शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

पर्वरीत वाहतूक कोंडी वाढते पाेलिसांनी गाड्या थांबवून तपासणी करु नये; पर्यटन मंत्री राेहन खंवटे यांचे पाेलिसांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2024 15:23 IST

पर्वरी मतदारसंघातील मान्सून कामाची बैठक घेतली यात पंचायत लाेकप्रतिनिधी उपस्थित होते.

नारायण गावस, पणजी: पर्वरी महामार्गावर वाहतूक कोंडी वाढत असल्याने या रस्त्यांवर वाहतूक पाेलिसांनी गाड्या अडवून तपासणी करु नये. यासाठी वाहतूक अधीक्षक तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे, असे पर्यटन मंत्री राेहन खंवटे यांनी सांगितले. गुरुवारी पर्वरी मंत्रालयात मंत्री राेहन खंवटे यांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत पर्वरी मतदारसंघातील मान्सून कामाची बैठक घेतली यात पंचायत लाेकप्रतिनिधी उपस्थित होते.

पर्वरीतील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी हाेत असते त्यात वाहतूक पाेलीस मध्येच राहून वाहनांना दंड घालत असल्याने वाहतूक कोंडी वाढते. त्यामुळे पाेलिसांनी पर्वरी काढून सुकूर किंवा पणजीत वाहनांची तपासणी करावी. यामुळे या भागातील वाहतूक काेंडी कमी होऊ शकते. मंत्री राेहन खंवटे म्हणाले या विषयी आम्ही वाहतूक पाेलिसांना आदेश दिले आहे. तसेच पर्वरी परिसरात बेकायदेशीर रस्त्यांचे खोदकाम करतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

मंत्री राेहन खंवटे म्हणाले, या बैठकीत पर्वरीतील वीज समस्या, पाणी समस्या तसेच आराेग्य तसेच इतर सेवाविषयी चर्चा करण्यात आली. यात उपजिल्हाधिकारी, मामलेदार यांना १५ दिवसांनी या बैठकीचा पंचायत प्रतिनिधीसोबत आढावा घेण्यास सांगितले आहे. पर्वरी भागात यंदा डेंग्यूचे रुग्ण वाढू नये यासाठी खास काळजी घेण्याचे आवाहन आराेग्य अधिकाऱ्यांना केेले आहे. तसेच या परिसरात वारंवार वीज जात असल्याने त्यांची ही समस्या दूर करण्याचे आदेश वीज अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे पर्वरी मतदारसंघात भागातील शेतीमध्ये पाणी घुसते तसेच शेतकऱ्यांच्या इतर समस्या जाणून घेण्यास कृषी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

मंत्री खंवटे म्हणाले, पर्वरी महमार्गावर उड्डाण पूल हाेणार आहे पण त्यासाठी अगोदर आम्ही या रस्त्यांची राहीलेली कामे पूर्ण करणार आहोत. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईड राेडची कामे अगोदर करणार आहोत. यात सर्व पंचायत प्रतिनिधींना एकत्र घेऊन ही कामे केली जाणार आहे. तसेच या रस्त्याच्या चौपदीकरणासाठी अगोदर लोकांना विश्वासात घेतले जाणार आहे. महामार्ग प्राधिकरणाशी या विषयी चर्चा करण्यात येणार तसेच मुख्यमंत्र्यांच्या पाहणी नंतर याचे काम हाती घेतले जाणार आहे. पर्वरीतील नागरिकांना व्यापाऱ्यांना कुठलाच त्रास हाेणार नाही याची पूर्णतयारी करुन महामार्गाचे काम आणि उड्डाण पुलाचे काम होणार आहे.

मंत्री खंवटे म्हणाले, अनेक पर्यटक साेशल मिडीयावर पाहून असुरक्षित स्थळावर जात असतात आणि तिथे कुठलीच सुरक्षितता नसल्याने आपला जीव गमावतात. यासाठी आता पर्यटन खाते परिपत्रक जारी करुन किंवा जागृती निर्माण करुन पर्यटक आणि स्थानिकांनी कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यास सांगेल जाणार आहे. यामुळे असुरक्षित ठिकाणी पर्यटन जाणार नाही. स्थानिकांनीही याची दखल घ्यावी आपल्या भागातील असुरक्षित चिरेखाणीत तसेच इतर भागात जाऊ नये.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन