महाविद्यालयीन प्रवेशाची समस्या आणखी बिकट
By Admin | Updated: June 26, 2015 01:46 IST2015-06-26T01:46:28+5:302015-06-26T01:46:38+5:30
पएटीकेटी परीक्षेनंतर ही संख्या १२०० पेक्षा वर जाण्याची शक्यता आहे.

महाविद्यालयीन प्रवेशाची समस्या आणखी बिकट
पएटीकेटी परीक्षेनंतर ही संख्या १२०० पेक्षा वर जाण्याची
शक्यता आहे.
राज्यात महाविणजी : महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे राज्यात ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य अध्याप अधांतरी राहिले आहे. द्यालयीन प्रवेशाची समस्या निर्माण झाली आहे. वाणिज्य व कला विभागात ही समस्या सर्वाधिक असून म्हापसा, पणजी, मडगाव, केपे या ठिकाणी अत्यंत बिकट परिस्थिती असून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. गोवा विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५०० हून अधिक आहे. मडगाव भागात अधिक विद्यार्थी प्रवेशाविना राहिले आहेत. काणकोण, पेडणे, डिचोली, वाळपई, सांगे या भागात प्रवेशाची समस्या नाही; परंतु उर्वरित भागात कमी अधिक प्रमाणात आहे.
उच्च शिक्षण विभागाचे संचालक भास्कर नायक यांनी प्रवेशाची समस्या झाली ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले. त्यासाठी साधनसुविधा असलेल्या काही महाविद्यालयांना नवीन वर्ग सुरू करण्यासाठी मंजुरीही देण्यात आली आहे; परंतु सर्वच महाविद्यालयांत अशा साधनसुविधा नसल्यामुळे वर्ग
मंजूर करण्यासाठीही मर्यादा पडत असल्याचे ते म्हणाले.
निर्णय पुरवणी परीक्षेनंतर!
राज्यात महाविद्यालयीन प्रवेशासंंबंधी समस्या निर्माण झाल्याची गोवा विद्यापीठाला कल्पना असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. पी. कामत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. एका वर्गात अतिरिक्त विद्यार्थी सामावून घेण्याचा अहवालही विद्यापीठाला सरकारकडून मिळाला आहे.
१९ जून रोजी विद्यापीठाच्या शैक्षणिक मंडळाने या प्रस्तावावर आणि प्रवेश समस्येवर चर्चा केली; परंतु बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर सुमारे ६०० विद्यार्थ्यांची त्यात भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेश समस्येचे पूर्ण चित्र स्पष्ट होईपर्यंत म्हणजे निकाल जाहीर होईपर्यंत वाट पाहून नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)