शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

गोरक्षा करताना पोलिस कधीच सहाय्य करत नाही: गोमंत गोरक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब

By समीर नाईक | Updated: June 28, 2024 14:49 IST

पणजीत शुक्रवारी आयोजित पत्रकार परीषदेत हनुमंत परब बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पंजाब गोरक्षा अभियानाचे प्रमुख सतीश प्रधान, राजीव झा, व भगवान हरमलकर उपस्थित होते.

पणजी: गोरक्षा करण्याचे काम आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून करत आलो आहोत. परंतु या दरम्यान एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली की गोरक्षा करताना सरकारी अधिकारी मदत करत नाही. खासकरुन पोलिस अधिकारी कुठल्याच प्रकारचे सहाय्य करत नाही. हल्लीच वाळपई येथे दुचाकीवरुन वासरु नेतानाचा व्हिडीओ वायरल झाला, यानंतर तक्रारही करण्यात आली, परंंतु कुठलीच कारवाई झाली नाही. यावरुन स्पष्ट होते की यामध्ये देखील कुणाचा तरी राजकीय हस्तक्षेप आहे, अशी माहिती गोमंत गोरक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी दिली.

पणजीत शुक्रवारी आयोजित पत्रकार परीषदेत हनुमंत परब बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पंजाब गोरक्षा अभियानाचे प्रमुख सतीश प्रधान, राजीव झा, व भगवान हरमलकर उपस्थित होते.

पोलिसांवर राजकीय दबाव वारंवार दिसून आला आहे. दोन वर्षापूर्वी देखील डिचोलीत मश्चिदमधून सुमारे २५ बैलांची सुटका करण्यात आली होती. या प्रकरणात कारवाई राहीली बाजूलाच, पण साधी एफआयआर देखील पोलिसांनी दाखल केली नव्हती. उच्च न्यायालयाचा आदेश असूनही काहीच कारवाई झाली नाही. पोलिसांना जनावरे संवर्धनाबाबत कायदाच माहीत नाही. त्यांना उच्च प्रशिक्षणाची गरज आहे, असे परब यांनी पुढे सांगितले.

गेल्या काही महिन्यांमध्ये कर्नांटक येथून बेकायदेशीररित्या गोमांस राज्यात आणले जाते, परंतु पोलिस याकडे डोळेझाक करत आहे. वारंवार अशा घटना घडूनही कुठलेच उपाययोजना सरकार करताना दिसन नाही. गृह खाते देखील याबाबत गंभीर दिसत नाही. राज्यात पीसीए कायदा लागू करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांंचेही गृह खात्याकडे लक्ष आहे असे दिसून येत नाही. मुख्यमंंत्र्यानी हा विषय गांभिर्याने घ्यावा, असे परब यांनी सांगितले.