार स्थापन झाल्यानंतर 425 दिवसांनी गोव्यातील काँग्रेस पक्ष जागा झाला आहे व त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसच्या या नाटकाचा आम्ही भाजपतर्फे निषेध करतो, असे सरचिटणीस व खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

आमदार ग्लेन तिकलो यांच्या उपस्थितीत सावईकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की गोव्यातील काँग्रेस पक्ष वैफल्यग्रस्त झाला आहे. सवंग प्रसिद्धीसाठी नाटके केली जात आहेत. काँग्रेसचे तेराच आमदार राज्यपालांकडे गेले होते. स्वत:च्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठीच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व काँग्रेस पक्ष ही नाटके करत आहे. लोक अशा प्रकारचा अभिनय स्वीकारणार नाहीत.

सावईकर म्हणाले,की काँग्रेस पक्ष गोव्यातील र्पीकर सरकार बरखास्त करण्याची जगावेगळी मागणी करत आहे. सरकार चांगल्या प्रकारे चालले आहे. मुख्यमंत्री  मनोहर र्पीकर यांच्या आरोग्याच्या सद्यस्थितीबाबत सर्व लोकांना माहिती आहे. लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. ते लवकरच गोव्यात परततील. 

राज्यपालांना तुम्ही कोणता सल्ला द्याल असे पत्रकारांनी विचारले असता, राज्यपालांना आम्ही काहीच सांगणार नाही, काय निर्णय घ्यायचा तो राज्यपाल घेतील. देशभर भाजप विविध निवडणुका जिंकत आहे. याउलट काँग्रेस पक्ष पराभूत होत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे अपयश लपविण्यासाठीच गोव्यातील काँग्रेस पक्ष सध्या अकारण राज्यपालांकडे धाव घेण्याचे कृत्य करत आहे. कर्नाटकमधील जनतेने भाजपच्याच बाजूने कौल दिला व काँग्रेसची आमदार संख्या कमी केली आहे, असेही सावईकर म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याचा आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना दिला असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, न्यायालयीन आदेशाचा मान राखला जाईल, असे सावईकर म्हणाले. न्यायालयाचा आदेश ही भाजपसाठी नामुष्की नव्हे, असेही त्यांनी नमूद केले. 

काँग्रेसची सर्कस : सरदेसाई 

दरम्यान, गोवा फॉरवर्डचे मंत्री व अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही काँग्रेसच्या कृतीची खिल्ली उडवली आहे. बंगळुरूमध्ये पाऊस पडला म्हणून काही गोव्यात पाऊस पडणार नाही. कर्नाटकचे आमदार काही गोव्यात मतदान करू शकत नाहीत. त्यासाठी गोव्याचेच आमदार हवे असतात. गोव्यात काँग्रेसकडे सुरुवातीला जेवढे आमदार होते, तेवढेही आमदार आता राहिलेले नाहीत, अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकमधील सध्याच्या राजकारणाचा गोव्यातील राजकारणाशी काहीच संबंध नाही. गोव्यातील काँग्रेस आमदारांनी राज्यपालांकडे धाव घेणो ही काँग्रेसची पीआर सर्कस आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे. खरे म्हणजे काँग्रेसच्या कृतीविषयी भाष्य करावेसेही वाटत नाही, असे ते म्हणाले.