शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: मुख्यमंत्री हो, हाल थांबवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 08:35 IST

सरकारी यंत्रणा सुस्त झोपेत आहे की काय, असा प्रश्न पर्वरी, पणजी, बांबोळीत प्रवास करणाऱ्या लोकांना पडतो.

'रोज मरे, त्याला कोण रडे' अशी म्हण आहे. सध्या पणजी, पर्वरी, बांबोळी, मेरशी आदी भागातील प्रमुख रस्त्यांवरून वाहतूक करणाऱ्या हजारो वाहन चालकांच्या वाट्याला अशीच स्थिती आलेली आहे. रोज मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. गोव्याचे दुर्दैव असे की, वाहतूक पोलिसांचा वापर हा वाहतूक व्यवस्थापनासाठी होण्याऐवजी फक्त वाहनांना तालांव देण्यासाठीच केला जातो. रुग्णवाहिका, पर्यटकांची वाहने, परीक्षेला जाणारे विद्यार्थी वगैरे सगळेच वाहतूककोंडीत तीन-चार तास अडकतात; पण सरकारी यंत्रणा अजूनही प्रभावी उपाय काढू शकलेली नाही. कालची बांबोळी, पणजी व पर्वरीतील वाहतूककोंडी तर अतिच झाली. प्रवाशांचा जीव जाण्याची वेळ आली तेव्हा जिल्हाधिकारी व काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नावापुरती धावपळ केली. नावापुरते हे अधिकारी फिल्डवर दिसले.

सरकारी यंत्रणा सुस्त झोपेत आहे की काय, असा प्रश्न पर्वरी, पणजी, बांबोळीत प्रवास करणाऱ्या लोकांना पडतो. राजधानी पणजीच्या वाट्याला गेले तीन महिने अनंत भोग आलेले आहेत. अटल सेतूच्या बांधकामाने गोव्याला दगा दिला. हा पूल जन्माला आल्यापासून आजारी आहे. अधूनमधून वेन्टीलेटरवरही असतो. पूल दुरुस्तीनिमित्ताने वाहतुकीसाठी बंद ठेवला की हजारो वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. राजधानीचे शहर तर तीन महिने सगळीकडे फोडून ठेवले गेले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, कपड्यांची दुकाने, औषधालये या सर्वांचे ग्राहक अत्यंत कमी झाले आहेत. तीन महिने तेथील रस्ते खोदून ठेवल्याने ग्राहक येऊच शकत नाहीत. पणजीचे काही आजी-माजी नगरसेवक सांगतात की, आम्ही आमची हॉटेल्स व दुकाने बंदच ठेवली आहेत. सगळे काम एकदा पूर्ण झाल्यानंतरच मग व्यवसाय सुरू केले जातील.

वास्तविक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आता सगळी सरकारी यंत्रणा वापरून वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी उपाय काढायला हवा. कोंडीचा चक्रव्यूह भेदावाच लागेल. ज्या तिठ्यांवर किंवा बंद सिग्नलजवळ वाहतूककोंडी होते, तिथे दिवसभर वाहतूक पोलिस उपस्थित असावा. हे वाहतूक पोलिस मेरशी व अन्य ठिकाणी उभे राहून फक्त परप्रांतीय वाहने अडवून दंड ठोठवण्याचे काम करतात पणजीत सांता मोनिका जेट्टीजवळ दुचाक्या व पर्यटक वाहने अडविण्यासाठी चक्क आठ पोलिसांची फौज दिवसा उभी असते. ही फौज जर वाहतूक व्यवस्थापन नीट करण्यासाठी मोक्याच्या जागी वापरली गेली तर वाहन चालकांचे हाल कमी होतील. मुख्यमंत्री सावंत यांच्यासमोर अनेक लोकांनी वाहतूककोंडीची समस्या मांडलेली आहे. भाजपचे कार्यकर्तेदेखील सध्याच्या गैरसोयीबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. काही मंत्री व आमदारदेखील वाहतूककोंडीत अडकून पडत आहेत. तरीही सरकारी यंत्रणा जागी होत नाही याचे आश्चर्य वाटते. मुख्यमंत्री सावंत यांनी सगळे वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिसांचा वाहतूक विभाग आणि आरटीओ, बांधकाम खात्याचे अभियंते या सर्वांची एकत्र बैठक बोलवावी. सातत्याने बैठका घेऊन ज्या भागात दर दोन दिवसांनी कोंडी होते, तिथे तत्काळ उपाय काढावा. 

सध्या काही दिवस परप्रांतीय वाहने अडवूच नका, असे पोलिसांना सांगावे लागेल व हा सगळा पोलिस फौजफाटा सांतइनेज, कला अकादमी परिसर, बाल भवन परिसर, पाटो, पर्वरी, मेरशी, बांबोळी अशा ठिकाणी ठेवावा लागेल. पोलिसांना वाहतुकीचे नीट व्यवस्थापन करू द्या. कालदेखील सर्व अडचणींच्या ठिकाणांवरून पोलिस गायबच झाले होते. पोलिस काही पूर्णपणे कोंडी सोडवू शकणार नाहीत; कारण रस्ते फोडल्याने अरुंद झाले आहेत. पण, पोलिसांची उपस्थिती पाहून वाहन चालकांमध्ये थोडी तरी शिस्त येईल. चारचाक्या जात असताना मध्येच दुचाक्या घुसतात ते तरी बंद होईल. सध्याची कोंडी पाहून पर्यटकही गोव्यात यापुढे येणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांची यंत्रणा गोव्यात पूर्ण अपयशी ठरली आहे. पणजीतील लोकप्रतिनिधी अगोदरच आपले हात वर करून मोकळे झाले आहेत. फक्त मुख्यमंत्री व राज्यपालांचे वाहन यायचे असते तेव्हाच रस्त्यावर वाहतूक पोलिस वाहतुकीचे व्यवस्थापन करतात. अन्यथा, स्थिती राम भरोसे सोडून दिली जाते. काल विद्यार्थीही परीक्षेला वेळेत पोहोचले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले तर जनतेचे हाल कमी होतील.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत