शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांवर लोक नाराज; अपेक्षापूर्तीसाठी विरोधकही कमी पडतात: एल्वीस गोम्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 11:32 IST

'लोकमत'च्या व्यासपीठावर मांडल्या भावना

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सत्ताधा-यांविरोधात गोमंतकीयांमध्ये खदखद आहे परंतु, सक्षम विरोधक म्हणून काँग्रेस पक्ष कमी पडत असल्याचे लोकांना वाटत आहेत. मात्र काँग्रेस त्यावर नक्कीच मात करेल. पक्षाची निर्माण झालेली छबी बदलण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून एक कणखर विरोधक म्हणून काँग्रेस सत्ताधाऱ्यांना नक्कीच टक्कर देईल, असा विश्वास काँग्रेसचे नेते एल्वीस गोम्स यांनी व्यक्त केला.

पणजी येथील 'लोकमत' कार्यालयास काल, शुक्रवारी दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडे आपण दक्षिण गोव्याच्या उमेदवारीसाठी दावा केला आहे. तिकीट कुणाला द्यावी यासाठी लोकांचे म्हणणे लक्षात घेणे गरजेचे आहे. मग ती तिकीट मला मिळावी किंवा अन्य कोणालाही, कारण शेवटी उमेदवार म्हणून कोणाला स्वीकारावे है लोक ठरवतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोम्स म्हणाले, सरकारी सेवेत एका उच्च पदावर असताना आपण नोकरीचा राजीनामा दिला. त्यावेळी राजकारणात येण्याचा कुठलाही हेतु नव्हता. परंतु तेव्हाच आम आदमी पक्ष गोव्यात दाखल झाला व मी त्यात प्रवेश केला. राजकीय क्षेत्रात आपने मला व्यासपीठ दिले. दरम्यान, कुठल्याही राजकीय पक्षाचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर असले तरी प्रादेशिक पातळीवरील मुद्दे वेगळे असतात, याकडे पक्षाने लक्ष देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

मंत्रीच झाले अधिकारी

सध्या मंत्रीच अधिकारी झाले आहेत. प्रत्येक निर्णय तेच घेत आहेत, कुणाला कुठल्या योजनेचा फायदा मिळावा इथपासून ती कशी राबवावी हेसुद्धा तेच ठरवत आहेत. आपण सरकारी सेवेत असताना मात्र चित्र बरेच वेगळे होते. त्यामुळे आताच्या सिस्टिमशी आपल्याला कितपत जुळवता आले असते हा मोठा प्रश्नच आहे.

आरजीने आमची मते नेली, ती मते परत मिळवू

दक्षिण गोव्यात काँग्रेसच्या प्रभावावर आपण आताच बोलू शकत नाही, आरजीकडे गेलेली बहुतांश मते ही काँग्रेसची होती, तर भाजपच्या अवघ्याच मतांचा यात समावेश आहे. त्यामुळे काँग्रेसची जी मते दुसरीकडे गेली आहेत, ती परत आणायला हवीत, यासाठी पक्षाने सर्वांना एकत्र घेऊन काम करावे, असेही गोम्स म्हणाले.

राहुल गांधींशी चर्चा अन् मी काँग्रेसमध्ये

कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या सागण्यावरून आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गांधी यांच्याशी आपण दिल्लीत १२ ते १३ मिनिटं याविषयी चर्चा केली. गोव्यातील त्यावेळेच्या काँग्रेस नेतृत्वाकडून मात्र आपल्याला फारसा प्रतिसाद नव्हता. गांधी यांनी सांगितल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी फोन करूनआपल्याला पक्षात प्रवेश करण्यासाठी आमंत्रित केले.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसLokmatलोकमत