शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
3
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
4
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
5
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
6
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
7
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
8
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
9
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
10
पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी; मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली महत्त्वाची माहिती
11
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
12
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
14
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
15
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
16
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
17
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
18
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
19
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
20
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या लोकांनी जातीय राजकारण नाकारले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दक्षिण गोव्यात भाजपाचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 09:23 IST

इतर मंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना जनता आता जातीय राजकारणाला नव्हे तर विकासाला मतदान करत असल्याचे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : बिहारच्या विकासाचा विचार करून बिहारच्या लोकांनी एनडीएला मतदान केले आहे आणि जातीय राजकारण नाकारले आहे, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी व्यक्त केले. मुख्यमंत्री सावंत यांनी काल फातोर्डा येथील दक्षिण गोवा भाजप पक्ष कार्यालयाला भेट दिली आणि बिहार निवडणुकीत एनडीए सरकारला मिळालेल्या पूर्ण बहुमताचा आनंद साजरा केला. पक्षाच्या सदस्यांसोबत आनंद साजरा केल्यानंतर, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना जनता आता जातीय राजकारणाला नव्हे तर विकासाला मतदान करत असल्याचे सांगितले.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी बिहारमधील जनतेचे अभिनंदन करू इच्छितो, ज्यांनी जातीय राजकारण नाकारले आहे. बिहार राज्यात विकास घडवून आणणाऱ्या नितीश कुमार यांच्या एनडीए सरकारला मतदान केले आहे. यापुढे विकासाच्या आधारावरच निवडणुका लढल्या जातील. मागील जिल्हा पंचायत निवडणुकीत, उत्तर गोव्यात भाजपने २५ पैकी २२ जागा जिंकल्या होत्या. दक्षिण गोव्यात भाजपने १४ जागा जिंकल्या आणि युतीसह भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीत १७ जागा जिंकल्या. यावेळीही आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत आम्हाला दोन्ही जिल्ह्यांत पूर्ण बहुमत मिळेल,' असा दावा सावंत यांनी केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्यांनी पुरोगामी सरकारला मतदान केले आहे.

जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न बिहारच्या जनतेने स्वीकारले आहे आणि बिहार निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब दिसून आले आहे.

समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले की, विरोधी पक्षाचे नेते आधी भाजपवर मतदान चोरीचा आरोप करत होते; परंतु बिहार निवडणुकीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. बिहारच्या जनतेने राहुल गांधींच्या नेतृत्वाला नाकारले आहे,

बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाचा पंचायतमंत्री, दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांनी आपल्या समर्थकासहीत आनंदोत्सव साजरा केला. शुक्रवारी (दि. १४) नवेवाडे येथील पंचायतमंत्री गुदिन्हो यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमून फटाके फोडून, मिठाई वाटत आनंद साजरा केला. यावेळी पंचायतमंत्री गुदिन्हो यांच्यासह, दाबोळी भाजप मंडळ अध्यक्ष सचिन चौगुले, चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा अॅड. अनिता थोरात, कदंब महामंडळाचे उपाध्यक्ष क्रितेश गावकर, नगरसेवक सुदेश भोसले आणि दाबोळीतील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंदोत्सवावेळी पंचायतमंत्री गुदिन्हो यांनी दाबोळी भाजप मंडळ अध्यक्ष सचिन चौगुले यांना मिठाई भरवली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Rejects Caste Politics: Goa CM Celebrates BJP's Victory

Web Summary : Goa CM Pramod Sawant hailed Bihar voters for choosing development over caste-based politics after the NDA's victory. Celebrations erupted in South Goa BJP office. BJP leaders attributed the win to PM Modi and Nitish Kumar's progressive governance, dismissing opposition claims of vote rigging.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५