शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षा करताना पोलिस कधीच सहाय्य करत नाही: गोमंत गोरक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब

By समीर नाईक | Updated: June 28, 2024 14:49 IST

पणजीत शुक्रवारी आयोजित पत्रकार परीषदेत हनुमंत परब बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पंजाब गोरक्षा अभियानाचे प्रमुख सतीश प्रधान, राजीव झा, व भगवान हरमलकर उपस्थित होते.

पणजी: गोरक्षा करण्याचे काम आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून करत आलो आहोत. परंतु या दरम्यान एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली की गोरक्षा करताना सरकारी अधिकारी मदत करत नाही. खासकरुन पोलिस अधिकारी कुठल्याच प्रकारचे सहाय्य करत नाही. हल्लीच वाळपई येथे दुचाकीवरुन वासरु नेतानाचा व्हिडीओ वायरल झाला, यानंतर तक्रारही करण्यात आली, परंंतु कुठलीच कारवाई झाली नाही. यावरुन स्पष्ट होते की यामध्ये देखील कुणाचा तरी राजकीय हस्तक्षेप आहे, अशी माहिती गोमंत गोरक्षा अभियानचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी दिली.

पणजीत शुक्रवारी आयोजित पत्रकार परीषदेत हनुमंत परब बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पंजाब गोरक्षा अभियानाचे प्रमुख सतीश प्रधान, राजीव झा, व भगवान हरमलकर उपस्थित होते.

पोलिसांवर राजकीय दबाव वारंवार दिसून आला आहे. दोन वर्षापूर्वी देखील डिचोलीत मश्चिदमधून सुमारे २५ बैलांची सुटका करण्यात आली होती. या प्रकरणात कारवाई राहीली बाजूलाच, पण साधी एफआयआर देखील पोलिसांनी दाखल केली नव्हती. उच्च न्यायालयाचा आदेश असूनही काहीच कारवाई झाली नाही. पोलिसांना जनावरे संवर्धनाबाबत कायदाच माहीत नाही. त्यांना उच्च प्रशिक्षणाची गरज आहे, असे परब यांनी पुढे सांगितले.

गेल्या काही महिन्यांमध्ये कर्नांटक येथून बेकायदेशीररित्या गोमांस राज्यात आणले जाते, परंतु पोलिस याकडे डोळेझाक करत आहे. वारंवार अशा घटना घडूनही कुठलेच उपाययोजना सरकार करताना दिसन नाही. गृह खाते देखील याबाबत गंभीर दिसत नाही. राज्यात पीसीए कायदा लागू करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांंचेही गृह खात्याकडे लक्ष आहे असे दिसून येत नाही. मुख्यमंंत्र्यानी हा विषय गांभिर्याने घ्यावा, असे परब यांनी सांगितले.