शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

२०२७ च्या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू: मुख्यमंत्री सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2024 09:44 IST

आमदारांना कामे करण्याचा दिला सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोवा विधानसभेची निवडणूक जरी २०२७ मध्ये होणार असली तरी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मात्र आतापासूनच कामाला लागले आहेत. शिवाय गोवा प्रदेश भाजपनेही निवडणुकीच्यादृष्टीने काम सुरू केले आहे. दरवेळी ४५ ते ५० टक्के आमदार निवडणुकीत पराभूत होतात, असा संदर्भ मुख्यमंत्री सावंत यांनी सर्व आमदारांना देऊन तुम्हाला पराभव पुढे टाळायचा असेल तर आताच कामाला लागा, असे बजावले आहे.

सोमवारी मुख्यमंत्र्यांनी सर्व सत्ताधारी आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीतील सगळी माहिती सोमवारी बाहेर आली नव्हती. मंगळवारी मात्र काही आमदारांनी 'लोकमत'ला सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री त्या बैठकीत अगदी स्पष्ट बोलले आहेत. दरवेळी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांपैकी ४५ ते ५० टक्के आमदार पराभूत होतात. २०२७ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळीही आताचे सगळे सत्ताधारी आमदार निवडून यायला हवेत असे आम्हाला वाटते. मात्र त्यासाठी आमदारांनी लोकांच्या कायम संपर्कात रहावे लागेल व लोकांची कामे सतत करावी लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत स्पष्ट केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे त्या बैठकीस उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना सांगितले की, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीनंतरही भाजपचेच सरकार अधिकारावर येईल. केंद्रात मोदी सरकार अधिकारावर असून भाजपच गोव्यात पुन्हा सरकार स्थापन करील त्याबाबत मला शंका नाही. पण तुम्ही सगळे आमच्यासोबत पुन्हा सत्तेत हवे आहात. त्यासाठी तुम्हाला लोकांची कामे करावी लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी आमदारांना सांगितले.

सीएम होण्याची स्वप्ने अन्य कोणी पाहू नयेत : कामत

काहीजण मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहात आहेत. पण ती स्वप्ने यशस्वी होणार नाहीत. २०२७ साली देखील प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली भाजप विधानसभा निवडणूक लढवणार आहे. पुन्हा २०२७ मध्ये सावंत हेच मुख्यमंत्री होतील, असे मडगावचे आमदार दिगंबर कामत काल मडगाव येथे झालेल्या भाजपच्या संमेलनात बोलताना म्हणाले. दिगंबर कामत यांनी असे विधान करून एकप्रकारे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांना टोमणा मारला, असे राजकीय विश्लेषकांकडून मानले जात आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या भाजपमधील एक-दोन नेत्यांनाही दिगंबर कामत यांनी अप्रत्यक्षरीत्या अशा विधानातून चिमटा काढला असे देखीलकाहीजणांना वाटते.

दिवस ठरवा, अधिकाऱ्यांसोबत मी बैठक घेतो

एखाद्या मतदारसंघातील सर्व विकास कामांबाबत मी सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यायची असेल तर मला सांगा. मी तुमच्यासाठी तशी बैठक घेईन. मांद्रे व डिचोली मतदारसंघातील आमदारांनी सुचविल्यानंतर तशी बैठक आपण घेतली. अन्य मतदारसंघांबाबतही तसाच उपक्रम करू, असे मुख्यमंत्र्यांनी आमदारांना सांगितले.

दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. आता पुन्हा जोमाने कामाला लागा. ज्या मतदारांनी भाजपाला मतदान केले त्यांचे आभार माना. ज्यांनी केले नाही, त्यांची मते जाणून घेऊन कामाला लागाला, २०२७ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप २७ पेक्षा जास्त जागा जिंकेल. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपा