शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या लोकांनी जातीय राजकारण नाकारले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दक्षिण गोव्यात भाजपाचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 09:23 IST

इतर मंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना जनता आता जातीय राजकारणाला नव्हे तर विकासाला मतदान करत असल्याचे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : बिहारच्या विकासाचा विचार करून बिहारच्या लोकांनी एनडीएला मतदान केले आहे आणि जातीय राजकारण नाकारले आहे, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी व्यक्त केले. मुख्यमंत्री सावंत यांनी काल फातोर्डा येथील दक्षिण गोवा भाजप पक्ष कार्यालयाला भेट दिली आणि बिहार निवडणुकीत एनडीए सरकारला मिळालेल्या पूर्ण बहुमताचा आनंद साजरा केला. पक्षाच्या सदस्यांसोबत आनंद साजरा केल्यानंतर, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना जनता आता जातीय राजकारणाला नव्हे तर विकासाला मतदान करत असल्याचे सांगितले.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी बिहारमधील जनतेचे अभिनंदन करू इच्छितो, ज्यांनी जातीय राजकारण नाकारले आहे. बिहार राज्यात विकास घडवून आणणाऱ्या नितीश कुमार यांच्या एनडीए सरकारला मतदान केले आहे. यापुढे विकासाच्या आधारावरच निवडणुका लढल्या जातील. मागील जिल्हा पंचायत निवडणुकीत, उत्तर गोव्यात भाजपने २५ पैकी २२ जागा जिंकल्या होत्या. दक्षिण गोव्यात भाजपने १४ जागा जिंकल्या आणि युतीसह भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीत १७ जागा जिंकल्या. यावेळीही आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत आम्हाला दोन्ही जिल्ह्यांत पूर्ण बहुमत मिळेल,' असा दावा सावंत यांनी केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्यांनी पुरोगामी सरकारला मतदान केले आहे.

जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न बिहारच्या जनतेने स्वीकारले आहे आणि बिहार निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब दिसून आले आहे.

समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले की, विरोधी पक्षाचे नेते आधी भाजपवर मतदान चोरीचा आरोप करत होते; परंतु बिहार निवडणुकीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. बिहारच्या जनतेने राहुल गांधींच्या नेतृत्वाला नाकारले आहे,

बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाचा पंचायतमंत्री, दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांनी आपल्या समर्थकासहीत आनंदोत्सव साजरा केला. शुक्रवारी (दि. १४) नवेवाडे येथील पंचायतमंत्री गुदिन्हो यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमून फटाके फोडून, मिठाई वाटत आनंद साजरा केला. यावेळी पंचायतमंत्री गुदिन्हो यांच्यासह, दाबोळी भाजप मंडळ अध्यक्ष सचिन चौगुले, चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा अॅड. अनिता थोरात, कदंब महामंडळाचे उपाध्यक्ष क्रितेश गावकर, नगरसेवक सुदेश भोसले आणि दाबोळीतील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंदोत्सवावेळी पंचायतमंत्री गुदिन्हो यांनी दाबोळी भाजप मंडळ अध्यक्ष सचिन चौगुले यांना मिठाई भरवली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Rejects Caste Politics: Goa CM Celebrates BJP's Victory

Web Summary : Goa CM Pramod Sawant hailed Bihar voters for choosing development over caste-based politics after the NDA's victory. Celebrations erupted in South Goa BJP office. BJP leaders attributed the win to PM Modi and Nitish Kumar's progressive governance, dismissing opposition claims of vote rigging.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५