शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
3
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
4
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
6
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
7
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
8
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
9
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
10
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
12
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
13
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
14
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
15
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
16
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
17
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
18
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
19
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
20
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

म्हापसा अर्बनची निवडणूक स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 11:28 IST

कायम चर्चेत असलेल्या म्हापसा अर्बन या बहुराज्य बँकेच्या नव्या संचालक मंडळाची निवड करण्यासाठी २३ मार्च रोजी होणारी निवडणूक स्थगित करुन पुढे ढकलण्यात आली आहे.

ठळक मुद्देकायम चर्चेत असलेल्या म्हापसा अर्बन या बहुराज्य बँकेच्या नव्या संचालक मंडळाची निवड करण्यासाठी २३ मार्च रोजी होणारी निवडणूक स्थगित करुन पुढे ढकलण्यात आली आहे.होणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष गुरुदास नाटेकर यांनी दिली. नव्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी नवी तारीख निश्चित होईपर्यत बँकेचे मुंबईतील पीएमसी बँकेत विलीनीकरणावर सुरु असलेली चर्चा यशस्वी ठरण्याच्या मार्गावर आहे.

म्हापसा - कायम चर्चेत असलेल्या म्हापसा अर्बन या बहुराज्य बँकेच्या नव्या संचालक मंडळाची निवड करण्यासाठी २३ मार्च रोजी होणारी निवडणूक स्थगित करुन पुढे ढकलण्यात आली आहे. होणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष गुरुदास नाटेकर यांनी दिली. दरम्यान नव्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी नवी तारीख निश्चित होईपर्यत बँकेचे मुंबईतील पीएमसी बँकेत विलीनीकरणावर सुरु असलेली चर्चा यशस्वी ठरण्याच्या मार्गावर आहे. चर्चा यशस्वी ठरल्यास बँकेचे पीएमसी बँक (पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक मर्यादित) या बहुराज्य शेड्युल्ड  बँकेत विलीनीकरणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पीएमसी बँकेने विलीनीकरणावर तशी तयारी दर्शविल्याची माहिती नाटेकर यांनी दिली. 

२४ जुलै २०१५ रोजी म्हापसा अर्बनवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केल्यानंतर बँकेचे दैनंदिन कामकाज हाताळणे कठीण जात असल्याचे कारण देत अध्यक्षांसहित सर्व संचालक मंडळाने आपल्या पदाचे राजीनामे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दिले होते. दिलेल्या राजीनाम्यानंतर केंद्रीय सहकार निबंधकाने संचालक मंडळाला केलेल्या सुचनेनुसार दिलेल्या राजीनाम्यावर संचालक मंडळानेच योग्य तो निर्णय घ्यावा अशी सुचना केली होती. मात्र कसल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेण्यावर संचालक मंडळावर बंधन लागू केले होते. केलेल्या सुचनेवरुन म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने दिलेले राजीनामे स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नव्या संचालक मंडळाची स्थापना होईपर्यंत बँकेचा ताबा त्याच संचालक मंडळाजवळ सोपवण्यात आला होता. तसेच निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार सुद्धा संचालक मंडळाला दिले होते. त्यानुसार जानेवारीत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत २३ मार्च ही निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आलेली. तशी माहिती म्हापसा अर्बनने केंद्रीय सहकार निबंधक, रिझर्व्ह बँक व इतर संबंधीतांना दिली होती. त्यानंतर निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकाऱ्याची नेमणूक करुन त्यांनी आपल्या पदाचा ताबा स्वीकारुन निवडणुकीची प्रक्रिया सुद्धा सुरू केली होती. 

संचालक मंडळाच्या निवडीसाठी ठरवलेल्या तारखे दरम्यान लोकसभा तसेच विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याचे त्याचा अडथळा म्हापसा अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी होण्याची शक्यता असल्याने होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली. तशी माहिती नाटेकर यांनी दिली. लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर बँकेच्या निवडणुकीसाठी नवी तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे ते पुढे म्हणाले. काही दिवसांपूर्वी संचालक मंडळाची बैठक संपन्न होवून निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे नाटेकर म्हणाले. या संबंधीची माहिती केंद्रीय सहकार निबंधक, रिझर्व्ह बँक तसेच इतरांना देण्यात आल्याचे ते पुढे म्हणाले.  

दरम्यान निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर म्हापसा अर्बनचे मुंबईतील भांडूप येथे प्रमुख कार्यालय तसेच सायन येथे केंद्रीय कार्यालय असलेल्या पीएमसी बँकेत विलीनीकरण करण्यावर चर्चा सुद्धा सुरू करण्यात आली होती. चर्चेनंतर पीएमसी बँकेच्या ऑडीटरांनी बँकेत येवून ऑडीटची तपासणी सुद्धा केली होती. एखाद्या मालमत्तेच्या खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी लागणारा अहवाल (ड्यु डिलीगन्स रिपोर्ट अथवा योग्य परिश्रम अहवाल) पीएमसी बँकेने म्हापसा अर्बनकडून नेला असल्याची माहिती नाटेकर यांनी दिली. तसेच बँकेचे मुल्यांकन सुद्धा करण्यात आल्याचे ते म्हणाले. विलीनीकरणाची पुढील प्रक्रिया म्हणून पीएमसी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होणार असून त्यात विलीनीकरणावर चर्चा केली जाणार आहे. सदरच्या बैठकीत विलीनीकरणाला मान्यता मिळाल्यास त्यानंतर म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

म्हापसा अर्बनची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बँकेचे विलीनीकरण करण्यात यावे अशी रिझर्व्ह  बँकेची अट होती. विलीनीकरण शक्य नसल्यास निवडणुका घेण्यात याव्यात असेही म्हणाले. त्यानुसार आम्ही मार्गक्रमण करीत असल्याचे नाटेकर म्हणाले. बँकेला आर्थिक दृष्ट्या तसा त्रास नव्हता पण लागू केलेल्या निर्बंधामुळे परिणाम झाला असल्याचे ते पुढे म्हणाले. 

 

टॅग्स :bankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकgoaगोवा