शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कविता, अभिनयाने जीवन समृद्ध - किशोर कदम

By admin | Updated: July 18, 2016 22:20 IST

अभिनय आणि कविता या दोघांनीही आयुष्य समृद्ध केले. घरात कलेसाठी पोषक नसलेले वातावरण, गरिबी आणि योग्य वयात ध्येयाकडे नसलेला प्रवास एक परिपूर्ण जीवन देऊन गेला.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. १८ -  अभिनय आणि कविता या दोघांनीही आयुष्य समृद्ध केले. घरात कलेसाठी पोषक नसलेले वातावरण, गरिबी आणि योग्य वयात ध्येयाकडे नसलेला प्रवास एक परिपूर्ण जीवन देऊन गेला. आपल्या मनात असलेला एखाद्या व्यक्तीबाबतचा, हुशारी, रंग-रूप याबाबतचा न्यूनगंड आपल्यामध्ये असलेल्या टॅलेंटची ओळख करून देतो आणि आपला उत्कृष्टाकडील प्रवास होतो. तो प्रवास विलक्षण असतो. किशोर कदम या नावापेक्षाही ‘गारवा’ फेम ‘सौमित्र’च रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. किशोर कदम यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत ज्येष्ठतेच्या यादीत घेतले जात आहे. जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांत उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांनी पुरस्कार मिळविले आहेत. काही वर्षांपूर्वी गाजलेला मराठी अल्बम ‘गारवा’चे गीतकार सौमित्र ऊर्फ किशोर कदम यांच्याशी स्वस्तिक संस्थेतर्फे आयोजित ‘हितगुज’ या कार्यक्रमात संवाद साधताना सौमित्र यांनी आपला जीवन प्रवास उलगडला. साहित्यिक विष्णू वाघ यांनी सौमित्र यांच्याशी संवाद साधला. दोघा कवींमधील संवादाने प्रेक्षकांना भारावून टाकले. मुंबईच्या खार-कोळीवाडा भागातील बालपणापासूनच्या प्रवासाची आठवण सांगताना किशोर कदम म्हणाले, घरात शिक्षण, कला, सांस्कृतिक क्षेत्राबाबत कोणतेही ज्ञान, मार्गदर्शन नव्हते. अभिनयाच्या क्षेत्रात कारकीर्द घडवावी असे पोषक वातावरणही नव्हते. तरीही समुद्राच्या बाजूला जन्मलेल्या माणसांमध्ये कला आपणच रुजते. माझेही तसेच झाले. समुद्राच्या विशाल कायेने मला उपजतच अभिनय आणि कवित्व या दोन देणग्या दिल्या होतो. ‘माझ्या सोबत समुद्राच्या लाटा येतील, मला शोधाल तेव्हा अनेक वळणवाटा येतील’ असे कवितेच्या ओळींतून आपले व्यक्तिमत्त्व उलगडले. शालेय वयात गायक ज्ञानेश्वर ढोबरे यांनी सांगितल्याने कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आणि कविता लिहिण्याचा श्रीगणेशा झाला अशी आठवण सांगताना कदम यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणीही उलगडल्या. रंगकर्मी सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली नाटकाचे प्रशिक्षण घेतले. दुबे यांनी केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर माणूस म्हणून कसे जगावे याचेही शिक्षण दिले. दुबे यांना भेटल्यानंतर १५ वर्षांचा काळ आयुष्य समृद्ध करणारा ठरला. दुबे यांच्यासोबत नाटक करतानाच श्याम बेनेगल यांनी ‘अंतर्नाद’ या चित्रपटासाठी माझी निवड केली आणि पडद्यासाठीचा अभिनेता जन्माला आला. त्यानंतर ‘ध्यासपर्व’ आणि ‘समर’ या चित्रपटाने नवीन नाव दिले, ओळख दिली, कौतुक आणि प्रसिद्धीही दिली. ‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकातील हरीलाल या पात्राने पुन्हा नवीन अभिनेत्याला जन्म दिला. आणि इथून पुढे नाटक, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, कवी, गीतकार अशी वेगवेगळी ओळख निर्माण होत गेली, असे कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बघ माझी आठवण येते का?महाराष्ट्रात कदम यांना अभिनेता म्हणविण्यापेक्षाही ‘सौमित्र फेम गारवा’ म्हणून संबोधताना रसिकांच्या डोळ्यात अधिक माया जाणवते. सौमित्र आणि मिलिंद इंगळे यांचा ‘गारवा’ अल्बम अजूनही गुणगुणला जातो. गारवाने सौमित्र नावाला नवीन ओळख दिली. ‘गारवा’मधील ‘बघ माझी आठवण येते का?’ या कवितेच्या ओळी त्यांनी ऐकविल्या. विद्यार्थी असताना मी शेवटच्या बाकावर बसायचो, अभ्यासात बराच मागे असायचो आणि कसाबसा पास व्हायचो. कदाचित ढकललो जायचो. त्या वेळी ‘आय एम अनवॉण्डेट’ हा न्यूनगंड भयंकर होता. कुणीतरी माझ्याशी बोलावे, मला ऐकावे अशी खूप इच्छा असायची; पण स्वत:कडे स्वत:ही आकर्षित होण्याएवढे सुंदर व्यक्तिमत्त्व मला लाभले नसल्याने मी खूप निराश असायचो. कुणाशीतरी बोलावे, व्यक्त व्हावे या भावनेने मी कागदांना जवळ केले आणि मोकळ्या होण्याच्या ध्यासाने कवितांमधून स्वत:शी बोलू लागलो, संवाद साधू लागलो, वादविवाद घालू लागलो आणि मी कवी झालो. - किशोर कदम, कवी, अभिनेते