शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मी काय आहे ते गोमंतकीय ठरवतील- उत्पल पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 20:44 IST

पक्ष देईल ती जबाबदार पार पाडणार असल्याचं उत्पल म्हणाले

पणजी : मी काय आहे ते पणजीवासीय आणि गोमंतकीय माझ्या कामावरून ठरवतील. माझ्या कामावरूनच माझी राजकीय पात्रता ठरेल. भाजपची वाढ ही स्वत: माझ्या घरापासून पाहिलेली आहे. भाजपने काहीही सांगितल्यास मी ते करेन, कोणतीही जबाबदारी पार पाडेन, असे दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले.गोवा सुरक्षा मंचचे प्रमुख प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी उत्पल हे निवडणुकीच्या राजकारणात येणार नाहीत, कारण ते पॉलिटीकल मटेरियल नव्हे पण ते सद्गृहस्थ आहेत अशा अर्थाचे भाष्य केले होते. त्यावर पत्रकारांनी विचारताच उत्पल म्हणाले की खरे म्हणजे मला अशा विषयांवर भाष्य करायचेच नाही. तथापि, मी काय मटेरियल आहे हे लोकच निश्चित करतील. मी सदगृहस्थ आहे असेही सुरक्षा मंचाच्या नेत्याने म्हटलेय हेही माङयासाठी स्वागतार्ह आहे. मी काय आहे हे पणजीवासिय ठरवतील.उत्पल म्हणाले की भाजप हा माझ्यासाठी नवा नव्हे. भाजपाची सुरुवात आमच्या घरातूनच झाली. मी लहानातून जसा मोठा झालो, त्याच पद्धतीने समांतरपणे भाजपची वाढ झाली. प्रथम भाजपाकडे कार्यालय नव्हते. त्यामुळे आमच्या घरीच भाजपच्या बैठका व्हायच्या. मी तेव्हा लहान होतो. पण मी पाहिले आहे. सतीश धोंड वगैरे त्या बैठकांसाठी येत असे. मी त्यांना सतीश काका म्हणायचो. धोंड किंवा संजीव देसाई हे सगळे भाजपचे काम करत राहिले व त्यांचे काळे केस पांढरे झाले. काहीजणांचे काळे केस मात्र अलीकडेच पांढरे झाले आहेत.उत्पल म्हणाले, की एवढा काळ आपण सक्रिय राजकारणापासून दूर राहिलो होतो, कारण एक पर्रीकर ते काम करत असताना दुसऱ्याने दूर रहायला हवे. आपण राखलेले ते अंतर म्हणजे  स्ट्रॅटेर्जिकल कृती होती. मला आता भाजपने श्रीपाद नाईक यांच्यासाठी काम करायला सांगितल्याने मी काम सुरू केले आहे. पणजीच्या तिकिटाविषयी वगैरे मी बोलत नाही, कारण त्याविषयी काय ठरवायचे ते पक्ष ठरवील. पक्ष जे सांगेल, त्यानुसार मी काम करेन. पणजीत आणखी कुणाला तिकीट दिले तरी मी काम करेन.वेलिंगकर यांचे नाव न घेता उत्पल म्हणाले, की अलिकडे पर्रीकर यांना कुणीही शिव्या घालण्याची फॅशन आलेली आहे. पर्रीकर हे राष्ट्रीय नेते होते व त्यामुळे त्यांना दोष दिला की, आपली राष्ट्रीय बातमी होईल असे काहीजणांना वाटते. काहीजण हवेतच तत्त्वांच्या गोष्टी बोलतात. केवळ टीव्हीवर किंवा यू-ट्युबवर बातमी दिसावी म्हणूनच काहीजण बोलतात. ठोस असे काही न करता तत्त्वांविषयीच हवेतील बोल ते ऐकवतात. मला काँक्रीट असे म्हणजेच ठोस असे काही तरी करायचे आहे. मला भाजपचा अनुभव आहे, शिवाय मी अमेरिकेत शिकून आल्यानंतर एक उद्योग उभा करून अनेकांना रोजगार संधी दिली, तोही अनुभव माझ्या गाठीशी आहे. उत्पल म्हणाले की, पर्रीकर यांनी राजकारण शुद्ध असावे म्हणून प्रयत्न केला. ते स्वत: संरक्षण मंत्री असताना लाखो-कोटींचे बजेट ते हाताळत असे. तरीही आम्ही स्वच्छ राहिलो. मला अशा प्रकारच्याच शुद्धतेची जोड गोव्यातील राजकारणाला देण्यात यश आले तर ते मला समाधानाचे वाटेल. पर्रीकर आजारी असतानाही अखेरच्या काळातही ते गोव्यातील काही प्रकल्प पूर्ण करायचे आहेत याविषयी बोलायचे, चिंतन करायचे. तिसऱ्या मांडवी नदीवर पुलाचे बांधकाम होऊन त्याचे उद्घाटन झाल्यानंतर मग आपले काम संपले असे कदाचित पर्रीकर यांना वाटले असावे. कारण त्यानंतरच त्यांचे आरोग्य ढासळण्यास आरंभ झाला. पर्रीकर केवळ एकदाच पुलावर गेले. पण पुढील अनेक पिढ्यांसाठी तो पूल कायम राहिला आहे. मलाही असे कायमस्वरुपी काही करता आले तर ते योग्य ठरेल. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा