शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

सत्ताधाऱ्यांवर लोक नाराज; अपेक्षापूर्तीसाठी विरोधकही कमी पडतात: एल्वीस गोम्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 11:32 IST

'लोकमत'च्या व्यासपीठावर मांडल्या भावना

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सत्ताधा-यांविरोधात गोमंतकीयांमध्ये खदखद आहे परंतु, सक्षम विरोधक म्हणून काँग्रेस पक्ष कमी पडत असल्याचे लोकांना वाटत आहेत. मात्र काँग्रेस त्यावर नक्कीच मात करेल. पक्षाची निर्माण झालेली छबी बदलण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून एक कणखर विरोधक म्हणून काँग्रेस सत्ताधाऱ्यांना नक्कीच टक्कर देईल, असा विश्वास काँग्रेसचे नेते एल्वीस गोम्स यांनी व्यक्त केला.

पणजी येथील 'लोकमत' कार्यालयास काल, शुक्रवारी दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडे आपण दक्षिण गोव्याच्या उमेदवारीसाठी दावा केला आहे. तिकीट कुणाला द्यावी यासाठी लोकांचे म्हणणे लक्षात घेणे गरजेचे आहे. मग ती तिकीट मला मिळावी किंवा अन्य कोणालाही, कारण शेवटी उमेदवार म्हणून कोणाला स्वीकारावे है लोक ठरवतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोम्स म्हणाले, सरकारी सेवेत एका उच्च पदावर असताना आपण नोकरीचा राजीनामा दिला. त्यावेळी राजकारणात येण्याचा कुठलाही हेतु नव्हता. परंतु तेव्हाच आम आदमी पक्ष गोव्यात दाखल झाला व मी त्यात प्रवेश केला. राजकीय क्षेत्रात आपने मला व्यासपीठ दिले. दरम्यान, कुठल्याही राजकीय पक्षाचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर असले तरी प्रादेशिक पातळीवरील मुद्दे वेगळे असतात, याकडे पक्षाने लक्ष देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

मंत्रीच झाले अधिकारी

सध्या मंत्रीच अधिकारी झाले आहेत. प्रत्येक निर्णय तेच घेत आहेत, कुणाला कुठल्या योजनेचा फायदा मिळावा इथपासून ती कशी राबवावी हेसुद्धा तेच ठरवत आहेत. आपण सरकारी सेवेत असताना मात्र चित्र बरेच वेगळे होते. त्यामुळे आताच्या सिस्टिमशी आपल्याला कितपत जुळवता आले असते हा मोठा प्रश्नच आहे.

आरजीने आमची मते नेली, ती मते परत मिळवू

दक्षिण गोव्यात काँग्रेसच्या प्रभावावर आपण आताच बोलू शकत नाही, आरजीकडे गेलेली बहुतांश मते ही काँग्रेसची होती, तर भाजपच्या अवघ्याच मतांचा यात समावेश आहे. त्यामुळे काँग्रेसची जी मते दुसरीकडे गेली आहेत, ती परत आणायला हवीत, यासाठी पक्षाने सर्वांना एकत्र घेऊन काम करावे, असेही गोम्स म्हणाले.

राहुल गांधींशी चर्चा अन् मी काँग्रेसमध्ये

कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या सागण्यावरून आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गांधी यांच्याशी आपण दिल्लीत १२ ते १३ मिनिटं याविषयी चर्चा केली. गोव्यातील त्यावेळेच्या काँग्रेस नेतृत्वाकडून मात्र आपल्याला फारसा प्रतिसाद नव्हता. गांधी यांनी सांगितल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी फोन करूनआपल्याला पक्षात प्रवेश करण्यासाठी आमंत्रित केले.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसLokmatलोकमत