शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

कविता, अभिनयाने जीवन समृद्ध - किशोर कदम

By admin | Updated: July 18, 2016 22:20 IST

अभिनय आणि कविता या दोघांनीही आयुष्य समृद्ध केले. घरात कलेसाठी पोषक नसलेले वातावरण, गरिबी आणि योग्य वयात ध्येयाकडे नसलेला प्रवास एक परिपूर्ण जीवन देऊन गेला.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. १८ -  अभिनय आणि कविता या दोघांनीही आयुष्य समृद्ध केले. घरात कलेसाठी पोषक नसलेले वातावरण, गरिबी आणि योग्य वयात ध्येयाकडे नसलेला प्रवास एक परिपूर्ण जीवन देऊन गेला. आपल्या मनात असलेला एखाद्या व्यक्तीबाबतचा, हुशारी, रंग-रूप याबाबतचा न्यूनगंड आपल्यामध्ये असलेल्या टॅलेंटची ओळख करून देतो आणि आपला उत्कृष्टाकडील प्रवास होतो. तो प्रवास विलक्षण असतो. किशोर कदम या नावापेक्षाही ‘गारवा’ फेम ‘सौमित्र’च रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. किशोर कदम यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत ज्येष्ठतेच्या यादीत घेतले जात आहे. जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांत उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांनी पुरस्कार मिळविले आहेत. काही वर्षांपूर्वी गाजलेला मराठी अल्बम ‘गारवा’चे गीतकार सौमित्र ऊर्फ किशोर कदम यांच्याशी स्वस्तिक संस्थेतर्फे आयोजित ‘हितगुज’ या कार्यक्रमात संवाद साधताना सौमित्र यांनी आपला जीवन प्रवास उलगडला. साहित्यिक विष्णू वाघ यांनी सौमित्र यांच्याशी संवाद साधला. दोघा कवींमधील संवादाने प्रेक्षकांना भारावून टाकले. मुंबईच्या खार-कोळीवाडा भागातील बालपणापासूनच्या प्रवासाची आठवण सांगताना किशोर कदम म्हणाले, घरात शिक्षण, कला, सांस्कृतिक क्षेत्राबाबत कोणतेही ज्ञान, मार्गदर्शन नव्हते. अभिनयाच्या क्षेत्रात कारकीर्द घडवावी असे पोषक वातावरणही नव्हते. तरीही समुद्राच्या बाजूला जन्मलेल्या माणसांमध्ये कला आपणच रुजते. माझेही तसेच झाले. समुद्राच्या विशाल कायेने मला उपजतच अभिनय आणि कवित्व या दोन देणग्या दिल्या होतो. ‘माझ्या सोबत समुद्राच्या लाटा येतील, मला शोधाल तेव्हा अनेक वळणवाटा येतील’ असे कवितेच्या ओळींतून आपले व्यक्तिमत्त्व उलगडले. शालेय वयात गायक ज्ञानेश्वर ढोबरे यांनी सांगितल्याने कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आणि कविता लिहिण्याचा श्रीगणेशा झाला अशी आठवण सांगताना कदम यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणीही उलगडल्या. रंगकर्मी सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली नाटकाचे प्रशिक्षण घेतले. दुबे यांनी केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर माणूस म्हणून कसे जगावे याचेही शिक्षण दिले. दुबे यांना भेटल्यानंतर १५ वर्षांचा काळ आयुष्य समृद्ध करणारा ठरला. दुबे यांच्यासोबत नाटक करतानाच श्याम बेनेगल यांनी ‘अंतर्नाद’ या चित्रपटासाठी माझी निवड केली आणि पडद्यासाठीचा अभिनेता जन्माला आला. त्यानंतर ‘ध्यासपर्व’ आणि ‘समर’ या चित्रपटाने नवीन नाव दिले, ओळख दिली, कौतुक आणि प्रसिद्धीही दिली. ‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकातील हरीलाल या पात्राने पुन्हा नवीन अभिनेत्याला जन्म दिला. आणि इथून पुढे नाटक, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, कवी, गीतकार अशी वेगवेगळी ओळख निर्माण होत गेली, असे कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बघ माझी आठवण येते का?महाराष्ट्रात कदम यांना अभिनेता म्हणविण्यापेक्षाही ‘सौमित्र फेम गारवा’ म्हणून संबोधताना रसिकांच्या डोळ्यात अधिक माया जाणवते. सौमित्र आणि मिलिंद इंगळे यांचा ‘गारवा’ अल्बम अजूनही गुणगुणला जातो. गारवाने सौमित्र नावाला नवीन ओळख दिली. ‘गारवा’मधील ‘बघ माझी आठवण येते का?’ या कवितेच्या ओळी त्यांनी ऐकविल्या. विद्यार्थी असताना मी शेवटच्या बाकावर बसायचो, अभ्यासात बराच मागे असायचो आणि कसाबसा पास व्हायचो. कदाचित ढकललो जायचो. त्या वेळी ‘आय एम अनवॉण्डेट’ हा न्यूनगंड भयंकर होता. कुणीतरी माझ्याशी बोलावे, मला ऐकावे अशी खूप इच्छा असायची; पण स्वत:कडे स्वत:ही आकर्षित होण्याएवढे सुंदर व्यक्तिमत्त्व मला लाभले नसल्याने मी खूप निराश असायचो. कुणाशीतरी बोलावे, व्यक्त व्हावे या भावनेने मी कागदांना जवळ केले आणि मोकळ्या होण्याच्या ध्यासाने कवितांमधून स्वत:शी बोलू लागलो, संवाद साधू लागलो, वादविवाद घालू लागलो आणि मी कवी झालो. - किशोर कदम, कवी, अभिनेते