शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

२०२७ च्या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू: मुख्यमंत्री सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2024 09:44 IST

आमदारांना कामे करण्याचा दिला सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोवा विधानसभेची निवडणूक जरी २०२७ मध्ये होणार असली तरी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मात्र आतापासूनच कामाला लागले आहेत. शिवाय गोवा प्रदेश भाजपनेही निवडणुकीच्यादृष्टीने काम सुरू केले आहे. दरवेळी ४५ ते ५० टक्के आमदार निवडणुकीत पराभूत होतात, असा संदर्भ मुख्यमंत्री सावंत यांनी सर्व आमदारांना देऊन तुम्हाला पराभव पुढे टाळायचा असेल तर आताच कामाला लागा, असे बजावले आहे.

सोमवारी मुख्यमंत्र्यांनी सर्व सत्ताधारी आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीतील सगळी माहिती सोमवारी बाहेर आली नव्हती. मंगळवारी मात्र काही आमदारांनी 'लोकमत'ला सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री त्या बैठकीत अगदी स्पष्ट बोलले आहेत. दरवेळी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांपैकी ४५ ते ५० टक्के आमदार पराभूत होतात. २०२७ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळीही आताचे सगळे सत्ताधारी आमदार निवडून यायला हवेत असे आम्हाला वाटते. मात्र त्यासाठी आमदारांनी लोकांच्या कायम संपर्कात रहावे लागेल व लोकांची कामे सतत करावी लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत स्पष्ट केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे त्या बैठकीस उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना सांगितले की, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीनंतरही भाजपचेच सरकार अधिकारावर येईल. केंद्रात मोदी सरकार अधिकारावर असून भाजपच गोव्यात पुन्हा सरकार स्थापन करील त्याबाबत मला शंका नाही. पण तुम्ही सगळे आमच्यासोबत पुन्हा सत्तेत हवे आहात. त्यासाठी तुम्हाला लोकांची कामे करावी लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी आमदारांना सांगितले.

सीएम होण्याची स्वप्ने अन्य कोणी पाहू नयेत : कामत

काहीजण मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहात आहेत. पण ती स्वप्ने यशस्वी होणार नाहीत. २०२७ साली देखील प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली भाजप विधानसभा निवडणूक लढवणार आहे. पुन्हा २०२७ मध्ये सावंत हेच मुख्यमंत्री होतील, असे मडगावचे आमदार दिगंबर कामत काल मडगाव येथे झालेल्या भाजपच्या संमेलनात बोलताना म्हणाले. दिगंबर कामत यांनी असे विधान करून एकप्रकारे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांना टोमणा मारला, असे राजकीय विश्लेषकांकडून मानले जात आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या भाजपमधील एक-दोन नेत्यांनाही दिगंबर कामत यांनी अप्रत्यक्षरीत्या अशा विधानातून चिमटा काढला असे देखीलकाहीजणांना वाटते.

दिवस ठरवा, अधिकाऱ्यांसोबत मी बैठक घेतो

एखाद्या मतदारसंघातील सर्व विकास कामांबाबत मी सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यायची असेल तर मला सांगा. मी तुमच्यासाठी तशी बैठक घेईन. मांद्रे व डिचोली मतदारसंघातील आमदारांनी सुचविल्यानंतर तशी बैठक आपण घेतली. अन्य मतदारसंघांबाबतही तसाच उपक्रम करू, असे मुख्यमंत्र्यांनी आमदारांना सांगितले.

दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. आता पुन्हा जोमाने कामाला लागा. ज्या मतदारांनी भाजपाला मतदान केले त्यांचे आभार माना. ज्यांनी केले नाही, त्यांची मते जाणून घेऊन कामाला लागाला, २०२७ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप २७ पेक्षा जास्त जागा जिंकेल. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपा